tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post5255430231667798450..comments2023-07-19T11:19:22.489+05:30Comments on व्यक्तानंद: बोलेरो ( भाग १)Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-77686568631458670682017-12-20T21:40:05.217+05:302017-12-20T21:40:05.217+05:30इथे अजून सगळे भाग यायचेतसं दिसतं. तरी ब्लॉगवर कमें...इथे अजून सगळे भाग यायचेतसं दिसतं. तरी ब्लॉगवर कमेंटायला पायजे, फेसबुकानं ती गिळंकृत करता नये, म्हणून इथे डकवत आहे. <br />तुंबाड आणि शिरूभाऊ हे दोघंही फार जवळचे. उत्सुकतेनं सगळे भाग वाचले. <br />पहिल्या भागात टाकलात तो नवनीत-छाप सारांश का टाकावासा वाटला तुम्हांला ते कळेना. त्यानं माझा मेजर रसभंग झाला. <br />शिवाय तुम्ही काही सूक्ष्म जागा हेरायला चुकले आहात, असंही जाणवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रज उलथायला खोत अघोरी उपासना करतात हे साफ चूक. तशा प्रकारच्या इतिहासावरच्या सारवासारव्या (खोतबंधूंच्या हेतूंबद्दल नंतर चिमापानं मुद्दामहून पसरवून दिलेली ही फिरवाफिरवी), अंतर्हेतू आणि लोकांच्या मनातली प्रतिमा (खुद्द चिमापाची जेलमध्ये जाण्यामागची उद्दिष्टं आणि लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर), काळानुरूप उजळत वा विझत जाणार्या प्रतिष्ठितांच्या प्रतिमा (मोरया लढवय्या की दरोडेखोर याबद्दल आता असलेला संभ्रम, किंवा ओड्डलची अवस्था बघून होणारा त्याच्याबद्दलचा समज) ही कादंबरीमधली महत्त्वाची सूत्रं आहेत. काळाच्या विराट चक्रात काहीही कालातीत सत्य नाही-अंतिम सत्य नाही - हे माझ्या मते तुंबाडमधलं सर्वाधिक महत्त्वाचं आणि यशस्वीही विधान आहे. कोणतंही पात्र वा घटना उचलून पाहिली, तरी तिला चिकटलेले लोकार्थ दिसतात आणि पेंडसे हळूच स्वतःच त्याबद्दल 'काय की बॉ' अशी शंका हलक्या सुरात सोडून देतात. हे अतिशय परिणामकारक असं अस्त्र आहे. काळेपांढरे रंग टाळत राखाडी रंग रेखाटत जाण्याचं. हे तुमच्याकडून निसटलंसं वाटतं.<br />लैंगिक संबंध या गोष्टीला पेंडसे अजिबात बिचकत नाहीत. त्यांचा असा परिणामकारक वापर आणि तरी कथानकावर त्याचीच छाया न पडणं (हे असं भारी पडून पुस्तक उताणं होण्याचं उदाहरण म्हणजे ऋषिकेश गुप्तेंची 'दंशकाल') हे फार म्हणजे फार भारी आहे. <br />अजून एक. मला तुंबाड आणि अरुण साधूंची 'मुखवटा' आणि एलकुंचवारांची त्रिनाट्यधारा यांत काही साम्य कायम जाणवतात. ती या निमित्तानं नोंदते - ब्राह्मण आणि सरंजामशाही कुटुंब, शेतीवर होत गेलेले विपरित परिणाम, जातीची कमी होत गेलेली प्रतिष्ठा, बदलती कुटुंबसंस्था, बदलती समाजव्यवस्था आणि राजकारण, जोरकस स्त्रीव्यक्तिरेखा, जागतिकीकरणपूर्व काळ, स्थित्यंतरात होणारा एका जीवनशैलीचा विनाश, त्यातूनच दुसरीला धुमारे फुटणं, वाढतं शहरीकरण, निसर्गाशी बदलतं नातं, प्रादेशिक भाषा, सुरुवातीला काळ्या पांढर्या, मग मधला बराच काळ राखाडी आणि शेवटी काळ्या होत गेलेल्या व्यक्तिरेखा, काळाचा चक्राकार दाखवणारे विधी.<br />संगीताबद्दल लईच आभार. ऐकण्यात येईल.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.com