tag:blogger.com,1999:blog-31224934226049707642024-03-16T06:39:50.116+05:30व्यक्तानंदAnand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.comBlogger226125tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-53151509512171492282020-11-07T22:48:00.000+05:302020-11-07T22:48:12.177+05:30हरारी आणि आशुतोष प्रिय आशुतोष,<br /><br /><div>मागच्या आठवड्यात तुझ्या पोस्टला लगेच उत्तर देता आलं नाही. आज जरा मोकळा झालो म्हणून उशिरा उत्तर देतोय. <br /><br />हरारी आशादायक चित्र उभं करत नाहीत हे तर निर्विवाद आहे. किंबहुना २०१८ मध्ये न्यू यॉर्क टाइम्सच्या एका कार्यक्रमात हरारी आणि थॉमस फ्रीडमनची संयुक्त मुलाखत होती. त्यात आशावादी राहण्याचा फ्रीडमन साहेबांचा प्रयत्न ज्या सहजतेने हरारी उडवून लावत होते त्यामुळे मी एकाच वेळी आश्चर्यचकित आणि थोडा निराशही झालो होतो. आपल्याला ज्याचे विचार चिंतनीय वाटतात त्याच्याकडून आपल्याला आशावादी राहण्यासाठी जर पाठबळ मिळालं नाही तर होणारं दुःख ती मुलाखत ऐकल्यावर मी जवळपास एक आठवडाभर सहन करत होतो. <br /><br />त्याआधी २००८ मध्ये मला जॉर्ज कार्लिन हा स्टँडअप कॉमेडियन सापडला होता यूट्यूबवर. त्याचे सगळे व्हिडीओ बघायचा सपाटा लावला होता. पण शेवटी त्याचे life is worth losing आणि it's bad for you हे दोन प्रोग्रॅम्स बघताना मला नकोसं झालं होतं. कारण तेच. मानवजातीबद्दल आत्यंतिक निराशावाद. <br /><br />अर्थात कार्लीन आणि हरारी या दोघांच्यात तुलना करत नाही मी. कारण एक विनोदाच्या माध्यमातून समाजातील विसंगतींवर बोट ठेवणारा शब्दांचा खेळिया तर दुसरा विचारांशी खेळणारा आणि इतिहास व जीवशास्त्र या दोन विद्याशाखांचा संगम घडवून आणणारा अभ्यासक. तरीही दोघांच्या विचारांतील अंतिम निराशा मला खटकत होती आणि अजूनही खटकते हे अगदी खरं आहे. <br /><br />अशाप्रकारे त्या बाबतीत मी तुझ्या बरोबर असूनही तू पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे आणि शेअर केलेल्या लिंकमधील मुद्दे मला पटलेले नाहीत. का?, ते थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. तुझ्या विचारांपेक्षा वेगळा विचार वाचायला तू तयार असतोस म्हणून मी तुझ्या पोस्टबाबत डेव्हिल्स ऍडव्होकेट होतोय. <br /><br />डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑन. <br />१) <<<माणूस कितीही विचारवंत झाला तरी त्याच्या बालपणीच्या श्रद्धा त्याच्या मनात मागे रेंगाळत असतात. तिन्ही अब्राहमीक धर्मांमध्ये जगाचा अंत ही संकल्पना आहे. ..... जगण्याची जोरकस आशा ! साहेब ती देत नाहीत.>>> <br /><br /></div><div>बालपणीच्या श्रद्धा आणि हरारींच्या लेखनातील निराशावादी सूर हा मुद्दा मला मान्य आहे. भैरप्पांच्या उत्तरकांड या पुस्तकावरील <a href="https://www.anandmore.com/2020/04/blog-post_48.html" target="_blank">माझ्या पोस्टमध्ये</a> मीही तो मांडला आहे. पण हरारींनी आपल्या ज्यू धर्मातील धारणांना अनुसरून जगाच्या अंताबद्दल भाकीत वर्तवणे आपल्याला मान्य नसणे हे आपल्या बालपणीच्या संस्कारांचा तर परिणाम नसेल ना? आपल्या हिंदू संस्कृतीत प्रलयानंतर पिंपळाच्या पानावर पायाचा अंगठा चोखत असलेला श्रीकृष्ण हे नवसृजनाचे प्रतीक आहे. आणि कदाचित ते आपल्या मनाच्या तळाशी इतके खोल जाऊन रुजले आहे की आपण त्याला छेद जाणारी कुठलीही कल्पना स्वीकारू शकत नाही. जेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला तेव्हा मी हरारी ज्यू धारणांप्रमाणे लिहीत असतील ही शक्यता मान्य करायचं ठरवलं. मग त्यांच्या विचारांची धार्मिक सत्यासत्यता बाजूला ठेवून वास्तव आयुष्यात जीवशास्त्रीय पुराव्यांशी सांगड घालायचा प्रयत्न केला. त्यासाठी माझ्या मनातील बाळकृष्णाला बाजूला ठेवला. तेव्हा मला पृथ्वीवरील कुठल्याही जीवमात्रांशी भावनिक बंध नसलेला निसर्ग दिसतो. पृथ्वीवर आपल्याला माहित असलेल्या प्राण्यांच्या असंख्य प्रजाती माणसाने पृथ्वीचा अनिर्बंध उपभोग घ्यायला सुरवात करायच्या आधी अशाच नष्ट झालेल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल निसर्ग हळहळ करीत बसलेला आहे असं कुठे जाणवत नाही. त्यामुळे आपल्या मनातील पिंपळपानावरचा बाळकृष्ण बाजूला ठेवला तर हरारींनी मांडलेला जगाचा अंत ही केवळ धर्मकल्पना न वाटता निरीक्षण आणि अनुमान वाटू लागतं. <br /><br />२) <<< हरारी त्याच्या अलिप्त पावित्र्यामध्ये गंभीर चेहऱ्याने म्हणतो : "करोनाच्या निमित्ताने उघडकीस आलं आहे की जागतिक नेतृत्व नाही ....... त्या नेतृत्वाची ताकतच मुळात केवढी असेल! किती सहज शक्य असेल त्या सत्तेला सगळ्यांनाच गुंडाळणं .>>> <br /><br /></div><div>माझ्या मते हरारी इथे नेतृत्व म्हणजे व्यक्तींबद्दल बोलत नसून नेतृत्व या गुणविशेषाबद्दल आणि तो निर्माण करताना आणाव्या लागणाऱ्या व्यवस्थांबद्दल, मूल्यांबद्दल बोलत आहेत. सध्याची राष्ट्र राज्य संकल्पना आणि त्यानुसार तयार झालेली मूल्यव्यवस्था जागतिक अरिष्टांसाठी अपुरी आहे असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला जाणवला. जर नवी मूल्यव्यवस्था आणि त्याप्रमाणे संस्थात्मक व्यवस्था निर्माण केली तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशाही नेतृत्व तयार होणार नाही. अर्थात हे होणे नजीकच्या काळात शक्य नाही त्यामुळे हरारींचा सूर निराश होणे अगदी स्वाभाविक आहे. सध्याच्या मूल्यव्यवस्था आणि शासनव्यवस्था तशाच ठेवून जर आपण जागतिक नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करणार असू तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशहा तयार होणे अटळ आहे. पण सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून मत मांडणारे हरारी या बाबतीत वरवरचा विचार करून सार्वजनिक व्यासपीठावर मत मांडतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील जागतिक नेतृत्व हे नव्या मूल्यव्यवस्था आणि संस्थांही उभ्या कराव्या लागतील या गृहितकावर आधारित आहेत असं मला वाटलं. किंबहुना इथे मला ज्यू हरारी चक्क हिंदूंची वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना जागतिक नेतृत्व उभं करण्यासाठी महत्वाची आहे असं मांडताहेत असं वाटलं. <br /><br />३)<<<सध्या हरारी नेत्यानाहू सरकारवर सारखा टीका करतो. नेत्यानाहूच्या तरुण मुलाने त्याला ट्विटरवरती झोडलंही. अनेक विचारवंत बघता बघता अलगद ट्रॅपमध्ये अडकून किंवा स्वखुशीने अशा आडपडद्याच्या राजकारणात उतरतात. .... का तो विचारवंतांच्या स्वधर्माला जागतो आहे ?>>> <br /><br /></div><div>हरारी आपल्या मतासाठी जर समाजमाध्यमांवर सक्रिय असेल तर त्यामुळे त्याच्या मतांचं महत्व कमी न होता उलट ते अजून वाढतं. हरारी पैसे घेऊन इतरांच्या उद्दिष्टाला साजेशी लोकभावना तयार करण्याचे कारस्थान करत असेल हा आरोप मला मान्य करायला कठीण वाटतो. पण एका क्षणासाठी तो खरा आहे असं मानलं तरीही केवळ त्याने सुपारी घेऊन असे लेख लिहिले असं मान्य केलं तरीही त्याच्या लेखात त्याने मांडलेल्या मुद्द्यांत तथ्य आहे की नाही हे शोधणे आणि ते नसल्यास तसे हरारींच्या निर्विकारपणे मांडणे हे हरारी विरोधकांचे कर्तव्य आहे. त्याने सुपारी घेऊन असं लिखाण केलं असेल असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. <br /><br />तू जो लेख शेअर केला आहेस, तो मी वाचला. पण त्यातही मला आशावादी राहण्याची आपली मानसिक गरज पूर्ण करण्याची धडपड जास्त जाणवली. आपण आशावादी राहणं ही आपली गरज आहे, निसर्गाची नाही हे मी आता मान्य केलं आहे. किंबहुना आपण आशावादी आहोत ही देखील निसर्गाची आपोआप तयार झालेली एक गुंतागुंत आहे हेही मला मान्य आहे. कदाचित निसर्गाने दिलेल्या या आशावादाच्या बळावरच आपण किंवा आपल्या भावी पिढ्यांतील कुणी वंशज प्रलयानंतरच्या पाण्यावर तरंगणाऱ्या पिंपळपानावरच्या श्रीकृष्णाला पाहू शकणार आहेत ही शक्यताही मला मान्य आहे. पण म्हणून पृथ्वीपासून दूर दहाहजार किलोमीटरवर असलेल्या यानातून पृथ्वीकडे निर्विकारपणे बघत इथल्या सजीवांचा इतिहास आणि भविष्य सांगण्याची हरारींनी विकसित केलेली विचारपद्धती नाकारून काहीच फायदा नाही. किंबहुना त्यामुळेच आपण येणारे संभाव्य धोके लवकर ओळखून त्यावर उपाय शोधून जगाचा अंत टाळू शकतो. असं मला वाटतं. <br /><br />डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑफ. <br /><br />माझ्या पोस्टच्या सुरवातीला मी हरारींच्या एका मुलाखतीचा उल्लेख केला आहे. ती खाली देतो. </div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/5chp-PRYq-w" width="320" youtube-src-id="5chp-PRYq-w"></iframe></div><br /><div>थोडी निराशाजनक आहे. पण फ्रीडमन साहेबांनी ज्या पद्धतीने आशावादाचा किल्ला लढवला आहे ते मला फार आवडलं आहे. आणि शेवटी त्यावरची हरारींची प्रतिक्रयाही मला आवडली आहे. मुलाखत थोडी मोठी आहे (साधारण सव्वा तास). त्यामुळे तुला मोकळा वेळ असेल तेव्हा बघ.</div>Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-17593667660072217372020-11-07T22:26:00.000+05:302020-11-07T22:26:06.575+05:30गब्बर सिंग सोसायटीत दहा मजले. प्रत्येक मजल्यावर चार बिऱ्हाडं. कमिटीने ठरवलं की रोज सकाळी प्रत्येक मजला निर्जंतुक करण्यासाठी डेटॉल वापरून लिफ्ट, जिन्याची रेलिंग्ज आणि लादी साफ करायची. प्रत्येक घरावर आळीपाळीने आपापल्या मजल्याची जबाबदारी. <div><br /></div><div>रोज कोणी ना कोणी सोसायटीच्या ग्रुपवर आपापला मजला स्वच्छ केल्याचा मेसेज टाकायचा. मी तेव्हा लेक्चर्स घेत असल्याने मला या स्वच्छतासंग्रामात भाग घेऊन मर्दुमकी दाखवण्याची संधी मिळत नव्हती. </div><div><br /></div><div>आज रविवार. लेक्चर्स नसल्याने सकाळी मला मोकळा वेळ होता. म्हणून मी कालच ग्रुपवर मेसेज टाकला होता की रविवारी सकाळी आमचा मजला मी स्वच्छ करणार. माझा स्वभावच तसा आहे. इतर कुणी काम केलं की मलाही करावंसं वाटतं. </div><div><br /></div><div>पण नेमकी मी काल सेंटर टेबलच्या अवस्थेची पोस्ट इथे फेसबुकवर टाकली. आणि आज सकाळी बघतो तर काय! </div><div><br /></div><div>माझे तीनही शेजारी दारात उभे.. त्यांच्या चेहर्यावर विलक्षण ताण. हा बाबा साफ करणार म्हणजे काय तोडणार असे भाव स्पष्टपणे वाचता येत होते. </div><div><br /></div><div>मी फ्लोरिंगवर मॉप चालवायला घेतला तर प्रत्येकाने आपापल्या चपला उचलून चटकन घरात घेतल्या. मी रेलिंग्ज साफ करायला गेलो सगळे आपापल्या घराच्या उंबरठ्यावर टाचा उंचावून मी रेलिंग्ज वाकवतो की काय ते बघू लागले. आणि जेव्हा मी लिफ्टची बटणं पुसायला सुरवात केली तेव्हा तर सगळेजण उंबरठ्यावर न आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडून लिफ्टच्या दाराजवळ उभे राहिले. 'सावकाश.. हळू... आरामात... जोर नका लावू' अशा उद्गारांचा एकंच गलबला झाला. मी लिफ्टमधून बाहेर आलो आणि बघितलं तर बाहेरच्या विस्कळीत गर्दीत नवव्या आणि दहाव्या मजल्यावरचे लोक, माझ्या जड असलेल्या हातानं एकदाचं नाजूक काम केलं आणि त्यांच्या पुढील पंधरा दिवसांच्या आयुष्यात जिने चढ उतार करायला न लावल्याबद्दल साश्रू नयनांनी माझं कौतुक करत होते. एकदोघांनी तर फक्त लोटांगण घालणंच बाकी ठेवलं होतं. </div><div><br /></div><div>मला एकदम गब्बर सिंग असल्याचा फील आला. </div>Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-30690963716981937832020-04-11T22:58:00.001+05:302020-04-11T22:58:36.819+05:30हुकमी एक्का <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सकाळी झाडू मारत होतो. बायको कौतुकाने माझ्याकडे बघत होती. आई माझ्याकडे काळजीयुक्त वात्सल्याने आणि कौतुकाने बघत होती. सासरे माझ्याकडे विजयी वात्सल्याने आणि स्वतःच्या लेकीकडे कौतुकाने बघत होते.<br /><br />चार चाकं असलेलं काचेचं सेंटर टेबल मी जोरात सरकवलं. कडाडकड असा आवाज आला. घरातल्या दशदिशा दुमदुमल्या. सगळे चपापले. व्हिडिओ गेम खेळणारा धाकटा लेक दचकला आणि गेममधला त्याचा सैनिक गतप्राण झाला. व्हॉटस अॅपवर चॅटिंग करत असलेला मोठा लेकही दचकला. चुकून त्याने भलतीच स्मायली चॅटवर पाठवली असावी. कारण नंतर त्याच्या तोंडून चक् चक् असा विषाददर्शक उद्गार आला आणि एकाएकी त्याची फोनवरची धावपळ वाढली. <br /><br />ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या डौलदार सेंटर टेबलच्या चार चाकांपैकी एक चाक मोडून पडलं होतं. आणि शिवधनुष्य मोडून सीतेकडे प्रेमाने पहाणार्या विजयी रामाऐवजी, ते छातीवर पडलेल्या पराभूत रावणासारखा चेहरा करून उभा राहिलो. (रामायण बघण्याचे अप्रत्यक्ष फायदे होतात ते असे)<br /><br />बायकोच्या चेहऱ्यावरील कौतुक मावळून तिथे क्रोधाग्नी प्रकटला. आईच्या चेहर्यावरील कौतुक मावळून तिथे काळजी आणि चिंतेने घर केलं. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील विजयी कौतुकाची भावना जाऊन तिथे 'तरी मला वाटलंच होतं की याच्यापेक्षा चांगला मुलगा मी माझ्या राजकुमारीला नवरा म्हणून शोधून दिला असता. पण काय करणार माझ्या छोट्या परीला हाच गडबड्या आवडला' असे भाव आले.<br /><br />आणि एकाएकी मला जाणवलं की वॉशिंग मशीन, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या वरखाली करुन देणं, भांडी घासणं, केर काढणं आणि लादी पुसणं यातल्या कित्येक कामांपासून सुटका करून घेण्याचा हुकमी एक्का माझ्या हाती लागला आहे. आता विजयी हास्य करायची पाळी माझी होती.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-4923724115797097052020-04-11T22:48:00.001+05:302020-04-11T22:48:25.503+05:30हरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सकाळी अमेय गोखलेनी चॅनेल 4 या ब्रिटिश टिव्ही कंपनीच्या, एक आठवड्यापूर्वीच्या एका कार्यक्रमाची लिंक फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनाच्या निमित्ताने युआल नोहा हरारींच्या मुलाखतीची ती लिंक होती. हरारींनी मांडलेले मुद्दे मला महत्वाचे वाटले. <div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/toEjjAQzjvQ/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/toEjjAQzjvQ?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /><br />1) कोरोनाच्या काळात आपण कुठले निर्णय घेतो त्यावर आपलं पुढील जग कसं असेल ते ठरेल.<br />2) सध्या सर्व गोष्टींचा वेग अचानकपणे आत्यंतिक प्रमाणात वाढला आहे. ज्या गोष्टींवर वीस वीस वर्षे केवळ चर्चा होत होती त्या गोष्टी आता एकेका आठवड्यात अमलात आणल्या जात आहेत.<br />3) यातून बाहेर पडण्यासाठी सरकारे सर्वाधिकार आपल्याकडे घेऊ शकतात किंवा नागरिकांना अधिकार देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.<br />4) नागरी स्वातंत्र्याचा संकोच इतक्या सहजपणे करता आला आहे, तर सरकारे हे नियंत्रण सहजासहजी आणि चटकन सोडणार नाहीत.<br />5) अशा साथीच्या रोगात आपल्याला आवश्यक असलेलं जागतिक नेतृत्व आपल्याकडे नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेलं नेतृत्व देशपातळीवरील आहे.<br />6) आताच्या देशपातळीवरील नेतृत्वाने कात टाकून जरी जागतिक जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर देशांना त्याबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यामुळे जागतिक नेतृत्वाची आत्यंतिक गरज असूनही ते नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणार नाही.<br />7)सर्व देशातील राजकीय नेतृत्व आपल्या संपूर्ण देशाचं नेतृत्व न करता त्यातील एका गटाचं नेतृत्व करतात. साधारण राजकीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ही बहुमताची व्यवस्था कामाला येऊ शकते पण साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी बहुमताची नसून सर्वांच्या एकमताची गरज आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपला गट - विरोधी गट अशी मांडणी करणं थांबवलं पाहिजे.<br /><br />मुलाखत संपवली आणि वर्गात गेलो. आज इंटरप्रिटेशन अॉफ स्टॅच्यूट्स (कायद्यांचा अर्थ कसा लावावा) हा विषय होता. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो की कायद्याचा अर्थ लावताना न्यायाधीशाने कायद्यात नसलेले शब्द किंवा कलमे स्वतः घालू नये आणि असलेले शब्द किंवा कलमे स्वतःहून गाळू नयेत. न्यायाधीशाचं काम दिलेल्या कायद्याचा अर्थ लावणं आहे, कायदा बनवणं नाही. कायदा बनवण्याचं काम संसदेचं आहे.<br /><br />मुलांनी विचारलं, 'न्यायाधीशांनी जर न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे तर ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक ज्ञानी आहेत. मग कायद्यातील त्रुटी दूर करण्याचं किंवा कायदा बनवण्याचं काम न्यायाधीशांना न देता, कायद्याची जुजबी किंवा काहीच माहिती नसलेल्या त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना का दिलं आहे?'<br /><br />त्यांना उत्तर देताना म्हणालो,<br />'कायदा म्हणजे समाजाला वळण देण्याचं शास्त्र आहे. हे गणित किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्राप्रमाणे नैसर्गिक विज्ञान नाही.<br /><br />नैसर्गिक विज्ञानात बहुमत आणि तज्ज्ञ यांच्या तुलनेत बहुमतापेक्षा तज्ज्ञांचं पारडं कायम जड असतं. संपूर्ण मानवजात जरी पृथ्वीभोवती विश्व फिरत आहे असं म्हणत असली तरी पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नसून ती सूर्याभोवती फिरते हे सांगणारा एकटा कोपर्निकस बरोबर असतो. म्हणजे नैसर्गिक शास्त्रात बहुमताकडे दुर्लक्ष केल्याने समाजाचं नुकसान होईलंच याची खात्री नसते; झालाच तर फायदा होणार असतो.<br /><br />याउलट सामाजिक शास्त्रांत मागील परंपरांना वळण देत भविष्य साकारायचे असते. त्यामुळे मागील परंपरांना, चालीरीतींना. रितीरिवाजांना, मान्यतांना. धारणांना धक्का लावताना फार काळजी घ्यावी लागते. तशी घेतली नाही तर लोकांना कायदा पाळावासा वाटत नाही. तो कागदावरच रहातो परिणामी शेवटी संपूर्ण समाज कागदोपत्री गुन्हेगार ठरु शकतो आणि भ्रष्टाचाराला मोकळं कुरण मिळतं. त्यामुळे कायदा तयार करताना न्यायशास्त्रातील एका तज्ज्ञाऐवजी लोकांतून आलेली शंभर डोकी डोकी असतील तर अतिशय आदर्श पण सामाजिक वास्तवापासून दूर असलेली व्यवस्था न बनता कदाचित कमी आदर्श पण लोकांच्या धारणांतून तयार झालेली व्यवस्था बनू शकते. आणि अशी व्यवस्था जास्त प्रमाणात अंगिकारली जाऊ शकते. कालांतराने तिच्यात पुन्हा बदल करून तिला अजून आदर्शवत करता येऊ शकते. <br /><br />म्हणजे सामाजिक शास्त्रांचा उद्देश नैसर्गिक सत्याची प्रतिष्ठापना नसून सामाजिक सलोख्यातून समाजोन्नती असा असतो. नैसर्गिक शास्त्रे सत्य प्रस्थापित करुन पुढे जात असतात. याउलट सामाजिक शास्त्रे सत्य पुढे ठेवून आता त्याला गाठण्यासाठी महामार्ग तयार करत असतात. <br /><br />त्यामुळे सामाजिक शास्त्रांचे नियम बनवताना एका तज्ज्ञापेक्षा अनेक साधारण लोकांच्या मतांना जास्त किंमत असते.'<br /><br />मुलांचं शंकानिरसन झालं. मी पुढे शिकवत राहिलो. पण सकाळी ऐकलेली हरारांची मुलाखत डोक्यात होती. त्यातला समाजातील बदलांची गती वाढण्याचा आणि एका गटाचं नेतृत्व करत संपूर्ण समाजावर आपली मतं लादणाऱ्या कोत्या नेतृत्वाचा मुद्दा, मी मुलांना दिलेल्या उत्तराबरोबर खेळू लागला. <br /><br />आणि मनात विचार आला की भविष्यात व्यवस्था आणि नेतृत्व कसं असावं याचा निर्णय सामाजिक शास्त्रांचा भाग असूनही आता कदाचित तो नैसर्गिक शास्त्रांपणे बहुमताऐवजी तज्ज्ञांकडे सोपवणं अधिक योग्य ठरेल का? </div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-81664215705953055202020-04-11T22:38:00.001+05:302020-04-11T22:40:58.398+05:30भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2020/04/blog-post_48.html" target="_blank">भाग १</a> । <a href="https://www.anandmore.com/2020/04/blog-post_88.html" target="_blank">भाग २</a></div>
<br />
रामकथा भारतीय उपखंडात पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तिची वेगवेगळी रूपं दिसतात आणि लोककथांतही तिची अनेक उपकथानकं सापडतात. आता जरी मला आठवत नसलं तरी आई सांगते की लहानपणी रोज रात्री बाबांच्या मांडीवर झोपताना गोष्ट सांगायचा हट्ट करायचो आणि त्यात जेव्हा श्रावणबाळाची गोष्ट यायची तेव्हा हमखास रडत रडत झोपी जायचो. मला खात्री आहे की दूरदर्शन आणि मनोरंजनाची अन्य साधने नसलेल्या अनेक शतकांत भारतीय उपखंडातील अनेक पालकांना रामायणाने हात दिला आहे आणि आपापल्या लेकरांचा किंवा नातवंडांचा, गोष्टींचा हट्ट पुरा करण्यात मदत केली आहे. अर्थात यामुळे प्रत्येक घरात रामकथेत भर पडत गेली असावी. <br />
<br />
जितकी प्रसिद्ध रामायणे आहेत आणि रामाच्या बाबतीत जितक्या लोककथा आहेत त्या सगळ्या वाचणं मला शक्य नाही. तसेच देशोदेशींच्या पुराणकथांत मला रस असला तरी त्यात माझा व्यासंग नाही. पण जितकं तोडकंमोडकं वाचन मी केलेलं आहे त्यावरून मला जाणवलं आहे की प्रत्येक समूहाच्या पुराणकथांतून त्या समूहाच्या मान्यतांचा आणि संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहात असतो. आणि जसजशा त्या कथा लोकप्रिय होऊ लागतात तसतसे हे अंतःप्रवाह अजून ठळक होऊ लागतात. <br />
<br />
नियती ही जागतिक संकल्पना आहे. त्यामुळे जगातील सर्व पुराणकथांत नियती आपलं अस्तित्व दाखवत असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना या नियतीच्या अदृश्य धाग्याने बांधलेल्या असतात ही कल्पना आपल्याला अनाकलनीय आयुष्यात आधार देत असते. पण नियती ही शक्ती सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्वसामान्य प्रसंगांना उलगडण्यासाठी इतरांपेक्षा अधिक समर्पकपणे केवळ भारतीय परंपरेने वापरली आहे. कारण आपण नियती नामक शक्तीला कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या दोन चाकांवर चालणाऱ्या व्यवस्थेत बसवले आहे. त्यामुळे आपल्याकडे नियतीबरोबर प्राक्तन नावाची अजून एक संकल्पना तयार होते. <br />
<br />
संस्कृती म्हणजे जीवनपद्धती मानली तर धर्म म्हणजे संस्कृती निर्माण करण्यारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. धर्म साधारणपणे दोन प्रश्नांचं उत्तर देतो. 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?' <br />
<br />
पाश्चात्य जगात अनेक संस्कृती नांदत होत्या पण त्या सर्वांना मध्यपूर्वेत जन्म घेतलेल्या तीन अब्राहमिक धर्मानी गिळून टाकले आहे. त्यामुळे त्या मृत संस्कृतीतील पुराणकथांतून या दोन प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती आता निरुपयोगी ठरली आहेत. अब्राहमिक धर्मात 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे? या प्रश्नालाही उत्तर कायम 'देवाची इच्छा' इतकंच असतं. प्राप्त नियतीला स्वीकारून तुम्ही कराराचं पालन करणं इतकंच तुमच्या हातात असतं. आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे की नाही याचा निर्णय अंतिम निवाड्याच्या दिवशी केला जाणार असतो. <br />
<br />
या अंतःप्रवाहामुळे माणसे चांगली किंवा वाईट वागतात. अवतार वगैरेची भानगड नसते. माणूस आणि देव असा सरळसोट मामला असतो. माणसे देवाशी नवा करार करू शकतात. माणसे स्वतःला प्रेषित घोषित करू शकतात. आणि इतर माणसे त्याला खोटं ठरवू शकतात. अनेक तोतये प्रेषित तयार होतात. एखादा प्रेषित समाजमान्य व्हायला त्याची हयात उलटून जावी लागते. प्रेषिताला त्याच्या हयातीत विरोधकांकडून आणि अनुयायांकडूनही त्रास भोगावा लागतो. त्याचं कारणही परमेश्वराची इच्छा इतकंच असतं. <br />
<br />
प्रेषिताला जे अनुयायी मिळालेले असतात त्यांच्या सामाजिक स्थानावरून प्रेषिताचा संदेश बहुसंख्यांना मान्य होणार की नाही ते ठरते. लोक जुना प्रेषित सोडून नवा प्रेषित घेऊ शकतात. जुन्या प्रेषिताला मानणारे आणि नव्या प्रेषिताला मानणारे अश्या अनेक सरळ रेषा समाजात तयार होतात. ग्रंथप्रामाण्य वाढते. प्रेषिताचं आयुष्य आदर्श मानल्यामुळे त्याच्यासारखं वागण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण या सर्वांहून सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील प्रसंगांची जबाबदारी प्रेषितांवर पडते. त्यामुळे ते प्रसंग जर सद्यकाळाशी सुसंगत असतील तर त्यांचा उदोउदो होत राहातो. आणि विसंगत असतील पण प्रचलित इतिहासातून त्यांना वगळणं अशक्य असेल तर त्यांचं दुबळं समर्थन केलं जातं किंवा मग त्याबद्दल मौन बाळगलं जातं. त्यामुळे प्रेषितांच्या मागे कदाचित थोड्या वेगळ्या रेषेत चालणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो. पण प्रेषितापासून कितीही तिरक्या कोनात चालले तरी सगळे प्रेषितांच्या मागे चालणारे असतात. समांतर चालणारे कुणीच नाही. <br />
<br />
<div>
याउलट भारतात मात्र एकाच वेळी अनेक संस्कृती नांदत होत्या आणि इथेच अनेक धर्मांचा जन्मही झाला. इथे जन्म झालेल्या प्रमुख धर्मांपैकी शीख धर्म सोडल्यास इतर प्रत्येक धर्माने या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरी वेगवेगळ्या प्रकारे केला असला तरी त्या सर्व धर्मात एक सूत्र समान दिसतं की त्यांनी 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?' या दोन्ही प्रश्नांना एकत्र गुंफलं आहे. आत्मा न मानणारा बौद्ध धर्म असो किंवा आत्मा मानणारा जैन धर्म असो किंवा मग अनेकेश्वरवाद आणि आपापल्या पूर्वजपरंपरा जपणाऱ्या पुराणप्रिय लोकांचा इतरांनी नाव दिलेला हिंदू धर्म असो. या सर्वात पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांना नियतीबरोबर महत्व आहे. <br />
<br />
त्यामुळे 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर मात्र 'या जन्मीच्या उत्तम कर्माचं फळ पुढील जन्मात मिळणार आहे.त्यामुळे पुढील जन्म हीनयोनीत न होता उत्तमयोनीत मिळावा आणि त्या जीवनात सर्व सुखे मिळावीत म्हणून तुम्हाला धर्म सांगेल त्या पद्धतीने वागणं आवश्यक होतं. या पद्धतीने तुम्ही या जीवनातील तुमच्या सुखदुःखांचे शिल्पकार नसलात तरी पुढील जन्मातील सुखदुःखांचे शिल्पकार असता. त्यामुळे तुमच्या पुनर्जन्मातील सुखदुःखाची जबाबदारी तुमच्या या जन्मातील कृत्यांवर सोपवून आपल्या भूमीत जन्माला आलेले तीनही प्रमुख धर्म मोकळे झालेले आहेत. <br />
<br />
अश्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रेषिताचा जन्म होण्याची गरजच संपून जाते. देवाशी करार करण्याचीही आवश्यकता नाही. मग आदर्श जीवन कसे जगावे ते सांगण्यासाठी जैन आणि बौद्ध धर्म सोडल्यास इतर भारतीय लोकांना मान्य असणाऱ्या, पूर्वजपरंपरा मानणाऱ्या लोकांच्या धर्मात पुरुषोत्तम स्वरूपात अवतार घेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष देवावर येते. आणि मग अधर्माचा प्रभाव वाढू लागला की विविध युगात परमेश्वर अवतार घेतो. <br />
<br />
परमेश्वराच्या त्या अवताराचे आयुष्य हा अनेकांसाठी आदर्श ठरते पण त्याचे अनुकरण करणे मात्र अपेक्षित नसते. जे प्रत्यक्ष परमेश्वराने अधर्माचा नायनाट करण्यासाठी घेतलेल्या अवतारात केलं ते आता मी करायची गरज नसते. मी आपला माझ्या पुढील जन्मातील सुखांची बेगमी करण्यात स्वतःला गुंगवून ठेवू शकतो. अश्या प्रकारे आदर्श आणि त्याला मानणारे यांची आयुष्ये एकमेकांना समांतर चालत राहतात. लोक देवाची आणि त्याची अवताराची पूजा करतात पण त्याचे अनुकरण करत नाहीत. त्याच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत राहतात पण त्या कथाकथनाचा उद्देश मात्र केवळ भक्ती वाढावी, नम्रता अंगी यावी, आणि पूर्वजपरंपरा चालत राहावी इतकाच असतो. <br />
<br />
या पूर्वजपरंपराअनुयायी धर्मात इथपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण एकदा का अवतार संकल्पना आली की 'तूच आहेस तुझ्या पुढल्या जन्माचा शिल्पकार' या मान्यतेला सुरुंग लागतो. कारण या अवताराला त्याच्या आयुष्यात जे दुःख भोगावे लागते त्याचं कारण म्हणून त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांची कारणपरंपरा सांगता येत नाही. अवताराला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नसल्याने त्याला कर्मसिद्धांत लागू होत नाही. त्यामुळे मग अवताराला दुःख का भोगावं लागलं? आणि अवताराने चांगलं का वागावं? यांची उत्तरं देणं कठीण होऊन जातं. <br />
<br />
'अवताराने चांगलं का वागावं?' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन बसतं. म्हणून मग शाप संकल्पना वापरली जाते. मग श्रावणबाळ येतो. शब्दवेधी बाण येतो आणि शेवटी पुत्रवियोग येतो. <br />
<br />
अश्या प्रकारे सर्वसामान्य माणसांचे प्राक्तन त्यांच्या पूर्वजन्मावरुन ठरते याउलट अवतारांचे प्राक्तन त्यांना किंवा त्यांच्या जवळच्यांना मिळालेल्या शापावरून ठरते. <br />
<br />
अर्थात भारतीय पुराणकथांत आणि अब्राहमिक धर्मांच्या पुराणकथांत एक समान धागा असतो की, चरित्रनायकाच्या आयुष्यातील कथांचे पूर्ण कार्यकारणभाव दिले आणि त्यांच्या भावभावनांचे चित्रण केले तरी त्यांच्याबरोबरच्या लोकांचे भावविश्व् आणि त्यांची झालेली फरफट याबद्दल सर्व पुराणकथा मौन बाळगतात. त्यामुळे कौसल्या, लक्ष्मण, सीता, तारा, मंदोदरी, कुंभकर्ण, इंद्रजीत या सगळ्यांचे भावविश्व् आपल्यासमोर लोकप्रिय ग्रंथातून येत नाही. त्याचप्रमाणे येशूची आई मेरी किंवा पिता जोसेफ किंवा प्रेषित मुहम्मदांची अल्पवयीन पत्नी आयेषाचे भावविश्व् तितक्याच बारकाईने आपल्या समोर येत नाही. अब्राहमिक धर्मात ग्रंथप्रामाण्य असल्याने त्यात लोककथांना फार स्थान नाही. याउलट आपल्याकडे ग्रंथप्रामाण्य नसल्याने लोककथांनी अनेक प्रक्षेप मूळ कथेत घुसडले आहेत. <br />
<br />
अब्राहमिक धर्मात प्रेषितांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दलही परमेश्वराची इच्छा हे स्पष्टीकरण देता येते. प्राक्तनाची झंझट नसल्याने, प्रेषित प्रवृत्तीप्रवण असूनही ते नियतीशरण दाखवता येतात. पण अवतारी पुरुषांच्या आयुष्यातील चमत्कारांचे आवरण बाजूला काढून त्यांच्या आयुष्यातील कार्यकारणभाव उलगडणे अतिशय कर्मकठीण असते. कारण इथला समाज आता नियतीशरण आहे. प्राक्तन आता आपल्या नेणिवांचा भाग झालेले आहे. इथला समाज आपल्या पूर्वजन्मातील कर्मफळांना भोगण्यास तयार आहे. त्या समाजाचा आदर्श आता नियतीशरण दाखवावा की प्रवृत्तीप्रवण दाखवावा? ही मोठी गुंतागुंत आहे. त्याला प्रवृत्तीप्रवण दाखवणे आवश्यक आहे. कारण तो धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेला आहे. पण त्याला नियतीशरण दाखवणे अशक्य आहे. शाप उ:शाप कल्पना वापरून आपण फारतर त्यांनी भोगलेल्या दु:खाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पण त्यांनी जवळच्या व्यक्तींवर आणि संपूर्ण समाजावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणं अशक्य असतं. म्हणून अवतारी पुरुषांचे सगळे वर्तन दैवी ठरवून आपण त्याला योग्यायोग्यतेच्या कसोट्या लावणं टाळतो. <br />
<br />
अश्या वेळी जेव्हा भैरप्पा सीतेच्या दृष्टिकोनातून चमत्कार बाजूला करून रामकथा सांगायचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सध्याचे सत्ताधारी असतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचताना अजून नवनवीन प्रश्न पडत जातात. किंबहुना, हे प्रश्न भैरप्पांना पडले नाहीत का? आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे? हा प्रश्न सतत पडत राहतो. <br />
<br />
लक्ष्मण, वसिष्ठ, सीता, गुहराजा, सुमंत या सगळ्यांबरोबर राम ज्या वेळी चर्चा करतो तेव्हा तो सारासार विचार करणारा राजा न वाटता; एककल्ली, हेकेखोर आणि बेजबाबदार राजपुत्र वाटतो. आपल्या निर्णयांचा सीतेवर, लक्ष्मणावर, कौसल्येवर, दशरथावर काय परिणाम होईल त्याचा विचार तर सोडाच पण आपल्या निर्णयाचा प्रजेवर, राज्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू न शकणारा, प्रजेला भ्रष्टाचार करु शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सोडणारा आणि प्रजेला साठेबाजीच्या व करचुकवेगिरीच्या सवयींकडे ढकलणारा राजा म्हणून समोर येतो. वनवासाहून परत आल्यावर तो अयोध्येच्या राज्यकारभाराची घडी पूर्ववत करू शकत नाही. ते करण्यासाठी भैरप्पा शेवटी लक्ष्मणालाच पुढे आणतात आणि राम एकांतवासात दु:खी आहे असं दाखवतात. त्याचा शेवटही एकाकी करून दाखवतात. <br />
<br />
वडिलांचा शब्द खाली पडू नये आणि राज्यलोभी असा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून भैरप्पांचा राम अन्य सर्व आप्तस्वकीयांना, प्रजाजनांना आणि राज्याला ज्या गर्तेत ढकलतो ते बघून रामचरित्र वापरून सध्याच्या पंतप्रधानांच्या कठोर निर्णयांचं समर्थन करण्याचा भैरप्पांचा प्रयत्न असला तर तो किमान माझ्यासारख्या वाचकांपुरता तरी साफ फसला आहे. <br />
<br />
रामकथा माझ्या जीवनाचा भाग आहे. लहानपणी अंधारातून जाताना वाटणारी भीती मी रामरक्षा म्हणत पळवून लावलेली आहे. अजूनही कधी देवळात गेलो तर 'ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं' अशी ती राममूर्ती पाहून माझे हात पूर्वसंस्कारामुळे आपोआप जोडले जातात. पण रामाच्या राजकीय आयुष्यातील कुठल्या भागाचा आदर्श सध्याच्या किंवा कुठल्याही काळातील राज्यकर्त्यांनी घ्यावा ? या प्रश्नाचं माझ्यासाठीच उत्तर तरी एकाही भागाचा आदर्श घेऊ नये असंच आहे. आणि भैरप्पांच्या उत्तरकांडाने ते अधोरेखित केलं आहे. <br />
<br />
समाप्त</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-58113020100159761802020-04-11T22:33:00.000+05:302020-04-11T22:40:12.661+05:30भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग १)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2020/04/blog-post_48.html" target="_blank">भाग १</a> । <a href="https://www.anandmore.com/2020/04/blog-post_88.html" target="_blank">भाग २</a></div>
<br />
लेक्चर संपवून बाहेर आलो. फेसबुकवर फेरफटका मारला. सरकारने रामायण सिरीयल पुन्हा दाखवायचं ठरवल्याचं कळलं. आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. <br />
<br />
दर रविवारी सकाळी कराटेच्या क्लासवरून लगबगीने घरी जायचं. कारण रामायणाचा एपिसोड बघायचा असायचा. ते 'सीता राम चरित अति पावन' सुरु होत असताना आम्ही चाळीच्या जवळपास पोहोचलेलो असू. घराघरातून त्या शीर्षक गीताचे सूर येऊ लागत आणि मग मी व माझा धाकटा भाऊ घराकडे अक्षरश: धाव घेत असू. दारासिंगचा हनुमान, हनुमान उडण्याचे स्पेशल इफेक्ट्स, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आधी पानाचं दुकान चालवत ही माहिती, विजय अरोराचा नाटकी इंद्रजीत आणि ती हवेतल्या हवेत होणारी बाणांची लढाई; सगळ्या गोष्टी आठवल्या. बालपणीचा काळ सुखाचा म्हणावं अश्या रम्य आठवणींच्या अवस्थेत काही क्षण गेले. आणि मग वीस जानेवारीला पुण्यात एस एल भैरप्पांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो ते आठवलं. <br />
<br />
कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जे घडतं तेच भैरप्पांच्या बाबतीत माझ्या मनातही घडलं होतं. 'वंशवृक्ष' नंतर 'पर्व' नंतर 'माझं नाव भैरप्पा'' नंतर 'सार्थ' नंतर 'मंद्र असा प्रवास केल्याने माझा आवडता झालेला हा लेखक नंतर 'धर्मश्री', 'परिशोध', 'काठ' वाचताना थोडा रटाळ वाटू लागला. त्यांची स्त्रियांबद्दलची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवू लागलं होतं. 'आवरण' वाचायच्या आधी अनंतमूर्तीची त्यांच्याबद्दलची आणि आवरण या पुस्तकाबद्दलची मतं वाचली होती. पण 'माझं नाव भैरप्पा', वाचलेलं असल्याने, आवरण पुस्तकाबद्दल ते न वाचताच एक सहानुभूतीचा कोपरा तयार झाला होता. <br />
<br />
त्यानंतर जेव्हा आवरण वाचलं तेव्हा मात्र स्त्रियांप्रमाणेच इतिहासाबद्दलची भैरप्पांची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवलं. तत्वज्ञानाचा अभ्यासक असलेला हा लेखक ज्या सहजतेने प्राचीन पुराणांवरील चमत्काराचं आवरण दूर करू शकतो त्याच सहजतेने अर्वाचीन इतिहासावर भाष्य करू शकेल हा माझा विश्वास डळमळीत झाला. भैरप्पा म्हणजे, 'स्वतःला दिसणारं सत्य आणि वाचक यामध्ये आपले पूर्वग्रह आणि आपले हेतू येणार नाहीत याची काळजी घेणारा लेखक', याऐवजी 'वाचकांना जे पटवायचं आहे त्याची समर्थपणे मांडणी करू शकणारा लेखक' असू शकतात ही शक्यता मी मान्य केली. त्यानंतर त्यांचं पारखा आणि तंतू वाचताना जरी सार्थ किंवा मंद्र इतकाच आनंददायी अनुभव आला तरी याही लेखकावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याचे पूर्वग्रह आपल्या नकळत आपण स्वीकारू नयेत याची जबाबदारी आपल्यावर आहे ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवली होतीच. <br />
<br />
'भैरप्पा शब्द प्रमाण' अशी आता जरी माझी अवस्था नसली, तरी या लेखकाने आपल्याला कित्येकदा अपरिमित आनंद दिलेला आहे हे मान्य असल्याने जेव्हा त्यांना त्यांच्याच पुस्तक प्रकाशनात प्रत्यक्ष बघायला मिळेल आणि त्या दिवशी कुठलंही लेक्चर नाही हे लक्षात आलं तेव्हा मी पुस्तक प्रकाशनाला जायचं निश्चित केलं. <br />
<br />
दोन पुस्तकांचं प्रकाशन होतं. साक्षी आणि उत्तरकांड. मी साक्षी आधी वाचलं आणि त्याबद्दल मी <a href="https://www.anandmore.com/2020/02/blog-post_21.html" target="_blank">याआधीच लिहिलं आहे. </a><br />
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-Ugape1w2M3E/XpH32HUv4hI/AAAAAAAABr0/fv25YCA-M8Iqjmw81kZ6PjHBqefQG7DUQCLcBGAsYHQ/s1600/Uttarkanda.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="400" data-original-width="250" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-Ugape1w2M3E/XpH32HUv4hI/AAAAAAAABr0/fv25YCA-M8Iqjmw81kZ6PjHBqefQG7DUQCLcBGAsYHQ/s320/Uttarkanda.jpg" width="200" /></a></div>
<div>
<br />
<br />
महाभारतावरील चमत्काराचं आवरण दूर करणारा हा लेखक रामायणावर लिहीत आहेत हे साधारणपणे दोनेक वर्षांपूर्वी कळलं होतं तेव्हाच माझं कुतूहल चाळवलं होतं. साक्षीबद्दल काहीच कल्पना नव्हती. असं असूनही उत्तरकांड आधी वाचायला न घेता मी आधी साक्षी वाचायला घेतलं त्याला कारण प्रकाशनसोहळा. या सोहोळ्यात शेवटी उत्सवमूर्ती बोलले. जेव्हा त्यांचा आवाज ऐकला, तेव्हा या माणसाचे शब्द आपण अनुवादित स्वरूपात केवळ वाचले होते आता त्याचा आवाज ऐकतो आहोत यामुळे माझे डोळे भरून आले होते. भैरप्पा चाळीस पंचेचाळीस मिनिटे बोलले. त्यातला बहुतेक भाग मी त्यांची पुस्तके आणि आत्मचरित्र वाचलेलं असल्याने मला परिचीत होता. नंतर जेव्हा ते साक्षी आणि उत्तरकांड यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलले तेव्हा मात्र माझ्या भावविभोर अवस्थेत मिठाचा खडा पडल्यासारखं झालं. <br />
<br />
'राम वनवासाला गेला. भरत राज्य करायला समर्थ नव्हता. त्यामुळे चौदा वर्षे अयोध्येत अनागोंदी माजली. समर्थ राजाच्या अनुपस्थितीमुळे लोक करभरणा चुकवू लागले. साठेबाजी करू लागले. राम जेव्हा वनवासाहून परतला तेव्हा त्याला या अनागोंदीतून मार्ग काढायचा असल्याने त्याने कठोर निर्णय अमलात आणायला सुरवात केली. त्यामुळे कर चुकवणारे व्यापारी आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना त्रास होऊ लागला. परिणामी त्यांनी रामाला बदनाम करायची मोहीम सुरु केली. पण राम तर निष्कलंक. त्याच्यावर चिखल कसा काय उडवणार?, म्हणून मग त्यांनी रामाचं चारित्र्यहनन करून त्याच्या कायद्यांबद्दल सामान्य जनतेत अप्रीती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. म्हणून मग त्यांनी सीतेच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरवात केली. म्हणजे सीतेच्या चारित्र्यावर शंका घेणारा सामान्य धोबी नव्हता तर तत्कालीन भ्रष्ट अधिकारी आणि व्यापारी यांनी ही कुजबुज मोहीम सुरु केली होती. त्यामुळे आपल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत अडथळा येऊ नये आणि प्रजेत कायद्याचा धाक राहावा म्हणून प्रभू रामाने कठोर निर्णय घेऊन सीतेचा त्याग केला.' असं माझं आकलन आहे हे भैरप्पांच्या बोलण्याचं सार होतं. <br />
<br />
मला ते पटत असतानाच भैरप्पा पुढे म्हणाले. 'आताही तसंच चालू आहे. जेव्हा शासक कडक असतो आणि भ्रष्टाचार करण्याच्या संधी कमी होत जातात तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक आणि भ्रष्ट अधिकारी त्या शासकाबद्दल कुजबुज मोहिमा राबवून त्याच्याबद्दल जनमानस कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आपल्या पंतप्रधानांनी निश्चलनीकरण किंवा अन्य कित्येक कठोर निर्णय घेतल्याने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची फळी सक्रिय झाली आहे.' भैरप्पा पुढे बोलले असते परंतु व्यासपीठावरील अन्य निमंत्रितांनी त्यांना आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे याची जाणीव करून दिल्याने त्यांनी आवरतं घेतलं आणि उपस्थितांना पुस्तक वाचा अशी विनंती केली. <br />
<br />
त्यांच्या त्या शेवटच्या वाक्यांमुळे त्यांच्या मनात प्राचीन कर्तव्यकठोर राम म्हणजे कुटुंबमोहापासून दूर असलेले सध्याचे आपले पंतप्रधान असावेत असा माझा ग्रह झाला. आणि प्रेक्षकांत बसलेल्या अनेकांनी ज्याप्रमाणे त्या वक्तव्याचं स्वागत केलं ते ऐकून बाकी सगळ्यांनाही तसंच वाटलं याबद्दल माझी खात्री झाली. <br />
<br />
निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या वेळी बँकर्स आणि सर्व्हिस टॅक्स ऑफिसर्स कश्या प्रकारे वागले हे माहीत असल्याने, आणि हे असं होईल याची पूर्वकल्पना शीर्षस्थ नेतृत्वाला आणि त्यांच्या सल्लागार मंडळाला अजिबात नसेल यावर माझा विश्वास बसणं अशक्य असल्याने उत्तरकांड वाचायचा माझा उत्साह अगदी मावळून गेला. २०१७च्या जानेवारीत कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेलं पुस्तक लिहायला भैरप्पांनी कधी सुरवात केली हे मला निश्चित माहिती नसलं तरी हे पुस्तक लिहायला पर्व इतका मोठा काळ लागला नसेल हे मला बातम्यांवरून माहिती होतं. त्यामुळे आपल्या आवडत्या नेत्याला समर्थन देण्यासाठी भैरप्पांनी हे पुस्तक लिहिलं असावं हे मान्य करून मी थोडा खटटू झालो. कुणीही आपल्या लाडक्या नेत्याचं समर्थन करण्याला माझी ना नाही. पण ते प्रच्छन्न असावं असं माझं मत आहे. इतर लोक ज्याला साहित्यिक मूल्य आहे असं समजून वाचतील त्यात आपले हेतू मिसळू नयेत असंही माझं मत आहे. वाचणाऱ्याला माहिती असावं की आपण जे वाचतो आहेव ते नक्की काय आहे. <br />
<br />
अर्थात माझ्या मताप्रमाणे भैरप्पांनी वागावं इतकं मोठं माझं कर्तृत्व नाही आणि अधिकारही नाही. त्यामुळे उत्तरकांड घरात आलं खरं पण ते वाचायचा उत्साह मावळला होता.<br />
<br />
(क्रमशः)</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-26732966022579391482020-04-11T22:19:00.003+05:302020-04-11T22:19:40.671+05:30रंगासाई सर आणि कोरोना <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
अकरावी ते तेरावी गणेश क्लासला जायचो. रंगासाई सर होते इकॉनॉमिक्स शिकवायला. ठाण्याला राहणारे रंगासाई सर केळकर कॉलेजात शिकवायचे आणि संध्याकाळी डोंबिवलीत गणेश क्लासमध्ये आमच्या डोक्यात इकॉनॉमिक्स भरायचा प्रयत्न करायचे. मराठी त्यांना येत नसावं आणि अकरावीच्या मुलांसमोर आपलं तोडकं मोडकं हिंदी वापरलं तर खिल्ली उडवायला या अर्धवट वयातील मुलांच्या हाती आयतं कोलीत दिल्यासारखं होईल हे त्यांना माहिती असावं त्यामुळे त्यांचं लेक्चर कायम दाक्षिणात्य हेल असलेल्या इंग्रजीत असायचं. सरांचा फोटो माझ्याकडे असण्याचं कारण नाही, त्यामुळे आता सरांची मूर्ती अंधूक आठवते. तामिळ सिनेमातील नासर नावाचा गुणी अभिनेता जसा दिसतो तसं माझ्या स्मृतीतील सरांचं चित्र आता दिसू लागलं आहे. <br /><br />पूर्ण इंग्रजीत असलेल्या लेक्चरमुळे त्या काळच्या डोंबिवलीतील कॉमर्स शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये सर लोकप्रिय होणं जरा कठीणच होतं. त्यात सरांचा विषय इकॉनॉमिक्स, जो तत्कालीन डोंबिवलतीलच काय पण आजही असंख्य भारतीयांच्या नावडीचा विषय आहे. त्यामुळे इतर विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या गराड्यात रंगासाई सर एकटे पडलेले असत. पण त्यामुळे त्यांच्या शिकवण्यावर परिणाम झाला नाही. आपला विषय ऐकण्यात फार रस नसलेल्या विद्यार्थ्यांसमोरही ते कायम नावाप्रमाणेच रंगात येऊन शिकवत. साधारणपणे 'कमी तिथे आम्ही' असा माझा स्वभाव लहानपणापासून असल्याने विद्यार्थीप्रिय नसलेल्या रंगासाई सरांकडे मी ओढला जाणं स्वाभाविक होतं. त्यामुळे मी त्यांच्या लेक्चरला जरा जास्त लक्ष द्यायचो. परिणामी इकॉनॉमिक्स हा विषय किमान थोड्या फार प्रमाणात का होईना पण डोक्यात शिरू लागला आणि मग त्याची गोडी लागली. <br /><br />मग एकदा डोंबिवलीत एका पुस्तक प्रदर्शनात 'रॉबर्ट हेलब्रॉनर' यांच्या 'Worldly Philosophers' या पुस्तकाचा बाळ गाडगीळ यांनी 'अर्थशास्त्राचे शिल्पकार' या नावाने केलेला अनुवाद मिळाला. कमी कळत असलं तरी मित्रांसमोर स्टाईल मारायची म्हणून घेतलं आणि वाचायला सुरवात केली. त्यातलं चौथं प्रकरण वाचायला सुरवात करायला आणि लोकसंख्येचा सिद्धांत रंगासाई सरांनी शिकवायला एकच गाठ पडली. परिणामी इकॉनॉमिक्स आणि रंगासाई सरांवरच प्रेम वाढलं आणि ते अजूनही टिकून आहे. <br /><br />१६९६ च्या सुमारास इंग्लंडमधील ग्रेगरी किंग नावाच्या एका नकाशा तज्ज्ञ आणि संख्याशास्त्रीने त्यावेळच्या उपलब्ध साधनांवरून इंग्लंडची लोकसंख्या किती असावी याचा अंदाज बांधला होता. साडेपाच दशलक्ष हा किंगचा अंदाज आश्चर्यकारकरीत्या सत्याजवळ जाणारा होता. पण किंग साहेबांना केवळ तत्कालीन लोकसंख्येत रस नव्हता तर ती लोकसंख्या किती वेगाने वाढेल याबद्दलही त्यांनी अंदाज बांधला होता. त्यांच्या अंदाजाप्रमाणे इंग्लंडची तत्कालीन लोकसंख्या दुप्पट व्हायला इसवीसन २३०० उजाडलं असतं आणि इसवीसन ३५००च्या आधी ती चौपट होऊ शकली नसती. <br /><br />किंग साहेबांचा अंदाज हा तत्कालीन इंग्लंडातील समाजधुरिणांच्या चिंतेचा विषय होता. इंग्लंडची लोकसंख्या अतिशय कमी वेगाने वाढते आहे आणि इंग्लंडच्या साम्राज्याच्या शत्रूंची लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढते आहे असे सर्वमान्य मत होते. परिणामी या शत्रू देशांकडून इंग्लंडच्या साम्राज्यावर हल्ले होणं वाढत जाणार आहे आणि शेवटी इंग्लंड हे महान राष्ट्र लयाला जाऊ शकतं अशी भीती प्रतिष्ठित लोकांच्या मनात होती. त्यात डॉ प्रिन्स नावाच्या एका संख्याशास्त्र्याने उपलब्ध पुराव्याने सिद्ध करून दाखवलं की इंग्लंडची लोकसंख्या ग्रेगरी किंगच्या काळापेक्षा चक्क तीस टक्क्याने कमी झाली होती. आता मात्र इंग्लंडमधील नेत्यांनी लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. लोकसंख्या घटल्याने देशाचा ऱ्हास होतो तर ती वाढल्याने देशाचा विकास होईल असा विचार उदयाला आला. आणि विल्यम पिट (यंगर) या तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानाने चक्क गरिबांची लोकसंख्या वाढावी म्हणून गरिबांना लग्न करण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी मदत देणारं "Poor Relief Bill" संसदेत आणलं होतं. <br /><br />त्या वेळी इंग्लंडमध्ये अजून एक विचारवंत आणि मंत्री होता. त्याच नाव विल्यम गॉडविन. फ्रँकेस्टाईन लिहिणाऱ्या मेरी शेलीचा पिता आणि जगप्रसिद्ध कवी पी बी शेलीचा सासरा असणारा हा गॉडविन आपल्या अराजकवादी 'anarchist' (माझ्या मते खरं तर ते अराज्यवादी असायला हवं) बंडखोर विचारांसाठी प्रसिद्ध होता. त्याने 'पॉलिटिकल जस्टीस' या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्याने इंग्लंडची लोकसंख्या वाढवण्याचे फायदे रंगवून सांगितले होते. भरपूर लोकसंख्या असेल. सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी उत्पादन करावं लागेल. परिणामी सगळ्यांना रोजगार मिळेल. युद्ध होणार नाहीत. राज्यसंस्था लयाला जाईल. लोक सुखी असतील. वगैरे मुद्दे त्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. पुस्तक राज्यसंस्थेच्या विरोधी असलं तरी त्यात भविष्याबद्दल आशादायी चित्र रंगवल्याने त्यावर इंग्लंडमधील उच्च्भ्रू वर्तुळात भरपूर चर्चा होऊ लागली. <br /><br />डेव्हिड ह्यूम आणि जीन रूसो यासारख्या विचारवंतांशी मैत्री असलेल्या डॅनियल माल्थस या प्रतिष्ठित गृहस्थालाही या पुस्तकातील प्रतिपादन पटलं. (अनेकजण या आडनावाचा उच्चार माल्थुस असा करतात. पण रंगसाई सर माल्थस म्हणायचे म्हणून मीही माल्थस म्हणतो.) तर डॅनियल माल्थस या पुस्तकाबद्दल आपल्या लाडक्या मुलाशी गप्पा मारू लागले. <div>
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-hUeyvuIRDPI/XpH02TiTHZI/AAAAAAAABrY/EG090boywsMTIpScF3b2tzqp3fneFnU7gCLcBGAsYHQ/s1600/Malthus.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="257" data-original-width="196" src="https://1.bp.blogspot.com/-hUeyvuIRDPI/XpH02TiTHZI/AAAAAAAABrY/EG090boywsMTIpScF3b2tzqp3fneFnU7gCLcBGAsYHQ/s1600/Malthus.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">थॉमस माल्थस<br />फोटो सौजन्य : इंटरनेट </td></tr>
</tbody></table>
<div>
केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेला, लॅटिन आणि ग्रीक भाषेवर प्रभुत्व असलेला आणि गणितात रँग्लर असलेल्या या बुद्धिमान मुलाचं नाव होतं थॉमस माल्थस. पुढे १९२९ मध्ये जागतिक मंदीच्या काळात जॉन मेनार्ड केन्सने मांडलेली "general glut", सार्वजनिक उत्पादनातिरेक ही संकल्पनादेखील याच थॉमस माल्थसला जाणवली होती. पण तो त्याच्या काळाच्या इतका पुढे होता की त्या संकल्पनेचं काय करायचं ते त्याला आणि त्याच्या समकालीन विचारवंताना कळलं नाही. थॉमस माल्थसची थोरवी सांगण्यासाठी फक्त इतकंच सांगतो की ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या माल्थसबाबाच्या विचारांनी चार्ल्स डार्विनही प्रभावित झाला होता. <br /><br />गॉडविनने पुस्तकात सांगितलेल्या मुद्द्यांचा वडिलांशी बोलताना प्रतिवाद करताना थॉमस माल्थसने जे मुद्दे मांडले त्यामुळे डॅनियल माल्थस इतके प्रभावित झाले की त्यांनी आपल्या मुलाला आपले विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायला सांगितले. त्यातून तयार झालेलं पुस्तक म्हणजे 'An Essay in to Principles of Population', लोकसंख्येच्या नियमांवरचा निबंध. <br /><br />त्यानंतर थॉमस माल्थसने या निबंधाची सात संस्करणे काढली. प्रत्येक वेळी त्याने मागील संस्करणातील त्रुटी सुधारल्या किंवा निबंधावरील आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माल्थसने मांडलेले लोकसंख्यावाढीचे नियम थोडक्यात या प्रकारे सांगता येतील.<br /><br />१) लोकसंख्या गुणाकार श्रेणीने वाढते. जेव्हा अनुकूल वातावरण मिळतं, तेव्हा मनुष्यप्राण्यांचं लैंगिक आचरण लोकसंख्या वाढीचं गुणोत्तर अतिशय वेगाने बदलवून टाकतं.<br /><br />२) याउलट अन्नधान्य मात्र बेरीज श्रेणीने वाढतं<br /><br />३) म्हणजे लोकसंख्या जर २ > १० > ५० > २५० > ७५० या पद्धतीने वाढत जात असेल तर अन्नधान्य मात्र २ > ५ > ८ > ११ > १४ या पद्धतीने वाढत जाते. परिणामी वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा मिळू शकत नाही. <br /><br />४) मग या लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्या बिघडलेल्या समतोलाला पुन्हा ताळ्यावर आणण्याचं काम दोन नियंत्रक करतात. <br />पहिला म्हणजे पॉझिटिव्ह किंवा नैसर्गिक नियंत्रक. बिघडलेल्या असमतोलामुळे गरिबी, दैन्य, दुष्काळ, भूकबळी, रोगराई, युद्ध होतात आणि लोकसंख्या पूर्ववत होते. <br />किंवा मग दुसरा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक नियंत्रक म्हणजे माणसांनी घेतलेले निर्णय. यात लग्नाचं वय लांबवणे, संतती नियमन, ब्रह्मचर्यपालन, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणं वगैरे बाबी येतात. <br />जो समाज हे प्रतिबंधात्मक उपाय करणार नाही त्याच्यावर निसर्ग आपले उपाय लागू करतो आणि शेवटी लोकसंख्येला ताळ्यावर आणतो. <br /><br />५) जेव्हा सुबत्ता येते तेव्हा माणसे कुटुंबनियोजनाकडे दुर्लक्ष करतात परिणामी गुणाकारश्रेणीने लोकसंख्या वाढायला सुरवात होते. वाढत्या लोकसंख्येला कमी पडू नये म्हणून अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जाते. त्यामुळे अन्नधान्य मुबलक मिळू लागतं. परिणामी पुन्हा लोकसंख्या वाढू लागते. लोकसंख्येचा विस्फोटच होतो म्हणा ना. पण या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन वाढत नाही. परिणामी वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न मिळत नाही. परिणामी लोकसंख्या एक आपत्ती बनते. आणि या आपत्तीत भरडले जातात ते सामाजिक उतरंडीतील तळागाळाचे लोक. त्यांच्याकडे अगोदरच संसाधनांचा तुटवडा असतो त्यामुळे ते अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात टिकून राहण्यासाठी असमर्थ ठरतात. आणि ज्यांच्याकडे संसाधनांची विपुलता आहे किंवा ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ते टिकाव धरतात. म्हणून सरकारने लोकसंख्यावाढीसाठी उत्तेजन देऊ नये. (डार्विन बाबामुळे आता सगळ्यांना माहिती झालेल्या हर्बर्ट स्पेन्सर यांच्या 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' या संकल्पनेचं एक मूळ इथेही असावं असं मला वाटतं) <br /><br />अश्या तऱ्हेने गॉडविनने रंगवलेलं लोकसंख्यावाढीतून आर्थिक सुबत्तेचं चित्र माल्थसने उध्वस्त केलं. माल्थसने मांडलेले मुद्दे इतके प्रभावी पण नकारात्मक होते की त्या काळात त्याने समाजधुरिणांवर दडपण आणलं. इतकंच काय पण हेलब्रॉनर यांनी आपल्या पुस्तकात माल्थसच्या प्रकरणाचं नावंही The Gloomy Presentiments of Parson Malthus and David Ricardo म्हणजे 'धर्मोपदेशक माल्थस व डेव्हिड रिकार्डोचं उदास विचारविश्व' असं दिलं आहे.<br /><br />माल्थसच्या या लोकसंख्यावाढीच्या सिध्दांतावर भरपूर टीका झाली. तो कालबाह्य झाला आहे असं प्रतिपादन कित्येकदा केलं गेलं. जागतिकीकरण, शेतीत झालेल्या सुधारणा, शेतीचं औद्योगिकीकरण, हरितक्रांती आणि आता जीएम बीबियाणं यामुळे आपण माल्थसच्या काळापेक्षा कित्येकपट लोकसंख्या असूनही अन्नधान्याच्या तुटवड्यावर मात केली आहे. आता जर कुठे भूकबळी असतील तर ते अन्नधान्याच्या उत्पादनाच्या तुटवड्यामुळे नसून वितरणव्यवस्थेतील त्रुटींमुळे आहेत. असं असलं तरी हरितक्रांतीमागे किंवा भारतासारख्या विकसनशील देशांतील कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमांमागे वैचारिक भूमिका माल्थसच्या लोकसंख्येच्या सिध्दांतातील प्रतिबंधात्मक उपायांची होती हे अनेकांना पटेल.<br /><br />आज जेव्हा कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे तेव्हा यामुळे कराव्या लागणाऱ्या लॉक आऊटमधे सगळ्यात जास्त भरडले जाणार आहेत ते समाजातील आर्थिक उतरंडीतील सगळ्यात खालच्या थरातील लोक. ज्या ज्या देशात कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेवर अतिरिक्त बोजा पडला आहे किंवा पडणार आहे त्या त्या देशातील आर्थिक उच्चस्तरातील लोकांना उपचार करुन घेणं परवडतं आहे किंवा परवडणार आहे. अडकले आहेत किंवा अडकतील केवळ आर्थिक निम्नस्तरातील लोक.<br /><br />आज जर माल्थस असता तर त्याने आपल्या निबंधाचं आठवं संस्करण केलं असतं आणि मुबलक अन्नधान्य उपलब्ध असूनही लोकसंख्या समतोल करण्याच्या निसर्गाच्या नियमांना शब्दबद्ध केलं असतं. आणि अशा परिस्थितीत सरकारची जबाबदारी ही आर्थिक दुर्बळ घटकांकडे अधिक लक्ष देण्याची आहे हे ठासून सांगितलं असतं.<br /><br />लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करु नका. वाढलेल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा. संसाधने केवळ मूठभर लोकांच्या हातात एकवटू देऊ नका आणि असलेल्या लोकसंख्येची क्रयशक्ती खालावू देऊ नका अन्यथा सार्वजनिक उत्पादनातिरेकामुळे येणाऱ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल असंही त्याने समजावलं असतं.<br /><br />आज संध्याकाळी बायकोमुलांबरोबर कोरोनाबद्दल बोलताना माल्थस आठवला. मग हेलब्रॉनरांच्या पुस्तकातील माल्थसवरचं प्रकरण पुन्हा चाळलं. तेव्हा रंगासाई सरांची आठवण आली.</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-11320372513830397622020-04-11T22:05:00.000+05:302020-04-11T22:07:49.256+05:30चराचरात ईश्वर <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
भरपूर चालून हनुमान मंदिरापाशी आलो. सक्तीची सुट्टी असल्यामुळे की काय कोण जाणे पण मंदिरासमोरच्या तीनही चौथऱ्यांवर भरपूर गर्दी होती. सुडौल शरीराचे लोक व्यायाम करत होते. मलाही कधी नाही ते सूर्यनमस्कार घालायची इच्छा झाली.<br /><br /><div>
मी एका चौथऱ्यावर चढलो आधीचे लोक बाजूला होऊन माझ्या विस्तीर्ण देहाला सूर्यनमस्कार घालायची जागा होईपर्यंत वाट पाहू लागलो. समोर 'हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी' सूर्याकडे तोंड करून उभे होते. माझ्या डोक्यात गाणं वाजू लागलं...<br /><br />धन्य तुझी रामभक्ती दिव्य तुझी काया <br />बालपणी गेलासी तू सूर्याला धराया<br />हादरली ही धरणी थरथरले आसमानं <br />एकमुखानं बोला बोला जयजय हनुमान <br /><br />माझ्या मागे ते सफरचंदासारखं लाल गुलाबी पिवळसर सूर्यबिंब उगवताना मला जाणवत होतं. <br /><br />माझ्या समोरच्या माणसाचा व्यायाम संपत आला होता. एकाएकी मनात विचार आला की कुठे तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत? मारुतीरायाकडे तोंड केलं तर भगवान सहस्ररश्मीकडे पाठ होईल आणि सूर्यनारायणाकडे तोंड केलं तर अंजनीसुताकडे पाठ होईल. आणि मला चराचरात ईश्वर असणे म्हणजे काय ते जाणवलं.<br /></div>
<div>
मग या चराचरातील ईश्वराकडे पाठ नको म्हणून मी हात जोडून उभ्या उभ्या एक प्रदक्षिणा मारत सूर्यनारायण आणि पवनसुताला नमस्कार केला आणि माझ्यापुढच्या माणसाबरोबर चौथऱ्यावरून खाली उतरून घराच्या रस्त्याला लागलो.<br /><br />माझ्या शरीरसाधनेत अध्यात्म हाच मोठा अडसर आहे, हेच खरं. नाहीतर आज भारताला एखादा मिस्टर युनिव्हर्स मिळाला असता.</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-70798735299988207802020-03-15T20:24:00.000+05:302020-03-15T20:24:50.401+05:30कंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यटिफुल <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
सकाळी चालायला जाण्यापूर्वी फेसबुक उघडलं. एका ज्येष्ठ मित्राने कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांचा व्हिडिओ शेअर केलेला पाहिला. त्यांच्याच पोस्ट्स बघून दोन वर्षांपूर्वी कंबोडिया व्हिएतनामला गेलो होतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
कंबोडियाच्या अंगकोर वट आणि अंगकोर थॉमच्या देवळानंतर 'टा प्र्हॉम' देवळात गेलो होतो. (या देवळाच्या दुरुस्तीचं काम भारत सरकार करत आहे आणि अॅंजेलीना जोलीच्या टूम्ब रेडर्स या चित्रपटाचं चित्रीकरण या देवळातही झालं होतं). 'टा प्र्हॉम'च्या भव्य भग्न वास्तूत फिरताना मोबाईलवर 'ओ फॉर्च्युना' लावून हिंडलो होतो. आजूबाजूला कुणी नाही ते पाहून इअरफोन बंद करून त्या भग्न वास्तूलाही 'ओ फॉर्च्युना' ऐकवलं होतं. कार्ल अॉफच्या संगीताची जादू, ओ फॉर्च्युनाचे न कळणारे लॅटिन शब्द आणि जुन्या देवळांच्या भिंतीतून उगवून आकाशापर्यंत पोचलेले वटवृक्ष या सगळ्याचा परिणाम होऊन मनात उसळलेला भावनांचा कल्लोळ डोळ्यातून घळाघळा वाहू दिला होता.आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून बावरलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप हसूही आलं होतं. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-neMtDNYohXE/Xm4-rS1EevI/AAAAAAAABqo/ZLDVkPvM3lYhv11dg3npyLQpuseJ0uuSgCLcBGAsYHQ/s1600/89493480_10157412328624069_4619288887930388480_o.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="540" height="200" src="https://1.bp.blogspot.com/-neMtDNYohXE/Xm4-rS1EevI/AAAAAAAABqo/ZLDVkPvM3lYhv11dg3npyLQpuseJ0uuSgCLcBGAsYHQ/s200/89493480_10157412328624069_4619288887930388480_o.jpg" width="112" /></a></div>
<div>
<br /></div>
<div>
आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हणून युट्यूबवर ओ फॉर्च्यूना शोधलं. समोर नेहमीचे व्हिडीओ आले आणि नेहमीपेक्षा एक वेगळा व्हिडीओ आला फ्लॅश मॉब या नावाने. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/PJNp5UKRtbQ/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/PJNp5UKRtbQ?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
माझ्या आयुष्यात फ्लॅश मॉब ही गोष्ट कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली नाही. अगदीच तोंडी लावायला म्हणून जेव्हा पिझ्झा हट भारतात नवीन होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा हिला घेऊन पिझ्झा हटला गेलेलो असताना आम्हाला वाढणारा वेटर टेबलाजवळ येऊन आपलं काम करत असताना एकाएकी बाकीच्या वेटर्सनी ताल धरून नाचायला सुरवात केली होती आणि तिथे आलेल्यापैकी कुणाच्या तरी वाढदिवसासाठी एक गाणं म्हणत टेबलामधल्या जागेत नाच करून दाखवला होता. </div>
<div>
<br /></div>
<div>
माझ्या तालाशी जुळवून घेणं अशक्य आहे हे नृत्यदेवतेला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे तिने माझ्या आयुष्यातून फार लवकर काढता पाय घेतला होता. त्यामुळे इतर कुणी नाचू लागलं तरी मला अवघडल्यासारखं होतं. त्याशिवाय आपण, नाच आवडणाऱ्या आपल्या प्रेयसीला घेऊन त्या काळात न परवडणाऱ्या हॉटेलात गेलेलो असताना वेटर्सनी छान नाच करून दाखवल्याने माझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यानंतर मी कायम डॉमिनोजचा ग्राहक झालो आणि पिझ्झा हटला 'नाचता येईना ते गिऱ्हाईक होई वाकडे' ही मराठी म्हण शिकवली होती. </div>
<div>
<br /></div>
<div>
त्यानंतर साधारण २०११ ला सीएसटी स्थानकावर संध्याकाळी पाचच्या सुमारास तरुणांच्या एका समूहाने रंग दे बसंतीच्या गाण्यावर समूहनृत्य केलेलं होतं. त्याचा व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांत बघताना, आपल्याला नाचता आलं असतं तरी आपण असं चारचौघात नाचू शकलो नसतो याची खात्री पटून त्या गाण्यावर सगळ्यात पहिल्यांदा नाचायला सुरवात करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटलं होतं. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/Iyt16efRrBo/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/Iyt16efRrBo?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
नंतर कळलं होतं की बघणाऱ्यांसाठी जरी तो उत्स्फूर्त अविष्कार असला तरी त्यात भाग घेणाऱ्यांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केलेली असते. त्यांचं सादरीकरण रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी प्रशिक्षित कॅमेरामन मोक्याच्या ठिकाणी पेरलेले असतात आणि ते केवळ सादरीकरणाला रेकॉर्ड करत नसून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील रेकॉर्ड करत असतात. अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितरित्या आपल्या बाजूला संगीत किंवा नृत्याचा अविष्कार सुरु झाला की माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते बघणं मोठं मनोरंजक असतं. आज ओ फॉर्च्यूनाच्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ बघताना त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना असाच हरखून गेलो. </div>
<div>
<br /></div>
<div>
फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. यूट्यूबच्या अल्गोरिदमला माझी आवड कळली आणि त्याने ऑटो प्ले मोडवर फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाचे व्हिडीओ दाखवायला सुरवात केली. पश्चिमी देशात हे फ्लॅश मॉब साधारणपणे एअरपोर्ट किंवा मॉल किंवा रेल्वे स्टेशन किंवा शहरातील एखादा प्रसिद्ध चौक अश्या ठिकाणी आपलं सादरीकरण करतात. सुरवातीला तिथल्या गिऱ्हाईकांचे किंवा प्रवाश्यांचे आवाज, नेहमीच्या सूचनांचे आवाज असा सगळा मामला चालू असतो. आणि कुठेतरी कोपऱ्यातून कुणीतरी व्हायोलिन किंवा बासरी किंवा ट्रम्पेट किंवा छोटा ड्रम वाजवायला सुरवात करतं. लोक लक्ष देत नाहीत. मग अजून कुणीतरी दुसरं वाद्य घेऊन येतं. ठरलेल्या क्रमाने एका मागून एक इतर वाद्यवृंद गोळा होत जातो. आणि मूळ सुरावटीत आपलं वाद्य मिसळवू लागतो. आता लोक शांत होऊ लागतात. बहुतेक लोक एका ठिकाणी उभे राहून त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ लागतात. इतस्ततः धावणाऱ्या लहान मुलांचे आईबाप त्यांना पकडून उभे रहातात. संगीताची जादू आणि वातावरणातील भारलेपणा असा असतो की इतका वेळ गोंधळ घालणारी मुलंही शांतपणे उभी राहतात. वाद्यमेळ वाढत जातो. आता वाद्यवृंदाचा संगीत संयोजकही समोर येतो आणि त्या सुरावटीत तेथील सर्वजण गुंगून जातात. शेवट होतो आणि मग टाळ्यांचा जल्लोष, शिट्ट्या किंवा प्रोत्साहनपर हाकारे यांचा कल्ला होतो आणि रोमांचित प्रेक्षक पुन्हा आपापल्या कामाला लागतात. सगळ्या फ्लॅश मॉब व्हिडिओचा फॉरमॅट साधारणपणे असाच असतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
मोबाईल खिशात होता. त्यामुळे पुढे काय सुरु होणार ते माहिती नव्हतं. प्रत्येक वेळी युट्यूब जे ऐकवेल त्यासाठी तिथल्या प्रत्यक्षदर्शींइतकाच मी देखील अनभिज्ञ होतो. एकामागून एक वेगवेगळ्या सुरावटी वाजत होत्या. ओ फॉर्च्यूनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली सादरीकरणं झाली. मग बोलेरो झालं. मग ब्ल्यू डॅन्यूब झालं. मग बीथोव्हेनच्या नवव्या सिम्फनीतील ओड टू जॉय झालं. क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी झालं. </div>
<div>
<br /></div>
<div>
चढ चढून धाप लागली होती. पण कानात वाजणाऱ्या सुरावटींमुळे अंगावर रोमांच उभे राहात होते. जरा थांबलो. घाम पुसता पुसता पुन्हा एकदा मगाशी लागून गेलेलं बोलेरो लावलं. मेक्सिकोतील कुठल्यातरी शहरातील चौकात एका वाद्यवृंदाने रावेलची ही रचना सादर केली होती. संध्याकाळच्या गर्दीतून एक मुलगी पुढे येते. ड्रम्स मांडते आणि बोलेरोचा मध्यवर्ती ताल चालू करते. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/CaP__YTSv58/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/CaP__YTSv58?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
बोलेरोमध्ये तो ताल संपूर्ण वेळ चालू राहतो. जवळपास पंधरा मिनिटांच्या त्या संगीतात मध्यवर्ती असणारा एकच ताल, संगीताच्या कार्यक्रमांसाठी बांधलेल्या विशेष सभागृहात असतानाही पुन्हा पुन्हा वाजवत राहायचं म्हणजे अजिबात खायचं काम नाही. आणि लोकांच्या गर्दीत एकट्याने येऊन आपले ड्रम्स मांडून तो ताल धरायचा म्हणजे तर अजून कठीण. आजूबाजूला अगदी जवळ उभे असलेले प्रेक्षक, त्यामुळे जरा ताल किंवा ठोका चुकला की नाचक्की ठरलेली. रंग दे बसंती गाण्यावर नाचायला सुरवात करणार्या पहिल्या मुलीप्रमाणेच या ड्रम वाजवणाऱ्या मुलीबद्दल मला फार कौतुक वाटू लागलं. वाटलं की अश्या कुठल्या फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाच्या वेळी आपणही तिथे असलं पाहिजे. त्या वाद्यवृंदातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक करताना मी थकणार नाही याची माझी मलाच खात्री पटली. </div>
<div>
<br /></div>
<div>
आणि एकदम जाणवलं की फेसबुक म्हणजे एक प्रकारचा फ्लॅश मॉब आहे. फक्त या मॉबमधे जो तो एकटा असतो. आणि इथे बहुतेक जण फारसा सराव न करता येतात. आपापल्या भिंतीवर खरडणारा प्रत्येकजण एकटाच वेगवेगळी वाद्य वाजवत असतो. आणि आपापल्या कामात गुंतलेले लोक मधेच तिथे डोकावतात. आपण कलाकार आहोत की नाही हे माहिती नसलेल्या कलाकारांचं सादरीकरण बघत असतात. काहींचे ताल चुकतात. काहींचा एकट्याचा वाद्यवृंद फारसा रंग भरत नाही. काहींचा वाद्यवृंद मात्र कमालीचा रंगतो. लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांना खूष करून जातो. तुलना करून माझा मीच हसलो. बोलेरो संपलं. </div>
<div>
<br /></div>
<div>
चेकॉव्हस्कीची रचना सुरु झाली. ही रचना मात्र कुठल्या एअरपोर्ट किंवा मॉलमध्ये नसून चक्क एका हॉस्पिटलमध्ये सादर केली होती. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/tzwWskM4hN8/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/tzwWskM4hN8?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
वेदनेने बेजार झालेल्या रुग्णांना आणि आप्तेष्टांच्या दुखण्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांना हे स्वर्गीय संगीत ऐकून किंचित काळ का होईना पण वेदनेचा आणि चिंतेचा विसर पडला असेल, असा विचार करून, त्या वाद्यवृंदाच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटलं. माझ्या आवडत्या शॉशँक रिडम्प्शन चित्रपटातील मोझार्ट ऑपेराचा सीन आठवला. जिथे जीवन म्हणजे त्याच त्याच कंटाळवाण्या गोष्टींची अंतहीन मालिका असते, जिथे आयुष्याला पुढे चालवणारी आशा नावाची अद्भुत साखळी नाहीशी झालेली असते, त्या रुक्ष आणि भकास तुरुंगात अँडी जेव्हा काही काळापुरता मोझार्टची सिम्फनी वाजवतो तेव्हा ती काय आहे ते कळलं नाही तरी तेथील कैद्यांच्या मनात आशेचं इवलंसं फूल फुलवते, ते आठवलं. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/qzuM2XTnpSA/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/qzuM2XTnpSA?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
आणि त्याचवेळी हे देखील जाणवलं की हॉस्पिटलमधील फ्लॅश मॉबच्या त्या संगीताने अनेकांना काहीकाळ चिंतामुक्त केलेलं असलं तरी कदाचित असह्य वेदनेने तळमळणाऱ्या काही जणांना त्याचा त्रास झालेला असू शकतो. आपल्याला सुखावणारे सूर इतरांना सुखावत असतीलंच हे गृहीतक मोठं धोकादायक आहे. ते इतरांच्या आवडीनिवडीबद्दल, त्रासाबद्दल, आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मनःशांतीबद्दल आपल्याला आंधळं बनवू शकतं. तल्लीनतेने गायलं जाणारं भारतीय शास्त्रीय संगीत कित्येकांना नीरस वाटू शकतं. बेभान होऊन ढोल वाजवणारे स्वतः जरी खूष होत असतील तरीही त्या तालाचा त्रास होणारे अनेकजण असू शकतात. कुणाची अजान तर कुणाची आरती एकाच वेळी कुणाची मन:शांती वाढवत असताना इतर कुणासाठी मात्र डोकेदुखी होऊ शकते. कॉलेज जीवनातील माझा आवडता मायकेल जॅक्सन माझ्या वडिलांना आवडत नव्हता. इतकंच काय पण मगाशी लागून गेलेलं क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी मला समजत नसल्याने फार आवडत नसलं तरी ते माझ्या मुलांना आवडतं हे मला काही कारण नसताना खटकतं. </div>
<div>
<br /></div>
<div>
चेकॉव्हस्कीची रचना हॉस्पिटलात सादर करणाऱ्या फ्लॅश मॉबमुळे सकाळपासूनच्या माझ्या सकारात्मक विचारात अशा तऱ्हेने थोडा खंड पडला. आणि मी फोन पुन्हा खिशात ठेवून उताराला लागलो. ऑटो प्लेलिस्ट चालू होती. सहासात मिनिटं कुठलंतरी संगीत चालू होतं. सकाळच्या रोमांचकारी संगीताबरोबर केलेल्या रोलरकोस्टर राईडनंतर आलेल्या विचारांमुळे थोडा खिन्न झालो होतो. आणि एकाएकी लहान मुलांच्या आवाजात गाणं चालू झालं. धून ओळखीची होती. पण कुठली ते लक्षात येईना. शेवटी फोन खिशातून बाहेर काढला. संगीताच्या त्या रचनेचं नाव होतं 'ला विटा इ बेला' या इटालियन वाक्याचा अर्थ होतो 'लाईफ इज ब्युटीफुल'. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/uEOZHYUCIhU/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/uEOZHYUCIhU?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
रॉबर्टो बेनिग्निच्या लाईफ इज ब्युटीफुल या चित्रपटात ओफेनबाख या जर्मन - फ्रेंच संगीतकाराच्या रचनेचा वापर केलेला आहे. माझी अतिशय आवडती रचना लहान मुलांच्या तोंडून ऐकताना मला जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे. मगाशी आलेली खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. आणि मी टेकडीच्या त्या निर्जन उतारावर, कानात वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर झुलत झुलत, हात हवेवर हलवत हलवत झोकात उतरू लागलो. जर त्या वेळी मला कुणी पाहिलं असेल तर 'आजकाल लोक मॉर्निंग वॉकलाही ढोसून येतात', असं त्याच ठाम मत झालं असतं. आपला पदन्यास हा झोकांड्या या सदरात जातो आहे हे जाणवूनही त्या संगीताच्या तालावर झुलण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की माझ्या मनात आधीपासून असलेली, पिझ्झा हटमधील अनपेक्षित नाचण्यामुळे अजून घट्ट बसलेली नाचण्याविषयीची अढी त्या वाकड्या उतारावर मला नाचता येत नसूनही करत असलेल्या झुलण्यामुळे किंचित सैल झाली होती.</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-30657235290784296942020-03-09T20:52:00.001+05:302020-03-09T20:52:23.317+05:30नंदीबैल, माझ्या आयुष्यातील मुली आणि महिला दिन <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
माझ्या लहानपणी नंदीबैल घेऊन दारोदार फिरणाऱ्या आणि लोकांचं भविष्य सांगणाऱ्या एका ज्योतिष्याने 'तुमच्या लेकराला मुलींकडून फायदा होईल ताई' असं माझ्या आईला सांगितलेलं मला आठवतं. हे वाक्य आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर (म्हणजे मी अजून वानप्रस्थाश्रम घेण्याइतका म्हातारा झालेलो नाही. तरीही वयाच्या पाचव्या वर्षानंतरच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे दहा दहा वर्षांचे चार टप्पे केले तर) त्या त्या वयातील कुमारसुलभ किंवा तारुण्यसुलभ किंवा गृहस्थसुलभ भावनांमुळे मला आशावादी राहण्यात मदत करत आलेलं आहे. असं असलं तरी त्या वाक्याची मला प्रचिती आलेली नाही असं माझं मत होतं. पण आज महिला दिनावरच्या इतरांच्या पोस्ट्स पाहून मला मुलींमुळे झालेल्या फायद्याबद्दल विचार करावासा वाटला. तेव्हा जाणवलं की, <br /><br />माझ्या आयुष्यात भरपूर मुली येतील याची काळजी माझ्या जन्माअगोदरच माझ्या आजी आजोबांनी घेतली आणि मला पाच मावश्या असतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती. आजी आजोबांच्या थोरल्या मुलीचा मी पहिला मुलगा असल्याने मी 'पुतना मावशी' असं म्हटलं तरी कौतुकाने धपाटे घालत आपल्या पहिल्या भाच्याचं कौतुक करण्यात सगळ्या मावश्या दंग असायच्या. अशी माझ्या आयुष्याची सुरुवात भरपूर कौतुक करणाऱ्या मुलींमधेच झाली. आजोबांच्या सहाही मुलींचा मी लाडका आहे आणि आपलं हे लेकरू किंवा भाचरू चांगलं आहे या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आत्यंतिक निराशेच्या कित्येक क्षणांत मला आधार दिलेला आहे. <br /><br />नंतर शाळेत गेलो. मुलामुलींची एकत्र शाळा असली तरी एकाच बाकावर आपापल्या आवडत्या मित्र मैत्रिणींशेजारी बसण्याची मुभा नव्हती. त्यामुळे वर्गात एका अदृष्य रेषेच्या डावीकडे मुलं आणि उजवीकडे मुली अशी दहा वर्षे काढली. मी डाव्या विचारांकडे ओढ घेणारा मुलगा असावा हे माझ्या शिक्षकांना कसं काय कळलं कुणास ठाऊक? पण कदाचित डाव्या विचारांना डोंबिवलीत मूळ धरता येऊ नये म्हणून किंवा मग मी अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री पटल्यामुळे मला कायम या अदृष्य रेषेवर बसायला मिळालं. त्यामुळे डावीकडचं हृदय मुलांच्या बाजूला असूनही माझ्या उजव्या मेंदूवर मुलींच्या कोलाहलाचे कोमल घाव दहाही वर्षं पडत राहिले.<br /><br />वर्गात मुलींच्या बाजूला पेन किंवा पेन्सिल पडली तर आता ती कायमची गेली असं समजावं हे सांगणाऱ्या शाळेत दहा वर्षे गेल्याने कुमारसुलभ भावनांना तोंड फोडणं मला जमलं नाही. पण कधीतरी चुकून किंवा जाणूनबुजून उजव्या बाजूला पडणारी माझी पेन्स, पेन्सिली आणि खोडरबरं मी न मागताही मला कायम परत मिळत होती. त्यामुळे जगात चांगुलपणा आहे यावरचा माझा विश्वास टिकून राहिला. <br /><br />शाळेची दहा वर्षे शब्देविण संवादात गेल्याने कॉलेजात गेल्यावर, परमेश्वराने सृष्टीचं चालन करण्यासाठी तयार केलेल्या आणि आपल्या मनोरम विभ्रमांनी माझ्या ज्ञानयज्ञात अडथळे आणणाऱ्या अप्सरांशी कसं बोलावं ते मला कळत नसे. <br /><br />बाईक असलेल्या मुलाच्या आजूबाजूला कोंडाळे करुन उभे असलेल्या या अप्सरांपैकी कुणालाही सायकल चालवणाऱ्या मी जर 'चल डबलसीट गं लांब लांब लांब' म्हणालो असतो तर त्या सर्वांनी जो जीता वही सिकंदरमधील पूजा बेदीला न्यूनगंड येईल अश्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं असतं आणि मला माझ्या पायजमाछाप असण्याची जाणीव करून दिली असती. त्यानंतर मला लक्ष्यामामा म्हणून हाका मारायला सुरुवात केली असती. याची कल्पना असल्याने मी तसं काही न करता माझा मुक्काम कॉलेजच्या गेटऐवजी रीडिंग रुममधेच ठेवला. 'लवकर सीए होऊ. पैसे कमवू आणि मग बाईक घेऊन ऐटीत कॉलेजच्या गेटवर येऊ', अश्या विचारामुळे मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं गेलं. त्यामुळे माझ्या लवकर सीए होण्यातही एका तऱ्हेने मुलींचाच अदृश्य हात होता. <br /><br />स्वतः फार देखणा नसताना केवळ गप्पा मारण्याच्या आणि स्वप्न रंगवून सांगण्याच्या बळावर जेव्हा मी एका अठरा वर्षाच्या मुलीला 'तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मै' हे पटवू शकलो तेव्हा आपण असं करू शकतो यावर माझा विश्वास पक्का करण्यात माझ्या त्या प्रेयसीचा मोठा हात होता. जेव्हा तिचा हात मागायला तिच्या घरी एकटा गेलो होतो तेव्हा आपला नवरा कदाचित नाही म्हणेल हे जाणवून त्याला माजघरात बोलवून तसं न करण्याची सूचना देणाऱ्या सासूबाईंमुळे, 'केवळ माझ्या आजोबांच्या मुलीच नव्हे तर जगातील इतर ज्येष्ठ स्त्रियाही मायाळू असतात' यावरचा माझा विश्वास वाढला होता. <br /> <br />आणि त्यानंतर आजतागायत 'मी आणि माझ्या आईने तू मला सुखात ठेवशील या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता त्यामुळे आता तुझा शब्द पूर्ण कर', असं केवळ नजरेने सांगून मला आळशीपणापासून दूर ठेवण्यातही माझ्या तत्कालीन प्रेयसीचा आणि सध्याच्या अर्धांगिनीचा हात आहे. <br /><br />कॉमर्सचे क्लासेस सुरू केले आणि सायन्सपेक्षा कॉमर्सकडे मुलींचा जास्त ओढा असल्याने वर्गात मुलीच जास्त असतात. परिणामी माझ्या बँकेत येणारी लक्ष्मी ही मुलींच्या पावलानेच आली. <br /><br />पुण्यात क्लासची शाखा काढायचं ठरवलं तेव्हाही शाळेच्या वर्गातील आता पुण्यात स्थायिक झालेल्या मैत्रीणींनी आणि फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनीही खूप मदत केली. <br /><br />आता जाणवतं आहे की त्या नंदीबैलवाल्याची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. खरोखरंच मला मुलींकडून भरपूर फायदा झाला आहे. त्यामुळे माझा फायदा करून देणाऱ्या आणि जसा मी आहे तसा होण्यास मला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-35902122171359648042020-02-09T19:38:00.002+05:302020-02-09T19:39:37.132+05:30भैरप्पांची साक्षी आणि कुरोसावांचा राशोमोन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
भैरप्पांची साक्षी ही नवीन प्रसिद्ध झालेली कादंबरी वाचली. नवीन म्हणजे मराठीत नवीन. कारण मूळ कानडी कादंबरी तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली होती. तिचा मराठी अनुवाद आता प्रसिद्ध झाला.<br />
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SAKSHI/3030.aspx" target="_blank"><img border="0" data-original-height="400" data-original-width="250" height="200" src="https://1.bp.blogspot.com/-AGAYhCDEaxs/XkAR9Xz7RAI/AAAAAAAABnc/BlsAHRCmNV4fmipeaT79_wOMbjYMkInwACLcBGAsYHQ/s200/3030.jpg" width="125" /></a><span id="goog_965186375"></span><a href="https://www.blogger.com/"></a><span id="goog_965186376"></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div>
<div>
स्त्री पुरुष संबंध. एका माणसाची टोकाची अनिर्बंध कामेच्छा आणि त्यातून झालेला त्याचा खून. एक माणसाचा टोकाचा सत्यवादीपणा आणि त्यातून त्याने केलेली आत्महत्या; एका माणसाचा टोकाचा कंजूषपणा आणि त्यातून झालेली त्याच्या मोजक्या कुटुंबियांची कुचंबणा; एका स्त्रीचा टोकाचा हट्टीपणा आणि त्यातून झालेली तिची परवड; एका माणसाचा टोकाचा निरिच्छपणा आणि त्यातून त्याच्या कुटुंबीयांची होणारी घुसमट; एका स्त्रीचा टोकाचा राग आणि त्यामुळे तिच्या हातून घडलेला नृशंस खून; हे साक्षीचे मुख्य खांब आहेत. आणि या खांबांच्या बरोबर भारतीय पुराणातील चित्रगुप्ताची कल्पना वापरत भैरप्पा सत्य या संकल्पनेचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करतात. </div>
<div>
<br /></div>
<div>
कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झालेला असल्याने कादंबरीचा गोषवारा देऊन वाचकांचा रसभंग करणं मला योग्य वाटत नाही. त्याचप्रमाणे मी रूढार्थाने समीक्षकही नाही. त्यामुळे कादंबरीच्या कथावस्तूबद्दल न बोलता कादंबरी वाचताना माझ्या आयुष्यातील काही प्रसंगांमुळे माझ्या मनात कोणकोणते विचार आले तेव्हढेच मांडायचा प्रयत्न करतो आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
भारतीय परंपरेत, चित्रगुप्ताकडे सगळ्यांच्या पाप पुण्याचा हिशोब असतो आणि मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात याचा निर्णय घेण्यासाठी यमधर्माला या हिशोबाचा उपयोग होतो असं मानलं जातं. भैरप्पा या संकल्पनेचा विस्तार करत चित्रगुप्त ही एक व्यक्ती नसून एक व्यवस्था आहे असं चित्र रंगवतात. प्रत्येक व्यक्तीबरोबर एक चित्रगुप्त त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अदृश्य साक्षी म्हणून वावरत असतो. मृत्यूनंतर जेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा यमधर्मासमोर उभा राहतो तेव्हा त्याला आपल्या आयुष्याचा लेखाजोखा स्वतःच मांडायचा असतो. हे करत असताना जर त्या व्यक्तीच्या आत्म्याने असत्याचा आधार घेतला तर मात्र चित्रगुप्ताचा नम्र आणि गंभीर आवाज मधे येतो आणि घडलेल्या घटनांवर व्यक्तीने चढवलेले असत्याचे आवरण दूर करतो असा भैरप्पांचा कल्पनाविस्तार आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
पुनर्जन्म ही भारतीय परंपरेला मान्य असलेली संकल्पना आहे. त्यामुळे पहिला जन्म संपल्यावर त्याचा पाढा यमधर्मासमोर वाचायचा मग स्वर्ग किंवा नरकवास. पुण्यक्षय किंवा पापक्षयानंतर स्वर्ग किंवा नरकवास संपवून मग दुसरा जन्म मग पुन्हा मृत्यूनंतर पुन्हा आयुष्यातील घटनांची उजळणी मग पुन्हा स्वर्ग किंवा नरकवास. हे चक्र मोक्ष मिळेपर्यंत चालू राहणार आहे अशी भारतीय मान्यता आहे. त्यात आयुष्याची उजळणी करताना मनुष्य असत्य बोलू शकतो हे गृहीत धरलेलं आहे. म्हणजे असत्याचा जन्म माणसाच्या जन्माआधीच झालेला असतो आणि माणसाच्या मृत्यूनंतरही असत्याचा मृत्यू होत नाही. किंबहुना सत्य आणि असत्य हे सृष्टीचे मूळ घटक असावेत आणि त्यापैकी कशाचा वापर करावा ते व्यक्ती ठरवते. त्यामुळे व्यक्ती सत्य सांगते आहे की असत्य ते प्रत्यक्ष यमधर्मालाही माहीत नसते. ते माहीत करून घेण्यासाठी मग यमधर्माला गरज पडते ती साक्षीची. </div>
<div>
<br /></div>
<div>
अर्थात इथे भैरप्पा घटनेच्या सर्व बाजू त्या घटनेत सहभागी असलेल्यांना माहिती असतातंच पण तरीही व्यक्ती असत्य बोलतात असा मुद्दा मांडत नाहीत. याउलट एखाद्या घटनेत आपला सहभाग किती होता आणि का होता याचं स्पष्टीकरण देताना व्यक्ती असत्याचा आधार घेऊ शकते असा मुद्दा मांडतात. म्हणजे कादंबरीत सत्य असत्याची केलेली चर्चा ही घटनेच्या सत्य स्वरूपाबद्दल नसून घटनेतील सहभागी व्यक्तींनी आपापल्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याच्या सत्यासत्यतेबद्दल आहे. मग हे समर्थन सत्य आहे की असत्य ते ठरवणार कसं? त्यासाठी भैरप्पा चित्रगुप्त या व्यवस्थेची योजना करतात. </div>
<div>
<br /></div>
<div>
जो सर्व घटनांच्या वेळी होता पण कुठल्याही घटनेत कुठल्याही प्रकारे ज्याची भावनिक गुंतवणूक नव्हती, कुठल्याही घटनेतून ज्याला कुठलाही फायदा अगर तोटा होणार नसतो तोच खरा साक्षी असू असतो. आणि त्याने साक्ष देताना केलेलं व्यक्तीच्या मनोव्यापारांचं वर्णन हेच सत्यकथन असू शकतं असा एक मुद्दा भैरप्पांनी मांडला आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
कादंबरी वाचून संपली. सत्य असत्याबद्दल आणि सत्यकथनाबद्दल भैरप्पांचे विचार मनात घोळत राहिले. </div>
<div>
<br /></div>
<div>
मग एके दिवशी चुलत सासू सासऱ्यांना पुण्याहून डोंबिवलीला घेऊन जात असताना भरपूर गप्पा मारत होतो. बोलता बोलता बोलेरो या संगीताचा विषय निघाला. म्हणून यूट्यूबवर त्यांना बोलेरो लावून ऐकवलं. </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen="" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/dZDiaRZy0Ak/0.jpg" frameborder="0" height="266" src="https://www.youtube.com/embed/dZDiaRZy0Ak?feature=player_embedded" width="320"></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
मग त्याबद्दल बोललो. मग हे कुठे कुठे वापरलं आहे ते सांगताना राशोमोनचा विषय निघाला. म्हणून राशोमोनमधे वापरलेला जपानी बाजाचा बोलेरोचा तुकडा त्यांना ऐकवला. </div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen="" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/4vbgFk21I8I/0.jpg" frameborder="0" height="266" src="https://www.youtube.com/embed/4vbgFk21I8I?feature=player_embedded" width="320"></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
मग राशोमोनबद्दल बोललो. गाडीचं स्टीयरिंग माझ्या हातात असल्याने, मी जे ऐकवीन आणि सांगीन ते निमूटपणे ऐकण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नव्हतं. पण घरी गेल्यावर जेव्हा मी त्यांना राशोमोन पाहणार का? असं विचारलं तेव्हा त्यांनी चटकन हो म्हटलं त्यामुळे मी त्यांना अगदीच बोअर केलं नाही हे जाणवून मला थोडं हायसं वाटलं. </div>
<div>
<br /></div>
<div>
<a href="https://archive.org/details/dom-24164-rashomon" target="_blank">राशोमोन सुरु केला</a>. लाकूडतोड्याची साक्ष संपली. पोलिसाची साक्ष संपली. सामुराई योद्ध्याच्या बायकोची साक्ष संपली. सासरे आणि मुलं तल्लीन होऊन राशोमोन पाहत होते. आणि त्यांना आपण एक महान आनंद मिळवून दिला आहे असा विचार करून मी खूष होत होतो. मग राशोमोनमधला महत्वाचा प्रसंग सुरु झाला. मृत सामुराई योद्ध्याच्या आत्म्याला साक्ष देण्यासाठी कोर्टांत बोलावलं गेलं. आणि मी चपापलो. मृताम्याची साक्ष. चार दिवसांपूर्वी भैरप्पांनी शब्दरूपात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष वाचली होती आणि आता कुरोसावांनी चित्रपटात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष बघत होतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
माझ्या नकळत मनातल्या मनात या दोन्ही साक्षींची तुलना सुरु झाली. </div>
<div>
<br /></div>
<div>
साक्षीमधे आणि राशोमोनमध्ये सत्य काय असत्य काय? हे समान सूत्र आहे. पण त्यांचा विस्तार मात्र वेगवेगळ्या दिशेने जातो. </div>
<div>
<br /></div>
<div>
राशोमोनमधील साक्ष मानवी न्यायालयात आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
घटनेचे अनेक पदर असतात. आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा तिच्या बाजूने घटना मांडते तेव्हा एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या कथा समोर येतात. मग त्यातील सत्य कुठली आणि असत्य कुठली?, हे कसं ठरवायचं? वेगवेगळ्या कथनांमधून कुणावर विश्वास ठेवायचा? हे मुद्दे राशोमोमधे मांडलेले आहेत. लाकूडतोड्या असत्य सांगत आहे हे यात्रेकरूला लगेच कळतं. त्यामुळे बुद्ध भिक्षूलाही लाकूडतोड्या, पोलीस, ताजोमारू, बलात्कारित स्त्री, सामुराईचा आत्मा यापैकी कुणीच संपूर्ण सत्य सांगत नाही आहे याचा उलगडा होतो. आणि तिथेच राशोमोन पुढचा प्रश्न टाकतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
जेव्हा सगळेच खोटं बोलत आहेत हे कळून चुकतं तेव्हा माणसाने कुणावरही विश्वास ठेवण्यासाठी कशाचा आधार घ्यायचा? लाकूडतोड्याकडे लहान मूल सोपवून बुद्ध भिक्षू त्याची निर्णय घेण्याची पद्धत आपल्याला सांगतो. जेव्हा सगळे जण खोटं बोलत आहेत असं कळतं तेव्हा ज्याच्याकडे खोटं बोलण्यासाठी सबळ कारण आहे आणि ते जीवनाला पुढे नेणारं आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी मांडणी राशोमोनने केली आहे, असं माझं आकलन आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
म्हणजे माझ्या मते सत्य काय? असत्य काय? या प्रश्नांवरून सुरु होणारा राशोमोनचा प्रवास सगळेच आपापल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी असत्याचा आधार घेत असताना विश्वास कुणावर ठेवावा? या प्रश्नापर्यंत पोहोचतो.</div>
<div>
<br /></div>
<div>
राशोमोनच्या माध्यमातून असत्याचा जन्म कसा होतो ते कुरोसावा आपल्याला सांगतात आणि त्यापासून सुटका नाही हेही समजावतात. व्यक्तीला दिसणारी घटना अर्धसत्य असते. त्या घटनेचं स्वतःच्या प्रतिमेला सुसंगत असं चित्र प्रत्येक व्यक्ती तयार करते आणि त्यालाच सत्य मानते. त्यामुळे घटनेची न दिसलेली बाजू आणि स्वप्रतिमाप्रेम यातून असत्याचा जन्म होतो. मूळ घटना आणि व्यक्तीने सांगितलेली घटना यात किती अंतर आहे हे सांगणं कुणालाही शक्य नाही; अशी सिद्धता मांडून मग वेगवेगळ्या असत्यांत जगत असताना माणसाने आजूबाजूंच्यापैकी कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवावा ? या प्रश्नाकडे कुरोसावा आपलं लक्ष वेधतात. </div>
<div>
<br /></div>
<div>
याउलट साक्षी कादंबरीतील साक्ष यमधर्मासमोर आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
साक्षी कादंबरीमध्ये मृत व्यक्तीने केलेलं वर्णन सत्य आहे की असत्य आहे हे सांगण्यासाठी चित्रगुप्त या दैवी साक्षीदाराची योजना केलेली आहे. आणि यमधर्माच्या तोंडी, 'इथे चित्रगुप्ताचा शब्द प्रमाण मानला जातो', या अर्थाचं वाक्य आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
म्हणजे साक्षीत असत्य हा जीवनाचा एक घटक मानला आहे. त्याची निवड करावी अगर नाही तो व्यक्तीचा निर्णय असतो. व्यक्तीला जे दिसतं ते अर्धसत्य आहे हे भैरप्पांनाही मान्य आहे. पण आपल्याला दिसलेलं अर्धसत्य जसं आहे तसंच सांगावं की त्यात स्वतःची प्रतिमा वाचवणारे आणि स्वतःचे हेतू दडवणारे रंग मिसळून त्याला बदलावं हा व्यक्तीचा निर्णय असतो. आणि व्यक्तीने असे रंग मिसळले आहेत की नाहीत ते सांगणं चित्रगुप्ताला शक्य असतं, असं प्रतिपादन साक्षी कादंबरी करते. जर सत्य काय आहे ते शोधणं शक्य असेल तर वेगवेगळ्या असत्यांच्या जगात विश्वास कुणावर आणि कशाच्या आधारावर ठेवायचा?, हा प्रश्न भैरप्पांच्या पात्रांना पडत नाही. </div>
<div>
<br /></div>
<div>
म्हणजे राशोमोनमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन अर्धसत्य तर त्यांच्या कथनातून जगाला त्या घटनेची होणारी वेगवेगळी दर्शनं म्हणजे असत्याची वेगवेगळी रूपं असा मुद्दा आहे. याउलट साक्षीमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन भलेही अर्धसत्य असलं तरी त्याच्यापुरतं ते सत्य आणि जर त्याने त्याच कथन करताना आपले रंग त्यात मिसळले तर ते असत्य असा मुद्दा आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
राशोमोनमध्ये असत्यापासून सुटका नाही. याउलट साक्षीमध्ये चित्रगुप्त साक्षीदार असल्याने आणि त्याचा शब्द प्रमाण मानणे हाच नियम असल्याने असत्याला झिडकारणे शक्य आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
असा विचार करत मी भानावर आलो. तोपर्यंत सासरे झोपी गेले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा काही सांगण्यासाठी झोपेतून उठवणं मला जीवावर आलं होतं. त्यामुळे माझ्या मनात आलेला शेवटचा प्रश्न अनुत्तरीत राहिला. 'जर भैरप्पा जपानी परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्ताशिवाय त्यांनी साक्षी कादंबरी कशाप्रकारे मांडली असती? आणि जर कुरोसावा भारतीय परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्त वापरून त्यांनी राशोमोनचा शेवट कसा केला असता?</div>
</div>
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/--_3-cJvUmyY/XkAR2BjIe2I/AAAAAAAABnY/XJdnpqHDwZsh3-1P_GM_bTpbITPRWBl8wCLcBGAsYHQ/s1600/85161131_10157309114264069_6753768719282864128_o.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="720" height="240" src="https://1.bp.blogspot.com/--_3-cJvUmyY/XkAR2BjIe2I/AAAAAAAABnY/XJdnpqHDwZsh3-1P_GM_bTpbITPRWBl8wCLcBGAsYHQ/s320/85161131_10157309114264069_6753768719282864128_o.jpg" width="320" /></a></div>
<div>
<br /></div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-20760399603474082452020-02-09T19:15:00.000+05:302020-02-09T19:15:38.918+05:30विविध परंपरा आणि अध्यक्षीय लोकशाही <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा, आहारविहार पध्दती असूनही सलग भूभागामुळे व एकसदृश संस्कृतीने आणि युरोपियनांच्या कृपेने आधुनिक कायदापध्दतीने एक देश म्हणून एकत्र होणाऱ्या प्रदेशांतून देशनिर्माण होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून आणि परंपरांतील भिन्नत्वामुळे विघटनवादी विचार भविष्यात प्रबळ होऊ नयेत म्हणून, 'ताकदवान केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ता', असं प्रारूप भारतीय घटनेने स्वीकारलं.<div>
<br />स्वातंत्र्य चळवळीत दीर्घकालीन सक्रिय सहभाग आणि भारतीय जनतेच्या मूळ भावनिक व वैचारिक बैठकीशी सांधा जुळलेल्या कॉंग्रेस पक्षाला स्वातंत्र्यचळवळीनंतर या घटनात्मक प्रारुपाचा फायदा झाला. परिणामी प्रबळ केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ताही हाती आलेला कॉंग्रेस, हा एक प्रबळ राजकीय पक्ष होत गेला. त्याचबरोबर देशात सत्ता राबवायची तर केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी एकंच पक्ष हवा हा विचारही दृढ होत गेला. <br /></div>
<div>
भिन्न परंपरा आणि भिन्न राजकीय अस्मिता असलेल्या या नवजात देशात घटनाकारांना ज्याचा अंदाज आला होता त्याप्रमाणे हळूहळू प्रादेशिक पक्षही जन्म घेऊ लागले. आणि स्वातंत्र्यचळवळीतील 'आपण एक देश आहोत' ही जाणीव हळूहळू हरपू लागली आणि आपापल्या प्रदेशाची अस्मिता उच्चारवात मांडणाऱ्या राजकीय पक्षांकडे लोक ओढले जाऊ लागले. यातून कॉंग्रेस पक्षाला अन्य राजकीय पक्षांचे टेकू घेणं आणि आपल्या देशाला एकामागून एक कडबोळं सरकार मिळणं असा काळ सुरू झाला. सध्या केंद्रात प्रबळ असलेल्या भाजपलाही प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करत करतंच आपलं राष्ट्रीय स्वरुप प्राप्त करता आलं आहे.<br /></div>
<div>
म्हणजे कॉंग्रेसचा प्रवास प्रबळ राष्ट्रीय पक्षाकडून प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणारा राष्ट्रीय पक्ष असा होत असताना भाजपचा प्रवास मात्र प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणाऱ्या पक्षाकडून प्रबळ केंद्रीय पक्ष असा होत गेला. तुम्ही ज्यांच्याशी स्पर्धा करता त्यांच्यासारखेच तुम्ही बनत जाता या नियमाला अनुसरूनंच दोन्ही पक्षांची वाटचाल झाली आहे. प्रादेशिक पक्षांच्या अरेरावीमुळे आणि संकुचित दृष्टिकोनामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या पाठिंब्याने भाजपची वाटचाल अधिक वेगवान होत गेली आणि त्याचबरोबर अजून एक विचारप्रवाह सुरू झाला की आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय प्रारुप आणि द्विपक्षीय राजकीय पध्दत अमलात यावी. <br /></div>
<div>
प्रबळ एक धर्म, मोठ्या जनसमूहाची एक भाषा आणि बहुतांश समाजाचा एक देव असलेल्या अमेरिकेचं हे प्रारुप व पध्दत आपल्याला आवडणं यात चुकीचं काहीच नाही. देखणी बायको दुसऱ्याची याप्रमाणे चांगली राजकीय पध्दतही दुसऱ्याचीच असते. विशेषतः संकुचित मानसिकतेचे प्रादेशिक पक्ष आणि आपापल्या गटातटांना फायदा करुन देण्यासाठी सत्ता वापरण्याची त्यांची मानसिकता दिसत राहिली की अमेरिकन घटना आणि अमेरिकन राजकीय पक्षप्रणाली आवडली नाही तर नवलच.<br /></div>
<div>
हा विचारप्रवाह भाजप आणि कॉंग्रेस या दोघांच्या पथ्यावर पडणारा असल्याने त्यांचे समर्थक या विचाराला कळतनकळत पुढे रेटत रहाणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.<br /></div>
<div>
पण ती पध्दत, प्रणाली व प्रारुप एक भाषा, एक धर्म, एक अस्मिता तयार करून(कुठलेही अत्याचार करुनका होईना) झाल्यानंतर अधिक प्रभावीपणे वापरणं शक्य आहे. आणि जर ते आपल्याला मान्य असेल तर आपल्या या नवजात देशातील कित्येक परंपरा, धर्म, आहारविहार पध्दती यांच्यावर वरवंटा फिरवणंही आपल्याला मान्य करावं लागेल. हे वेगवेगळ्या परंपरांचे पर्वतप्राय उंचवटे आपल्याला समतल करावे लागतील. कुणी कितीही सांगो पण ती प्रक्रिया अन्यायकारीच असणार आहे. जर हा अन्याय करण्याचं पातक आपल्या माथी नको असेल तर मग प्रादेशिक अस्मितांच्या जंजाळात न गुंतवता आणि दमनकारी समतलतेचा आग्रह न धरणाऱ्या प्रबळ केंद्रीय सत्तेच्या वरवंट्याखाली जाऊ न देता, या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग कुठला? या प्रश्नाने मलाही छळलं होतं.<br /></div>
<div>
पण दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने निवडणूक लढण्यासाठी ज्या मुद्द्यांची निवड केली आणि प्रचार संपेपर्यंत त्यापासून न ढळता आपली बांधिलकी घट्ट केली ते पहाता या प्रश्नाचं उत्तर सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं मला वाटतं.<br /></div>
<div>
प्रादेशिक पक्षांनी आपापल्या अस्मिता जपताना केवळ विकासाकडे आणि नागरी जीवन सुखकर करण्याकडे लक्ष दिलं तर अनेकानेक प्रादेशिक पक्ष असूनही; विविध परंपरा, भाषा, धर्म, आहारविहार पध्दती असूनही ; त्यांच्यावर वरवंटा न फिरवता प्रगती साधणं कठीण असलं तरी अशक्य नाही. आणि त्यात ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्माप्रमाणे एकमेव मार्गाचा आग्रह नसून 'विप्रा बहुधा वदन्ति' चा भारतीय सूर आहे. <br /></div>
<div>
त्यामुळे 'आप'ला दिल्ली निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि अन्य राज्यांतील भाजपेतर पक्षांच्या सरकारांना आपचे निवडणूक मॉडेल आपापल्या परंपरांच्या कोंदणात कसे बसवता येईल ते लवकर सुचो या शुभेच्छा. त्याचबरोबर विरोधी विचारांना देशद्रोही न ठरवता व कुठलाही धरबंद न ठेवता कुणालाही जवळ करण्याची सवय सोडून प्रबळ केंद्रीय सत्तेचं काय करायचं याचं उत्तर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनाही सुचो अशा त्यांना शुभेच्छा. आणि सर्वात शेवटी 'केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असावी' याऐवजी 'केंद्रात पूर्ण बहुमत असलेल्या राष्ट्रीय पक्षाची तर राज्यात पूर्ण बहुमत असलेल्या प्रादेशिक पक्षाची सत्ता असावी' हा विचार भारतीय मातीतून मोठा होऊन प्रगतीचा नवा मार्ग जगाला मिळो ही सर्वांना शुभेच्छा.</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-9330531611907267742020-02-02T07:13:00.004+05:302020-02-02T07:29:07.963+05:30भाकरी फिरली<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आजच्या अर्थसंकल्पातील सगळ्यात जास्त चर्चा झालेला मुद्दा म्हणजे आयकराच्या दरांची नवीन रचना.<br />
<br />
अर्थशास्त्रात भांडवलाची उभारणी करण्याचे तीन टप्पे मानले जातात. बचत > गुंतवणूक > भांडवल. ज्या देशात नागरिकांना बचतीची सवय नसते, किंवा त्यांची बचत दागिने अथवा तळघरातील हंड्यात अडकलेली असते तिथे गुंतवणूक होणं आणि नंतर त्यातून भांडवलाची निर्मिती होणं हे पुढचे दोन्ही टप्पे प्रत्यक्षात येणं अशक्य असतं. <br />
<br />
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात बचतीबाबत व मुख्य प्रवाहात तिच्या गुंतवणुकीबाबत कमालीचं औदासिन्य होतं. लोक साधा आयुर्विमा काढायला नकार द्यायचे. आयुर्विमा काढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण अशी धारणा असलेली कित्येक वडिलधारी मंडळी माझ्या ओळखीची आहेत. मेडिक्लेम, म्युच्युअल फंड, घरबांधणी, मुलांचं शिक्षण यासारख्या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कित्येक बाबतीत, आपल्या देशातल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या कर्त्या पिढीत काहीही आकर्षण नव्हते. <br />
<br />
त्यातून सुरु झाला आयकर कायद्याचा कल्पक वापर. आयुर्विमा काढा, मेडिक्लेम काढा, घर बांधा, सरकारी कर्जरोखे घ्या, मुलांच्या शिक्षणावर खर्च करा आणि यातल्या बहुतेक सर्व गोष्टी तुमच्यासाठी गुंतवणूक असली तरी ती तुमच्या उत्पन्नातून वजा करा आणि मग उरलेल्या उत्पन्नावर कर भरा. करही कमी आणि चांगल्या भविष्याची हमी अशी ही व्यवस्था होती.<br />
<br />
यातून भांडवल निर्मितीच्या पहिल्या दोन टप्प्यांवर आपल्या अर्थव्यवस्थेने पुढे जाण्यास सुरुवात केली. पण तिसरा टप्पा म्हणजे भांडवलाची निर्मिती; तिथे मात्र आपण अडखळलो.<br />
<br />
उत्पादन क्षेत्रात भरारी न घेता आपण सेवाक्षेत्रात उड्डाण केलं. काही लोकांच्या हातात खेळता पैसा आला. त्यावरचा आयकर कमी करण्यासाठी बचतीचा मार्ग खुला होता. त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमधे झुकाव निर्माण झाला. बहुसंख्य लोकांना परवडतील अशी छोटी आणि मध्यम आकाराची घरे बांधण्याऐवजी मोठी घरे बांधण्याकडे आणि ती विकली जात नसल्यास किंमत कमी करण्याऐवजी त्यांना तसेच पडून राहू देण्याकडे या क्षेत्राचा कल वाढला. भांडवल तयार होण्याऐवजी अडकू लागलं. <br />
<br />
रियल इस्टेटमधे अनैसर्गिक भाववाढ होत असताना लोक आयकरात सूट मिळावी म्हणून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतंच होते, एलआयसीत करत होते आणि मग या संस्थेकडील रकमेला पाय फुटत होते. सरकारातील चलाख लोक या संस्थांचा पैसा आपल्या हेतूंसाठी वापरून घेत होते. आयकरातील सवलतीमुळे नवीन गुंतवणूकदार येत असल्याने जुन्यांच्या पैशाची परतफेड करणं शक्य होत होतं. पण अर्थव्यवस्था केवळ भगवानभरोसे चालत होती. चांगली भाजायला घेतलेली भाकरी करपायला लागली होती. <br />
<br />
या सरकारने घेतलेला कराच्या नवीन दरांचा निर्णय मात्र भाकरी फिरवायची सुरुवात आहे. आज ज्यांच्या डोक्यावर गृहकर्ज आहे ते नवीन कररचनेचा फायदा घेणार नाहीत हे सरकारला माहिती आहे. किंबहुना ही कररचना त्यांच्यासाठी नाही. आजच्या बजेटमुळे त्यांना कुठल्याही नवीन सवलती मिळालेल्या नाहीत. पण ज्यांच्या डोक्यावर कर्ज नाही त्यांनी ते घेताना पुन्हा विचार करावा. ज्यांच्या प्रपंचाच्या बहुतेक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी केवळ आयकरात सूट मिळावी म्हणून गुंतवणूक न करता आता ते पैसे सरळ खर्च करावेत अशी व्यवस्था आज अस्तित्वात आली आहे. <br />
<br />
पुढे जाऊन सर्व वजावटी आणि सुटी रद्द करण्याचा सरकारचा मानस असल्याने येत्या काही वर्षांत ज्यांच्या नावावर अजून एकही घर नाही ते लोकही घर विकत घेणं आणि भाड्यावर घेणं यात खरोखर फायदेशीर काय त्याचं गणित मांडून मगंच कर्जाचं ओझं डोक्यावर घेतील. एलआयसीत किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी शंभरदा विचार करतील याची शक्यता जास्त आहे. अनेक लोक आयुर्विमा काढणं बंद करतील असं मी म्हणत नसून. आयुर्विमा विकणं आता अधिक कठीण होत जाणार आहे.<br />
<br />
बाजार स्वतःहून आपल्या फायद्याचा झुकाव सोडणं अशक्य आहे. त्यामुळे ही फिरलेली भाकरी आता तो झुकाव मोडते का? ते बघणं मोठं औत्सुक्याचं ठरेल.<br />
<br />
सरकारने आज जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमधे मागणी घटणे, विमा व अन्य गुंतवणूक क्षेत्रात लोकांचा रस कमी होणे हे परिणाम घडताना दिसतील. पण भारतीय जनता या उरलेल्या पैशाचे काय करेल? त्यावर आपली भाकरी कच्ची राहील की चांगली शेकून निघेल ते ठरेल. आणि आजपासून पन्नास साठ वर्षांनी आपल्या व्यवस्थेतील वृध्दांकडे जर पुरेशी गुंतवणूक नसेल तर तेव्हाच्या कुटुंबव्यवस्थेतील वृध्दांचं स्थान दयनीय असेल.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-37086370362973785182020-01-09T21:08:00.002+05:302020-01-09T21:09:06.932+05:30विश्वाचा पसारा <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
गजर झाला. जाग आली. पण अंथरुणात लोळत राहिलो. काल एका मैत्रिणीने पाठवलेलं 'झोपणे इज अ थिंग बट लोळणे इज अ फीलिंग' मीम अनुभवत होतो. बायनरी म्हणजे काय यावरचा टेड एडचा व्हिडिओ बघण्यात वेळ गेला. मग घाईघाईत उठलो. चालायला जायला उशीर झाला असं वाटलं होतं पण मोबाईलवर अॉडियोबुक सुरु करताना बघितलं तर नेहमीच्याच वेळेवर पोचलो होतो. <br />
<br />
टेकडीच्या पायथ्यापासून वर चालायला निघालो. अॉडियोबुकची फाईल बहुतेक करप्ट झाली होती. त्यामुळे ते बंद केलं. अजून झुंजूमुंजू झालेलं नव्हतं त्यात आज वीकडे त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं. रात्र वाटावी असा पहाटेचा काळोख, नीरव शांतता, हवीहवीशी पण किंचित बोचरी थंडी आणि भरपूर धुकं. त्यातून चाललेला मी. <br />
<br />
मग मधलं मैदान आलं. इथली जागा अशी आहे की एका बाजूला जंगल, मधे रस्ता, दुसऱ्या बाजूला मैदान त्याच्या पुढे पुन्हा जंगल. त्या जंगलातून माझी नेहमीची पायवाट जाते म्हणून तिथे वळलो. समोरचं दृश्य खरोखर अवर्णनीय होतं. तरी थोडा प्रयत्न करतो. <br />
<br />
मैदान. त्यात माझ्या आधी आलेल्या लोकांच्या उभ्या केलेल्या तुरळक कार्स. पुढे निस्तब्ध झाडं. झाडांवर तरंगणारा धुक्याचा ढग. आणि त्या सगळ्यापुढे उभा असलेला एकटा मी. सोबतीला माझ्याच श्वासाचा आवाज. मला एकदम हॅरी पॉटरमधला मेझ सीन आठवला.<br />
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen="" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/FyqA7eWrFt8/0.jpg" frameborder="0" height="266" src="https://www.youtube.com/embed/FyqA7eWrFt8?feature=player_embedded" width="320"></iframe></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
मग ख्रिस्तोफर नोलानच्या कुठल्यातरी सिनेमातला मी नायक आहे असं वाटून मी खूष झालो आणि जंगलात शिरलो.<br />
<br />
पुढे एका ठिकाणी अरुंद वाट आहे आणि दोन्ही बाजूच्या झाडांच्या फांद्या एकमेकांत गुंफल्या गेल्याने एखाद्या लांबलचक गुहेतून किंवा कमानीखालून गेल्यासारखं वाटतं तो भाग आला. धुकं अजूनंच दाट झालं होतं. रस्ता नेहमीचा असूनही मी वेग कमी करुन थोडा हळू जाऊ लागलो.<br />
<br />
त्या अंधाऱ्या थंडीत झाडांच्या कमानीखाली माझ्या पायाखालच्या ओलसर पाचोळ्याचा माझ्याच चालण्यामुळे झालेला आवाज ऐकू आला. आणि वाटलं या पाचोळ्याखाली असलेल्या लहान किडा मुंग्यांचं आणि कृमी किटकांचं अस्तित्व मला जाणवतही नाही आहे. त्यांच्यासाठी मी गलिव्हर आहे. एखादा महाकाय राक्षस आहे. घटोत्कच किंवा बकासूर. <br />
<br />
किडामुंगीच्या तुलनेत स्वतःच्या महाकाय आकाराची जाणीव होऊन उगाच खूष झालेलो असताना एकाएकी मला असं वाटलं की आता या जंगलावरून एखादं विमान जात असेल तर त्यांना खाली फक्त धुक्याची चादर दिसेल. त्या चादरीखालची टेकडी, टेकडीवरचं जंगल, जंगलातली झाडांच्या दाटीची छोटीशी पायवाट, त्यावरुन एकटाच चालणारा मी; यातलं काहीच त्या विमानातल्या प्रवाश्यांना दिसणार नाही. हा विचार आला आणि या विश्वाच्या पसाऱ्यात आपण किती क्षुद्र आहोत ते जाणवलं. <br />
<br />
अणूपासोनी ब्रह्मांडाऐवजी, ब्रह्मांडापासोनी अणूपर्यंत माझ्या विचारांनी एका क्षणात केलेल्या या प्रवासामुळे मी उगाच आनंदी झालो. मनात आलेल्या असंख्य विचारांतील 'विश्वाचा पसारा' या शब्दांचा प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येत राहिला. <br />
<br />
आठवीत असताना शाळेत खगोल मंडळ या संस्थेने एक छोटं व्याख्यान ठेवलं होतं. ते द्यायला तर बारकेला तरुण आला होता. प्रदीप नायक म्हणजे माझा प्रदीप दादा. त्या व्याख्यानानंतर खगोल मंडळाचा पहिला सभासद म्हणून मी नाव नोंदवलं होतं. मग प्रदीप दादाबरोबर दर महिन्याच्या अमावस्येच्या आसपास येणाऱ्या शनिवारी आकाशदर्शनाला जाऊ लागलो. तिथे आकाशदर्शन घडवून आणणारे अनेक मार्गदर्शक यायचे. त्यांच्या सगळ्यांच्या तोंडी हा शब्द कायम असायचा 'विश्वाचा पसारा'. ते सगळं आठवलं. <br />
<br />
माझी स्मरणशक्ती बरी असली तरी मी पुढच्या अमावस्येपर्यंत आकाशाचा सगळा नकाशा मी विसरलेला असायचो. 'विश्वाचा पसाराच इतका मोठा आहे की कसा काय लक्षात ठेवणार?' असं म्हणत मी ज्यांना नक्षत्रांचे आकार लक्षात रहातात त्यांचा हेवा करायचो. पडणाऱ्या उल्का मोजत रहायचो. एका रात्री दिडशेच्यावर उल्का मोजल्या होत्या. आणि ते करताना मी इतका रंगून गेलो होतो की मी मधेच 'एकोणपन्नास, पन्नास' वगैरे ओरडत होतो त्यामुळे आकाशदर्शन घडवणारे त्या रात्री माझ्या व्यत्ययामुळे किंचित कावले होते हे मला दुसऱ्या दिवशी घरी जाताना प्रदीप दादाने सांगितलं होतं तेव्हा कळलं. नंतरही बरेच दिवस मला तिथे डोंबिवलीचा उल्का मोजणारा म्हणून ओळखत होते. पुढे एकदा कुणीतरी शंका विचारली असताना प्रमुख वक्त्यांना टिळक पंचांगाचं स्पर्धक पंचांग असलेल्या दाते पंचांगाचं नाव चटकन आठवेना तेव्हा मी जोरात आगरकर पंचांग बोललो आणि माझा लौकिक बदलून आगरकर पंचागाचा मुलगा झाला, ते आठवलं. तीन चार वर्षापूर्वी फेसबुकवर अॉस्ट्रेलियातील मैत्रिण, वाई धोत्रेने मृग नक्षत्रातील बीटलगीज या ताऱ्याबद्दल लिहिलेलं ते आठवलं.<br />
<br />
मग प्रदीप दादाने त्याच्याकडचं राहुल सांकृत्यायन असं नाव असलेल्या लेखकाचं वोल्गा ते गंगा नावाचं पुस्तक वाचायला दिलं होतं ते आठवलं. त्या पुस्तकातील प्रवाहण नावाच्या प्रकरणातील ऋषी प्रवाहण आणि लोपमुद्रा व गार्गी यांच्यातील संवाद वाचून पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या ऋषीस्मरणावर पोसलेल्या माझ्या मनावर खोलवर झालेला परिणाम आठवला. नववीतल्या उमलत्या वयात पिवळी पुस्तके वाचलेली नसल्याने वोल्गा ते गंगातील एका राजाच्या कामजीवनाचं वर्णन वाचून गरम झालेली कानशीलं आठवली. मग पैसे कमवायला लागल्यावर राहुलजींची भरपूर विकत घेऊन ठेवलेली पण हिंदीत असल्याने पूर्ण वाचून न झालेली घरातली पुस्तकं आठवली.<br />
<br />
टेकडीवरुन परतताना दूर डोंगरावर दाटलेलं धुकं दिसत होतं. बाईकच्या सीटवर दव पडलेलं होतं. गाडी चालू न करता नुसती उतारावर लोटली. आज रस्त्यावर गर्दी नसल्याने अगदी मेनरोडपर्यंत गाडी चालू न करता यायचं माझं छोटंसं स्वप्न पार पडलं. त्यामुळे खूष झालो. आणि टेकडीचा रस्ता संपून जिथे मुख्य रस्ता सुरू होतो तिथे आमनेसामने असलेल्या दोन टपरीवजा दुकानांसमोर झाडलोट चालू असलेली दिसली. जेमतेम एक माणूस उभा राहील इतकी ती दुकानं छोटी असली तरी एकाच्या नावात मार्केट तर दुसऱ्याच्या नावात सुपरमार्केट आहे हे वाचून मागे एकदा मी हसलो होतो ते आठवलं.<br />
<br />
पण आज एकाचवेळी गलिव्हरची भव्यता आणि विश्वाच्या पसाऱ्यातील क्षुद्रता अनुभवल्यामुळे आणि आठवीपासून ते आजपर्यंतचा कालप्रवास व डोंबिवली ते वांगणी ते अॉस्ट्रेलिया ते पुणे असा स्थलप्रवास मनाने केल्यामुळे त्या दोन्ही अनोळखी दुकानदारांबद्दल मनात भरपूर प्रेम दाटून आलं. <br />
<br />
त्यांची दुकानं भरपूर चालोत. आपल्या मुलाबाळांना ते भरपूर शिकवोत. मार्केट मेकर, मार्केट रेग्युलेटर आणि मार्केट पार्टिसिपंट या संकल्पना माहीत नसताना आपल्या दुकानाला मार्केट किंवा सुपरमार्केट म्हणत त्यांनी लावलेल्या त्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं बीज त्या मुलाबाळांत रुजो... अशा सदिच्छा मनातल्या मनात व्यक्त करत मी हमरस्त्याला लागलो.</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-5004613411305152882019-12-27T21:41:00.000+05:302019-12-27T21:59:58.244+05:30टेकडीवरचा माझा झीरो स्टोन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
ARAI च्या टेकडीवर भरपूर पायवाटा आहेत आणि एक मोठा हमरस्ताही आहे. जेव्हा टेकडीवर नवीन होतो तेव्हा हमरस्त्याने जात होतो. त्याच हमरस्त्याने परतत होतो. जसजसा टेकडीवर रुळू लागलो तसतश्या त्या पायवाटाही खुणावू लागल्या. मग एक दिवस एका नवीन पायवाटेने जायला निघालो. काहीसं निर्जन आणि म्हणून अस्पर्श असं टेकडीच वेगळं रूप पाहून आनंदलो. माझ्या दिशाज्ञानाबद्दल मला विश्वास होता. त्यामुळे पायवाटेने गेलो तरी शेवटी नेहमीच्या ठिकाणी जाईन अशा आत्मविश्वासाने इयरफोन लावून गाणी ऐकत चाललो होतो. वाटेवर एका ठिकाणी बरोबर मध्येच कुणीतरी दगडांची रास रचलेली होती. कुण्या गाढवाने वाटेच्या मधोमध दगड रचून ठेवले आहेत असं म्हणत पुढे गेलो. <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-APUtfwSiYp8/XgYpyJY4rWI/AAAAAAAABgw/cSKQitFX-CQvVCDm2xJQPpdlHW5oCERYQCLcBGAsYHQ/s1600/IMG_20191212_064349%255B1%255D.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="900" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-APUtfwSiYp8/XgYpyJY4rWI/AAAAAAAABgw/cSKQitFX-CQvVCDm2xJQPpdlHW5oCERYQCLcBGAsYHQ/s320/IMG_20191212_064349%255B1%255D.jpg" width="180" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
नेहमीचं ठिकाण जवळ येतंय असं वाटेना. फोनवर रेंज मिळत नव्हती. आणि निर्जन भाग असल्याने कुणाला काही विचारण्याची सोयही नव्हती. रस्ता भरकटल्यासारखं वाटलं. पण शिक्षक असल्याने आपण चुकू शकतो यावर चटकन विश्वास बसत नाही. चालत राहिलो. घामाघूम झालो होतो. यातला किती घाम चालण्यामुळे आणि किती घाम रस्ता सापडत नसल्याच्या तणावामुळे होता कुणास ठाऊक? <br />
<br />
आणि एका वळणानंतर एकाएकी गजानन महाराजांचं टपरीवजा मंदिर समोर आलं. देवभोळा नसल्याने संतभोळाही नाही. पण इतरांना पवित्र वाटणारी वास्तू अनपेक्षितपणे समोर आली की माझ्याकडून नेहमी ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान आणि लष्करी पद्धतीच्या अभिवादनाचं संमिश्र रूप असलेली हाताची हालचाल आपोआप होते, तशी झाली. मंदिराच्या समोरच्या छोट्याश्या अंगणात एक माझ्यासारखा चालकरी हाशहुश करत घाम पुसत बसला होता. आणि मी माझ्या नकळत एक सुटकेचा निश्वास टाकला. त्याला रस्ता विचारला नाही पण आपण निदान मानवी वावराच्या कक्षेत आहोत हे जाणवून सुखावलो. पुढे जात राहिलो तर तीव्र उतार लागला आणि टेकडी संपली. नेहमीची जागा आलीच नाही. मग धापा टाकीत मागे वळलो. पुन्हा चिलीम ओढणाऱ्या महाराजांचं मंदिर दिसलं आणि मनाशी खूणगाठ बांधली की महाराजांच्या मंदिराच्या उजवीकडे टेकडी संपते. तिथे जायचं नाही. <br />
<br />
दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने गेलो. पुन्हा तीच दगडांची रास ओलांडली. आता पुढे गजाजन महाराजांचं देऊळ येईल हे माहिती होतं. देऊळ आलं पण आज उजवीकडे वळलो नाही. डावीकडे अगदी छोटी पायवाट होती. त्या वाटेने गेलो. आजूबाजूला झाडी झुडपं जास्त होती. चालायला छान वाटत होतं. मनात उगाच आपण '<a href="https://youtu.be/9gGeWs9Xe4Y" target="_blank">मॅन व्हर्सेस वाईल्ड</a>'चे किंवा मग '<a href="https://youtu.be/A2wzr0PfmE0" target="_blank">सर्व्हायवर</a>' सारख्या कार्यक्रमाचे नायक आहोत अशी भावना येत होती. आपण गतानुगतिक नाही. आपण नवीन वाट शोधायला घाबरत नाही. असे विचार डोक्यात येऊन स्वतःबद्दल किंचित कौतुक आणि अभिमानही वाटू लागला. झाडी विरळ होऊ लागली. आणि मग पुन्हा मोठी पायवाट सुरु झाली. पुढे जात राहिलो. आणि मग एका उंच चढावाला पार केलं तर पुन्हा नेहमीचा हमरस्ता समोर आला. काहीही केलं नसताना विजयाचा आनंद मनात भरून आला. उशीर झाला होता. म्हणून परतताना पुन्हा हमरस्त्याने निघालो. मग कित्येक दिवस हाच शिरस्ता झाला. जाताना नवीन पायवाट. दगडांची रास. गजानन महाराजांचं मंदिर. डावीकडची छोटी पायवाट. मग मोठी पायवाट. मग चढण. मग हमरस्ता. मग नेहमीच्या ठिकाणी चालण्याचा शेवट आणि परतण्यासाठी नेहमीचा हमरस्ता. <br />
<br />
एका रविवारी असाच परत निघालो होतो. चढणापाशी आलो. समोर हमरस्ता खुणावत होता. पण मनात विचार आला की आज क्लास नाही आहे. तर मग पुन्हा पायवाटेने उलट जाऊया. म्हणून पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करत, हमरस्ता सोडून चढ उतरू लागलो. मोठी वाट संपत आली. कानात कुठलीशी डॉक्युमेंटरी चालू होती. त्याच तंद्रीत चाललो होतो. आणि आजूबाजूला ओळखीच्या खाणाखुणा दिसेनात. तासभर चालून झालेलं होतं. त्यामुळे घशाला कोरड पडलेली होती. शरीरातील अतिरिक्त मेदवृद्धीमुळे भरपूर घाम आलेला होता. तशात डॉक्युमेंटरी संपली. आता लक्ष आजूबाजूला जास्त होतं. सगळी झाडं सारखी. सगळे दगड सारखे. एकक्षण थांबलो. पुन्हा मागे जावं असं वाटलं. पण तिथे दोन मुली माझ्या मागून येताना दिसल्या. (कदाचित माझ्या वयाच्या असाव्यात किंवा मग अजून काही. पण चष्मा घातलेला नसल्याने मला दुरून त्या मुलीच वाटल्या). त्यांचं माझ्याकडे लक्ष जावं इतका मी रुबाबदार नाही हे मला माहिती होतं. पण किमान 'हा धापा टाकणारा मध्यमवयीन पुरुष रस्ता चुकल्यामुळे गोंधळलेला आहे' असं त्यांचं माझ्याबद्दल मत होऊ नये म्हणून मी निसर्ग निरीक्षण करतो आहे असा आव आणला. आणि मग केसांवरून हात फिरवत पुन्हा उताराला लागलो. आता उजव्या हाताला अनोळखी चढण, डाव्या हाताला खोल घळ, मागे अनोळखी मुली आणि त्यांच्या मागे ओळखीचा रस्ता अश्या अवस्थेत मी पोटातल्या कावळ्याचं संगीत ऐकत अरुंद वाटेवरून चालू लागलो. <br />
<br />
मुली बऱ्याच मागे पडल्या आहेत आणि त्यांना आपण दिसत नाही आहोत हे कळल्यावर मात्र मी त्या वाटेतून आणि प्रसंगातून मार्ग कसा काढायचा त्याचा विचार करू लागलो. मागे मुली असणार त्यामुळे तिथे जाण्याचे दोर मनाच्या आढ्यताखोर शेलारमामाने कापून टाकले होते. शेवटी मनाचा हिय्या केला आणि हर हर महादेव करत उजवीकडच्या अनोळखी चढणीकडे वळलो. काट्याकुट्यातून आणि घसरणाऱ्या दगडांवरून पायाबरोबर हातही वापरत, धापा टाकत चढण कशीबशी संपवली. अजूनही काही ओळखीचं दिसेना. त्यानंतर ज्याप्रमाणे मी धावलो ते जर कुणी बघितलं असतं तर, पर्णकुटीत सीता नाही हे पाहून सैरभैर झालेला आणि वृक्षवल्लरिंना तिच्या खाणाखुणा विचारणारा राम कसा दिसत असेल त्याची त्यांना लगेच कल्पना आली असती. फक्त शरचाप, जटा आणि वल्कलं तेवढी नव्हती. <br />
<br />
दिशाहीन होऊन भटकण्यात अजून पाच मिनिटं गेली. ती पाच मिनिटं मला कित्येक युगांसारखी वाटून आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत समजलेला नसला तरी त्याची अनुभूती मात्र आली. जंगल संपून एक पायवाट दिसली. सगळ्या दिशा आणि सगळ्या वाटा आता सारख्याच दिसू लागल्या होत्या. स्वतःच्या दिशाज्ञानावरचा विश्वास आता संपल्यात जमा झाला होता. आपल्याला बहुतेक चकवा लागला आहे असं वाटू लागलं. मग माझ्या लहानपणी रविवारी दुपारी दूरदर्शनवर प्रादेशिक भाषेतील चित्रपट दाखवत त्यात पाहिलेला सत्यजित रेंचा '<a href="https://youtu.be/kTgoDm1_BUI" target="_blank">गुपी गाईन बाघा बाईन</a>' हा चित्रपट आणि त्यात जंगलात वाट हरवलेले गोपी आणि बाघा आठवले. त्यांच्यासमोरचा भुतांचा नाच आठवला. मग युट्युबवर तो चित्रपट आहे हे कळल्यावर मुलांना तो बघण्याची सक्ती केली होती ते आठवलं. आणि सध्याच्या ऍनिमेशनपटांच्या खुराकावर वाढलेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर, 'आपल्या बाबांना लहानपणी हे कसं काय आवडलं असावं?' असा प्रश्न उमटलेला पाहून आपण कसे अस्वस्थ झालो होतो ते आठवून हसू आलं. आणि इतक्या गोंधळलेल्या मनस्थितीतही आपल्या डोक्यात रामायणापासून ते आईन्स्टाईन आणि सत्यजित रेंपर्यंत कुठले कुठले विचार येत आहेत हे जाणवून स्वतःबद्दल थोडं कौतुकही वाटलं. <br />
<br />
<br />
आता मी वाट फुटेल तिथे चालत होतो. मनातल्या शेलारमामाला, मागे दिसलेल्या मुलींना, 'अनोळखी मुलींनाही आपण हुशार दिसलं पाहिजे' या स्वतःच्या बावळट विचाराला शिव्या घालू लागलो होतो. आणि एकाएकी मला समोर ती दगडांची रास दिसली.<br />
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-xc74JbKXooI/XgYp7DmEorI/AAAAAAAABg8/J81N_hJvYHoTUUwAsFD3J_URRtkQFS8TwCEwYBhgL/s1600/IMG_20191212_064411%255B1%255D.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="900" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-xc74JbKXooI/XgYp7DmEorI/AAAAAAAABg8/J81N_hJvYHoTUUwAsFD3J_URRtkQFS8TwCEwYBhgL/s320/IMG_20191212_064411%255B1%255D.jpg" width="180" /></a></div>
<div>
<br /></div>
<div>
सीतेची पैंजणं पाहून रामलक्ष्मणाला जसा आनंद झाला असेल अगदी तसाच आनंद मला झाला. त्या दगडांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. शाहरुखसारखे हात पसरले. स्वतःलाच एक प्रदक्षिणा घातली. आता गजानन महाराजांचं देऊळ कुठे असेल त्याचा पत्ता लागला. टेकडीच्या शेवटच्या टोकाकडे नेणारी नेहमीची ओळखीची चढण कुठे आहे ते कळलं. घरी जायचा रस्ता समजला. सगळ्या टेकडीचा माझ्या मनात तयार असलेला आणि काही काळापूर्वी विस्कटलेला नकाशा पुन्हा पूर्ववत झाला.</div>
<div>
<br />
<div>
रस्त्याच्या मध्यभागी रचलेली ती दगडांची रास जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली होती तेव्हा तिच्याबद्दल मनात आलेले नकारात्मक विचार आता दूर पळाले होते. त्यांची जागा आता विलक्षण आत्मीयतेने आणि प्रेमाने घेतलेली होती. याआधी असाच रस्ता चुकलेल्या कुण्या वाटसरूने पुन्हा रस्ता चुकू नये म्हणून आणि कदाचित इतरांनाही रस्ता कळावा म्हणून ती रास रचली असावी असं वाटून मी त्या अनामिक वाटसरूचे मनातल्या मनात आभार मानले. त्याबद्द्ल कृतज्ञता मनात दाटून आली होती. त्यामुळे त्याला काही देता आलं नाही तरी किमान त्याच्या धडपडीला काहीतरी द्यावं म्हणून मग बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलून त्या दगडांच्या राशीवर ठेवला आणि माझ्या घराच्या रस्त्याला लागलो. <br />
<br />
रस्ते माहिती नसताना जंगलातून फिरत शहरे वसवणाऱ्या आदिमानवाबद्दल; समुद्रात असे दगड रचणे शक्य नसताना हजारो मैल दूर अश्या युरोपातून संपूर्ण जग पादाक्रांत करणाऱ्या माणसांबद्दल; वाळवंटात रोज वाऱ्याने टेकड्या आपल्या जागा बदलत असताना, काफिले घेऊन फिरणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल; सगळ्यांबद्दल आदर दाटून आला. काही दिवसांपूर्वी दोन्ही लेकरांना <a href="https://goo.gl/maps/WCV3oW2gag5imJEm8" target="_blank">पुण्याचा झीरो स्टोन</a> दाखवायला घेऊन गेलो होतो त्यावेळी भारताच्या टोपोग्राफीचा सर्व्हे करण्याचा महान प्रकल्प तडीस नेणाऱ्या ब्रिटिशांबद्दल आदर वाटला होता. त्यांच्या त्या कल्पनेशी माझ्या अनुभवाचा बारीकसा धागा जुळला आहे असं वाटून अंगी आलेला शीण थोडा कमी झाला. </div>
<div>
आणि मग जाणवलं की हे खुणेचे दगड जुन्या पांथस्थांना रस्ता बरोबर असल्याची खात्री देतात, नवीन पांथस्थांना खाणाखुणा देतात आणि परतीच्या वाटसरूंनाही दिग्दर्शन करतात. हे दगड म्हणजे कुणाच्यातरी अनुभवांचे संचित आहेत. कुणाच्या तरी वाटेचा, ती हरवण्याचा, पुन्हा सापडण्याचा आणि इतर कुणी हरवू नये या इच्छेचा वस्तुरूप इतिहास आहेत. मग वाटलं मी जे लिहितो तेही असेच दगड आहेत. मी परतीच्या प्रवासाला निघालो तर मला घराकडे नीट जातो आहे हे सांगणारे. दुसरा कुणी या वाटेने जात असेल तर त्यालाही दिग्दर्शन करणारे. अर्थात त्याला त्यांचं महत्व पटलं तरंच ठीक. नाहीतर दगडांची रास पहिल्यांदा पाहून माझ्या मनात जसे नकारात्मक विचार आले होते तसेच त्याच्याही मनात आले तर त्यालाही किमान एकदा तरी जंगलात वाट चुकण्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि मग कदाचित तोही सैरभैर होईल. मग त्याला दगडांचे प्रयोजन कळेल. आणि मग कदाचित तोही माझ्यासारखाच कृतज्ञ होऊन एखादा दगड त्या राशीवर चढवेल.</div>
</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-11155090999976554792019-12-19T08:28:00.000+05:302019-12-19T08:42:46.234+05:30व्यर्थ न हो बलिदान (भाग ३)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html" target="_blank">भाग १</a> | <a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_19.html" target="_blank">भाग २</a> ।<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_80.html" target="_blank"> भाग ३</a></div>
<br />
जेव्हा श्री सुब्रमण्यम यांनी एवरग्रीनिंग या संकल्पनेचा उल्लेख केला तेव्हा बँका असं का करतात याबद्दलची दोन स्पष्टीकरणं मला आठवली. बँकांनी असं करण्यामागे दोन प्रेरणा काम करत असतात असं मानलं जातं.<br />
<br />
१) <b>Containtment Scenario</b> (कंटेन्टमेंट सिनारिओ) किंवा नुकसान रोखण्याची शक्यता. या कल्पनेप्रमाणे बँका अर्थव्यवस्थेकडे पाहतात. जर अर्थव्यवस्था जोमात असेल तर आपण सध्याचे मृत कर्ज पुन्हा जीवनदान देऊन सदाबहार केले तर आपल्याला ते अनुत्पादक घोषित करावे लागणार नाही परिणामी आपला ताळेबंद आणि नफातोटा पत्रक अनाकर्षक दिसणार नाही. अर्थव्यवस्था जोमात असल्याने आपण दिलेली इतर कर्ज आपल्याला व्यवस्थित उत्पन्न देतील. यातून अनुत्पादक कर्जांचा प्रश्न जरी सुटला नाही तरी त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानाचा फटका इतर चांगल्या कर्जाच्या उत्पन्नात दडून जाईल.<br />
<br />
ज्याप्रमाणे शाळेत इन्स्पेक्शनला साहेब येणार असतील तर जुन्या काळचे शिक्षक जरा कमी हुशार मुलांना इतर हुशार मुलांच्या मधे दडवून ठेवत आणि या किंचित ढ मुलांना पाढे म्हणता आले नाहीत तरी ते सगळ्यांबरोबर निदान तोंड हलवत रहातील याची खात्री करून घेत त्यातलाच हा प्रकार. ढ मुलाचे पाढे पाठ न होण्याची समस्या सुटत नाही पण ते इन्स्पेक्शन साहेबांच्या लक्षात येत नाही इतकाच काय तो फरक.<br />
<br />
२) <b>Phoenix Scenario</b> (फिनिक्स सिनारिओ) किंवा राखेतून भरारी घेण्याची आशा. या कल्पनेप्रमाणे बँकांना अनुत्पादक झालेल्या कर्जाच्या कर्जदाराबद्दल आपुलकी आणि त्याच्या व्यवसायातील अडचणींबद्दल सहानुभूती असते. त्याला जर पुन्हा मदत केली तर तो अडचणींतून बाहेर येऊ शकेल आणि त्याचे पुनरुज्जीवित केलेले कर्ज फेडू शकेल अशी बँकेला खात्री वाटते म्हणून बँका त्याचे कर्ज अनुत्पादित घोषित ना करता त्याला पुनरुज्जीवित करतात.<br />
<br />
हा फिनिक्स सिनॅरिओ आठवला आणि मग लगोलग युवाल नोहा हरारींच्या होमो डेऊस या पुस्तकातील काही संदर्भ आठवले.<br />
<br />
माणसाचा मेंदू कसा काम करतो? आपण निर्णय कसे घेतो? आपण अनुभवांतून खरंच शहाणे होतो का? याबद्दल बोलताना हरारी अनेक शास्त्रज्ञांच्या कामाचा दाखला देत सांगतात की <b>आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. एक अनुभव घेणारा आणि दुसरा त्या अनुभवांतून एक सुसंबद्ध गोष्ट रचणारा.</b><br />
<div>
<br /></div>
<div>
<b>अनुभव घेणारा भाग हा कायम वर्तमानात जगत असतो. या क्षणाचा अनुभव घेत असताना त्याला त्याआधीच्या क्षणात घेतलेल्या अनुभवाची स्मृती नसते</b> आणि दोन लगतच्या अनुभवांतील संबंध जोडून त्याचा सलग अनुभव घेण्यास तो असमर्थ असतो. म्हणजे आपल्या मेंदूत केवळ हाच एक भाग असता तर आपण कधीच अनुभवांतून शहाणे होऊ शकलो नसतो.<br />
<br />
पण सुदैवाने आपल्या मेंदूत दुसरा भाग असतो त्याला अनुभव घेता येत नसले तरी तो त्या अनुभवांतून एक आपल्याला एक गोष्ट तयार करून सांगतो. त्या गोष्टीच्या आधारे आपण तशाच प्रकारच्या नवीन अनुभवात कसं वागायचं ते ठरवतो. <b>हा गोष्ट तयार करणारा भाग आपल्याला प्रत्येक घटनेचा अर्थ सांगत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या अनुभवांची साखळी तयार करून त्यातून तो एक सुसंगत गोष्ट तयार करून आपल्याला एखादी गोष्ट का करावी किंवा का करू नये यासाठी कारण किंवा हेतू तयार करून देत असतो.</b><br />
<br />
पण या गोष्ट तयार करणाऱ्या भागाचीही एक मर्यादा असते. <b>त्याला सगळे अनुभव लक्षात ठेवून त्याआधारे गोष्ट तयार करता येत नाही. त्यामुळे तो केवळ अनुभवाची सुरवात आणि त्याचा शेवट या दोन बिंदूंची सरासरी काढून आपली गोष्ट पूर्ण करतो.</b> या सरासरी काढण्यामुळे एक गडबड होते. ज्या घटनांची सुरवात आणि शेवट दोन्ही आल्हाददायक असतात किंवा सुरवात आणि शेवट दोन्ही कमी त्रासदायक असतात त्या घटना कितीही त्रासदायक असल्या तरी आपण त्यांना पुन्हा पुन्हा सामोरे जाऊ शकतो. याउलट ज्यांची सुरवात आणि शेवट त्रासदायक असतात त्यांचा बाकीचा अनुभव तितका त्रासदायक नसला तरी त्या घटना आपल्याला अप्रिय होतात. <b>म्हणजे वास्तविक घटना आणि त्यांच्याबद्दल आपल्या मेंदूने तयार केलेली आणि आपल्याला सत्य वाटणारी काल्पनिक गोष्ट यांत बरीच मोठी तफावत असू शकते. </b><br />
<br />
मानवी मेंदूच्या या गडबडीला निसर्गानेही वापरून घेतलेले आहे. त्यामुळे मरणप्राय अशा वेदना होऊनही नंतरच्या दोन तीन महिन्यात शरीरात तयार होणारे सुखकारक हार्मोन्स स्त्रियांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार करतात. प्रसूतीनंतर शरीरात तयार होणाऱ्या या हार्मोन्समुळे त्या वेदनादायी घटनेची सरासरी तीव्रता अतिशय कमी होते आणि बऱ्याच स्त्रियांना पुन्हा आई बनावसं वाटतं. लहान मुलांचे डॉक्टर आपल्याजवळ गोळ्या चॉकलेट्स ठेवतात आणि इंजेक्शन दिल्यावर रडणाऱ्या बाळांना चॉकलेट देऊन शांत करतात. पाच वर्षात आपल्या कारभाराला कावलेल्या जनतेने निवडणुकीत आपल्यालाच पुन्हा निवडून द्यावे म्हणून नेते मंडळी पाचव्या वर्षात करात सवलती, पगारात वाढ, किंवा नवनवीन योजनांची घोषणा करतात. आपण पब्लिक मेमरी छोटी असते असा निष्कर्ष काढून मोकळे होतो पण ते तसं नसून गोष्टी तयार करून आपल्याला पुढचे निर्णय घ्यायला मदत करणाऱ्या मेंदूच्या भागाला डॉक्टर आणि नेते मंडळींनी गुंगवून टाकलेल असतं. <b>वाईट अनुभवांच्या शेवटी येणार सुखद अनुभव आपल्या मनात तयार होणाऱ्या गोष्टीतील अप्रियतेची सरासरी कमी करून टाकतो आणि आपण पुन्हा एकदा अप्रिय घटनेचं स्वरूप समजून न घेता तिला सामोरे जायला हसतमुखाने तयार होतो. आणि "ज्याचा शेवट गोड त्याचं सारंच गोड" किंवा "अंत भला तो सब भला" हे वाक्प्रचार आपोआप शास्त्रोक्त ठरतात.</b><br />
<br />
या गोष्ट तयार करणाऱ्या मेंदूच्या भागाबद्दल बोलताना हरारी पुढे <b><a href="https://en.wikipedia.org/wiki/Jorge_Luis_Borges" target="_blank">जॉर्ज बोर्गेस</a></b> या अर्जेंटीनीयन लेखकाच्या एका <a href="https://biblioklept.org/2019/06/13/a-problem-a-three-paragraph-story-by-jorge-luis-borges/" target="_blank">छोट्या गोष्टीचा</a> उल्लेख करतात. </div>
<div>
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-KlEk5uUlYAQ/XfrjiBGUjyI/AAAAAAAABe8/1kKz2XYp6qcxPGJbLkfnsyD1pLxBp2LewCLcBGAsYHQ/s1600/download.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="213" data-original-width="237" src="https://1.bp.blogspot.com/-KlEk5uUlYAQ/XfrjiBGUjyI/AAAAAAAABe8/1kKz2XYp6qcxPGJbLkfnsyD1pLxBp2LewCLcBGAsYHQ/s1600/download.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Jorge Borges<br />
<a href="https://theculturetrip.com/south-america/argentina/articles/the-jorge-luis-borges-walking-tour-of-buenos-aires/" target="_blank">Image Credit : Internet </a></td></tr>
</tbody></table>
<div>
ही गोष्ट मिगेल सर्वांटीसच्या जगप्रसिद्ध डॉन क्विक्झोट (डॉन किहोते) च्या गोष्टीवर बेतलेली आहे.</div>
<div>
<br />
डॉनला त्याच्या मेंदूच्या गोष्टी सांगणाऱ्या भागाने पटवून दिलेलं असतं की तो एक मध्ययुगीन शूर सरदार आहे. आणि राजकन्येला वाचवण्यासाठी तो राक्षसांशी युद्ध करतो आहे. पण डॉनच्या मेंदूने त्याला दाखवलेली राजकन्या प्रत्यक्षात शेतावर काम करणारी एक साधारण मोलकरीण असते आणि डॉनच्या मेंदूंने जे राक्षस आहेत हे त्याला पटवून दिलेलं असतं त्या प्रत्यक्षात पवनचक्क्या असतात.</div>
<div>
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-j9JBKTp-hPc/XfrmtTgoxRI/AAAAAAAABfk/fRvpmu6w_7UPcmLYEZsdA331qXZ23aexgCLcBGAsYHQ/s1600/Don-Quixote-300x210.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="210" data-original-width="300" src="https://1.bp.blogspot.com/-j9JBKTp-hPc/XfrmtTgoxRI/AAAAAAAABfk/fRvpmu6w_7UPcmLYEZsdA331qXZ23aexgCLcBGAsYHQ/s1600/Don-Quixote-300x210.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: 12.8px;">पवनचक्क्यांना राक्षस समजून लढणारा डॉन</span><br />
<span style="font-size: 12.8px;"><a href="https://www.theolivepress.es/spain-news/2016/11/01/spanish-literary-figure-don-quixote-was-inspired-by-windmill-attacking-noblemans-son/" target="_blank">Image Credit: Internet</a></span></td></tr>
</tbody></table>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div>
बोर्गेस यांनी या कथेला पुढे नेत असा मुद्दा मांडला आहे की समजा पवनचक्क्यांशी लढून स्वतःचं हसं उडवून घेणाऱ्या डॉनच्या हातून खरोखरंच कुणाचा खून झाला तर तो काय करेल? आपल्या हातून एका हाडामांसाच्या जिवंत व्यक्तीचा खून झाला आहे हे कळल्यावर डॉन कसा वागेल त्याबाबत बोर्गेसनी चार शक्यता वर्तवलेल्या आहेत त्यातल्या तीनच आपल्यासाठी महत्वाच्या आहेत म्हणून तितक्याच इथे लिहितो.<br />
<br />
१) पहिल्या शक्यतेनुसार डॉनला कदाचित या घटनेचं गांभीर्य कळणार नाही. त्याच्या गोष्टी सांगणाऱ्या मेंदूने त्याच्यावर इतका मोठा पगडा बसवलेला असू शकतो की त्याला आपण काय केलं आहे हेच कळणार नाही. हे अनेकांच्या बाबतीत होतं. आपण यांना मठ्ठ किंवा मानसिक रुग्ण मानतो. <br />
<br />
२) दुसऱ्या शक्यतेनुसार "युद्धस्य कथा रम्या" याला भुलून सैन्यात दाखल झालेला सैनिक ज्याप्रमाणे प्रत्यक्ष रणधुमाळीनंतर बधीर होऊन पुन्हा युद्धभूमीवर जायला टाळाटाळ करू शकतो त्याप्रमाणे आपल्या गोष्टी सांगणाऱ्या मेंदूने आपल्या हातून हे काय भयंकर कृत्य करवून घेतलं आहे, अशा विचाराने डॉन आपल्या कोषातून बाहेर पडून पूर्णपणे वेगळा माणूस बनू शकतो. ही शक्यता कितीही आकर्षक वाटली तरी फार थोड्या जणांसाठी ही प्रत्यक्षात येऊ शकते. वाल्याचा वाल्मिकी व्हायला नारदमुनी भेटावा लागतो आणि तरीही ज्या ज्या लोकांना नारदमुनी भेटले त्या सर्वांत वाल्मिकी ऋषी होण्याइतपत परिवर्तन घडून आले नाही. वाल्याचा वाल्मिकी ही आपल्या पुराणातील एकमेव गोष्ट आहे. <br />
<br />
३) याउलट तिसरी आणि सर्वात जास्त गुंतागुंतीची शक्यता म्हणजे आपल्या कृत्याची त्याला जाणीव होईल. पण जे केलं आहे ते अयोग्य नसून तेच बरोबर आहे हे स्वतःला समजावण्याची त्याची धडपड सुरु होईल. आणि इथे त्याचा गोष्टी सांगणारा मेंदूचा भाग मदतीला येईल. तो त्याला एक नवीन गोष्ट तयार करून सांगेल ज्यामधे त्या जिवंत माणसाला मारणे कसे आवश्यक होते हे डॉन स्वतःला पटवू शकेल.<br />
<br />
कदाचित ही तिसरी शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी अशक्य वाटू शकते. पण तिन्हीपैकी तिसरी शक्यताच बहुसंख्य माणसांसाठी प्रत्यक्षात येते. आपण केलेल्या घृणास्पद कृत्याला न्याय्य ठरवण्याची आपली इच्छा इतकी तीव्र असते की आपण त्यासाठी एक नवीन गोष्ट तयार करतो. आणि मग आपले कृत्य योग्य हे स्वतःला पटवण्यासाठी आपण मग तेच कृत्य पुन्हा पुन्हा करू लागतो.<br />
<br />
म्हणून अमेरिका आधी व्हिएतनाम युद्धात आणि मग अफगाणिस्तान युद्धात अडकते. साम्यवादाचा पाडाव करतो आहोत ही गोष्ट अमेरिकन समाजमानाने मान्य केली की मग हजारो सैनिक युद्धभूमीवर पाठवले जातात. आणि पहिल्या सैनिकाचा बळी गेला की सुरु होतो उद्घोष “व्यर्थ न हो बलिदान” चा. मग पहिल्या सैनिकाचे बलिदान व्यर्थ होऊ नये अनेक सैनिकांचे बलिदान द्यायला समाज तयार होतो. सैनिकही तयार होतात. युद्धातून अपंगावस्थेत परत आलेला सैनिक आणि त्याचे नातेवाईकही आपण जे केलं ते बरोबर होतं असंच स्वतःला सांगत रहातात. व्हिएतनामच्या भूमीवर आपले सैनिक पाठवून आपण मूर्खपणा केला या वास्तविक सत्यापेक्षा आपण साम्यवादाच्या राक्षसाशी लढताना अपंग झालो हे काल्पनिक सत्य त्या सगळ्यांना सुखावह वाटते. आणि लढाई जिंकली असेल तर विजयोन्माद देते; हरली असेल तर पुन्हा लढायला कारण देते. <br />
<br />
जसा डॉन तसे बँकर्स. आपल्या काल्पनिक सत्यात जगाला फसवून अनुत्पादक कर्जांना पुनरुज्जीवित करणारे. उद्या कदाचित बाजार इतका उसळेल की बाकीच्या कर्जांतून मिळणाऱ्या उत्पन्नात ही अनुत्पादक कर्जे खपून जातील. किंवा मग कुणास ठाऊक? कदाचित आजचे अनुत्पदक कर्ज उद्या रसरशीत व्यवसाय म्हणून उभे राहील आणि सगळी रक्कम सव्याज परतफेड करेल!<br />
<br />
पण वास्तवातला बाजार कायम आपल्या कल्पनेतल्या बाजाराप्रमाणे चालायला बांधील नसतो. तेच आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे आपण एका आर्थिक अरिष्टाच्या खाईसमोर उभे आहोत. आणि हे आपल्याला अर्थव्यवस्थेचे सगळे आकडे सांगत आहेत. उच्चविद्याविभूषित अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. अनेक कंपन्यातील कामगार कपात सांगत आहे. कित्येक ठिकाणी रखडणारे किंवा न वाढणारे पगार सांगत आहेत. <br />
<br />
असं सगळं असताना जेव्हा मी समाजमाध्यमांवर नजर टाकतो तेव्हा मी अचंबित होतो. अर्थव्यवस्थेबाबत सरकार कुठली धोरणात्मक पावले टाकत आहे याबद्दल काहीच चिंता न करता इथे अनेक लोक ज्या मुद्द्यांवर बोलत आहेत ते पाहून पुन्हा एकदा 'व्यर्थ न हो बलिदान'ने आपली भूल या देशातल्या सुजाण आणि सुशिक्षित लोकांवरही टाकायला सुरवात केली की काय? असं वाटू लागतं. <br />
<br />
ज्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या खानपान पद्धती आहेत, वस्त्रप्रावरणांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, जिथले नववर्ष सुरु होण्याच्या तारखादेखील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या आहेत आणि ज्या देशात सामील होताना अनेक प्रदेशांनी आपापल्या परंपरा नष्ट होऊ न देण्याच्या बोलीवर सामीलनाम्यावर सही केली आहे; त्या देशावर आर्थिक मंदीचं संकट घोंघावत असताना सुशिक्षितांच्या तोंडचे विषय मात्र आर्थिक सोडून बाकी सर्व बाबींवर आहेत, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. <br />
<br />
आपल्या समाजाला काय हवं आहे तेच आपल्याला माहिती नाही आहे याबद्दल माझी खात्री पटलेली आहे. कुठलीही तातडीची आवश्यकता नसताना केवळ जाहीरनाम्यात लिहिलं होतं म्हणून आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींबाबत कायदे संमत करून घेणं खरोखर आवश्यक होतं का? या कायद्यातील तरतुदींमुळे होऊ घातलेल्या प्रचंड गोंधळाला आणि खर्चाला ऐरणीवर घेत विरोध करण्याऐवजी इतर फुटकळ बाबींवर विरोध करणे खरोखर आवश्यक होतं का? ईशान्येच्या राज्यांना वेगळा न्याय लावत हा कायदा संमत करणं आणि त्याच वेळी ‘काश्मीरला वेगळा दर्जा का?’, असा प्रश्न विचारणं यात काही विसंगती आहे, असं कुणाला वाटत नाही का? आसामच्या लोकांनी कायद्याविरोधी निदर्शन करणं चूक आहे पण अंदमानच्या बेटांवरील ख्रिश्चन मिशनऱ्याला मारून टाकणाऱ्या आणि आपल्या भूमीवर परदेशी घुसखोरच काय पण स्वदेशी लोकांनाही पाय ठेवू न देणाऱ्या हिंसक आदिवासी जमाती योग्य आहेत, या दोन वाक्यात काही विसंगती आहे, असं कुणाला वाटत नाही का?<br />
<br />
<b>राष्ट्रातून देश उभा राहू शकतो पण विविध परंपरांनी नटलेल्या देशातून एक राष्ट्र उभे करणे म्हणजे अनेकांचा आवाज दडपणे हे साधं सत्य पटवून घ्यायला खरंच इतकं कठीण आहे का?</b> की कुणाच्या तरी कल्पनेतील कुठल्यातरी प्राचीन राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आपण जिवंत माणसांचे, त्यांच्या परंपरांचे, त्यांच्या स्वप्नांचे, त्यांच्या आर्थिक विकासाचे आणि जरूर पडेल तेव्हा त्यांच्या मुलाबाळांचे बळी द्यायला तयार झालो आहोत? आपण जरी आपल्या कल्पनेतील सत्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या स्वप्नाला पुनरुज्जीवित करत असलो तरी त्याप्रमाणे प्रकट व्हायची सक्ती वास्तविक सत्यावर नाही. आपण कदाचित आपल्या भूतकाळातील शत्रूंवर विजय मिळवत असू पण भविष्यातील शत्रू आपण शिकून घेतलेल्या सर्व तंत्रांपेक्षा वरचढ असेल. आणि आपण त्याला तोंड द्यायला तयार होण्याऐवजी, वास्तविक देशाला सोडून काल्पनिक राष्ट्रासाठी व्यर्थ न हो बलिदानचा घोष करत बसलो, तर आपल्यात आणि एवरग्रीनिंग करून संपूर्ण समाजाला फसवणाऱ्या बॅंकर्समध्ये काहीच फरक नसेल.<br />
<br />
समाप्त<br />
<br />
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html" target="_blank">भाग १</a> | <a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_19.html" target="_blank">भाग २</a> ।<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_80.html" target="_blank"> भाग ३</a></div>
</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-77814202605402101612019-12-19T07:56:00.003+05:302019-12-19T08:42:14.817+05:30व्यर्थ न हो बलिदान (भाग २)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html" target="_blank">भाग १</a> | <a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_19.html" target="_blank">भाग २</a> ।<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_80.html" target="_blank"> भाग ३</a></div>
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-MU7KwXyu2Z0/XfroE5fIMnI/AAAAAAAABgA/HoWKMkVL8wczyYRQnmBL7HczMpmA5qntQCLcBGAsYHQ/s1600/download%2B%25282%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="299" src="https://1.bp.blogspot.com/-MU7KwXyu2Z0/XfroE5fIMnI/AAAAAAAABgA/HoWKMkVL8wczyYRQnmBL7HczMpmA5qntQCLcBGAsYHQ/s1600/download%2B%25282%2529.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">अरविंद सुब्रमण्यम<br />
<a href="https://www.fortuneindia.com/opinion/the-importance-of-being-arvind-subramanian/102035" target="_blank">Image Credit : Internet</a></td></tr>
</tbody></table>
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या कारणांबद्दल आपले निष्कर्ष मांडून झाल्यावर श्री. सुब्रमण्यम पुढे करायच्या उपाययोजनांकडे वळतात. त्यासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे समजण्यासाठी अर्थशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना समजणे आवश्यक आहे.<br />
<br />
जीडीपी किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत. त्यातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे Expenditure Method (एक्सपेंडिचर मेथड) किंवा खर्चाधारित पद्धत. या पद्धतीप्रमाणे सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास देशाचा जीडीपी म्हणजे C+G+I+(X-M). किंवा Consumption + Government Expenditure + Investment + (Export - Import). सोप्या शब्दात सांगायचं तर जीडीपी म्हणजे देशातील नागरिकांनी वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी केलेला खर्च (+) सरकारी खर्च (+) देशात झालेली गुंतवणूक (+) देशाची निर्यात (-) देशाने केलेली आयात. <br />
<br />
म्हणजे <b>जर</b> <b>देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर उपभोगावरचा खर्च किंवा सरकारी खर्च किंवा गुंतवणूक किंवा निर्यात यापैकी कुठलीही एक गोष्ट किंवा सर्व गोष्टी वाढवल्या पाहिजेत किंवा / आणि आयात कमी केली पाहिजे.</b> <br />
<br />
हा मुद्दा लक्षात घेऊन आपण श्री सुब्रमण्यम काय म्हणतात त्याकडे वळूया. <br />
<br />
<b>अनेक लोकांना वाटते की उपभोगावरचा खर्च वाढवणे हे जीडीपी वाढवण्याचे एक कारण आणि त्यामुळे जीडीपी वाढणे हा परिणाम आहे. परंतु श्री. सुब्रमण्यम सांगतात की आपण कारण परिणाम यांची साखळी उलटी बघत आहोत. सूत्ररूपाने संकल्पना मांडल्याने हा गोंधळ होत असावा. त्यांच्या मते उपभोगावरचा खर्च वाढल्याने जीडीपी वाढत नसून जीडीपी वाढल्याने उपभोगावरचा खर्च वाढत असतो. </b><br />
<br />
<b>जीडीपी वाढण्याची कारणे कोणती? या प्रश्नाला उत्तर देताना ते सांगतात "गुंतवणूक आणि निर्यात हीच खरी जीडीपी वाढवण्याची दोन इंजिन्स आहेत.</b> यापूर्वी भारताने अनुभवलेली प्रगती हीदेखील याच दोन इंजिनांवर आधारलेली होती. आपण उत्पादन क्षेत्रात मुसंडी मारण्याऐवजी सेवा क्षेत्रात जोरदार मुसंडी मारल्याने कदाचित आपल्याला हे लक्षात येत नसेल पण १९९१ पासून आपण अनुभवलेली प्रगती ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील आपल्या निर्यातीमुळे आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ भारतात वाहता राहिला यामुळे झालेली होती. या प्रगतीचा परिणाम म्हणजे अनेक कुटुंबांचे उत्पन्न वाढले आणि अंतिमतः देशातील नागरिकांकडून उपभोगांवरचा खर्च वाढला. त्यामुळे आपण आता उपभोगांवरचा खर्च वाढवण्याकडे लक्ष देण्याऐवजी गुंतवणूक आणि निर्यात या गोष्टी कशा वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे. <br />
<br />
आपली निर्यात तेव्हाच वाढते जेव्हा आपल्या मालासाठी किंवा सेवांसाठी अन्य देशात ग्राहक उपलब्ध असतात आणि त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजार इतका मंदावला आहे की निर्यातकेंद्री धोरण आखूनही आपल्याला त्यात मोठे यश मिळेल असं वाटत नाही. मग राहता राहिला मार्ग गुंतवणुकीचा. त्यातही परदेशी गुंतवणूक येण्याचे आपले मार्ग आता फार प्रशस्त राहिलेले नाहीत. असे का झाले असावे याबद्दल बोलण्याचे श्री सुब्रमण्यम यांनी टाळले असले तरी माझ्या मते आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवरील अस्थिर राजकीय आणि सामाजिक वातावरण यासाठी जबाबदार असावं. <br />
<br />
<b>आता जर उपभोगांवरचा खर्च हे जीडीपी वाढण्याचे कारणंच नसेल आणि गुंतवणूक व निर्यात हे दोन्ही राजमार्ग आता काट्याकुटयांतून जात असतील तर आपण यातून बाहेर पडणार कसे? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की आपण परिस्थितीचे सुयोग्य आकलन करून आपल्या अपेक्षांवर लगाम ठेवला पाहिजे. दोन अंकी वाढीचा दरंच काय पण ८% वाढीचा दर हे अशक्यप्राय स्वप्न आहे हे आपण स्वीकारले पाहिजे. </b><br />
<br />
वेगळ्या भाषेत सांगायचं तर भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था तोंडापेक्षा मोठा घास घेतल्यासारखी झाली आहे. घास टाकणे शक्य नसल्याने गुदमरायला होणार आहेच. यावर एकमेव उपाय म्हणजे आता तोंडातल्या घासाचे हळूहळू तुकडे करून ते गिळणे आणि तोपर्यंत नवीन घास न घेणे, हाच आहे. <br />
<br />
अर्थात हे काही फार आकर्षक भविष्य नाही. त्यामुळे लोकानुनयी निर्णय करण्याकडे सरकारचा कल झुकू शकतो. ते टाळण्यासाठी श्री. सुब्रमण्यम सरकारला सल्ला देतात की, <br />
<br />
१) वैयक्तिक उत्पन्न कर कमी करु नयेत(याचे लाभार्थी फार थोडे असतील आणि या निर्णयामुळे उपभोगावरचा खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. त्याऐवजी उत्पन्न कर तितकाच ठेवून गरिबांना डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर करुन समाजाच्या पायथ्याशी असलेल्या अनेकांची क्रयशक्ती सरकारने वाढवावी) <br />
<br />
२) जीएसटीचे दर (विशेषतः न्यूनतम दर) वाढवू नयेत (याने होणाऱ्या भाववाढीमुळे बहुसंख्य लोकांची खर्च करण्याची तयारी आणि ताकद दोन्ही कमी होतील) <br />
<br />
३) व्याजदर कमी करत रहाण्याचा फायदा होणार नाही, कारण बॅका आता जोखीम घ्यायला घाबरत असल्याने रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या व्याजदरकपातीचा फायदा गिऱ्हाईकांपर्यंत पोचणार नाही. <br />
<br />
४) इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड (IBC) मधे अधिक लवचिकता आणावी. वीजनिर्मिती आणि रिअल इस्टेट सेक्टर हे पुढचे खड्डे आहेत. त्यांचा धक्का कमी बसावा अशा तर्हेने IBC मधे लवचिकता आणावी. सगळा भार न्यायालयांवर न टाकता सरकारने यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत. <br />
<br />
५) आपली अर्थव्यवस्था अडचणीत आहे हे सरकारने नाकारु नये. रघुराम राजन यांनी बॅंकांवर उगारलेला पारदर्शकतेचा बडगा आता NBFC क्षेत्रापर्यंत पोचायला हवा. त्यांच्या अॅसेट्सच्या क्वालिटीचा लेखाजोखा घ्यायला हवा. बॅंका कुणाला कर्जे देतात, किती देतात, त्यांची वसुली कशी होते, न झाल्यास ते लपवले जाते की त्याची नोंद होते याबद्दलच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि तेच नियम NBFC क्षेत्रातही लागू केले पाहिजेत. <br />
<br />
६) बाजारावरील नियंत्रकांच्या (अॉडिटर्स, आरबीय, सेबी, कंपनी कायदा सल्लागार इत्यादी) दर्जाकडे लक्ष द्यावे. <br />
<br />
७) जोपर्यंत बॅंकांच्या व्यवहारात दृष्य सुधारणा दिसत नाहीत तोपर्यंत बॅंकाना भांडवली मदत करणं थांबवावं. <br />
<br />
८) शेती, कामगार कायदे, जमीनधारणा कायदे यांत सुधारणा करावी.<br />
<div>
<br /></div>
<div>
९) अर्थव्यवस्थेच्या डेटाशी खेळणं सरकारने थांबवावं.<br />
<br />
आपल्या अर्थव्यवस्थेपुढील अडचणी चक्राकार आवर्तने आणि रचनात्मक त्रुटी या दोन्ही स्वरुपाच्या असल्या तरी सरकारने व्याजदरकपात सारखे तात्पुरते निर्णय घेऊ नयेत असा सल्ला ते देतात. व्यवस्थेत विश्वासाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. व्यवस्था जरी आयसीयूमधे असली तरी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा फायदा नाही असं त्यांचं मत आहे. <br />
<br />
श्री सुब्रमण्यम यांनी सांगितलेले उपाय सरकारने जसेच्या तसे अमलात आणले तर घरांच्या किमती वाढणार नाहीत, ठेवींवरचे बँकांचे व्याजदर कमी होतील आणि कर्जांवरचे व्याजदर वाढतील, प्राप्तीकर कमी होणार नाही. <br />
<br />
त्यांच्या म्हणण्याचा रिअल इस्टेट क्षेत्रासंबंधी मला लागलेला अर्थ असा की रिअल इस्टेटमधे प्राईस करेक्शन झालं (किंमती गडगडल्या) तर बाजार कोसळेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अतिघातक ठरेल. त्यामुळे प्राईस करेक्शन ऐवजी टाईम करेक्शन (दीर्घकाळपर्यंत किंमती स्थिर रहाणे) करण्याकडे या क्षेत्राचा कल असेल. <br />
<br />
याचा सर्वसामान्य माणसासाठी अर्थ असा होतो की <br />
१) धंदा व्यवसाय करत असाल तर नवीन कर्जे काढताना अतिरिक्त जोखीम घेऊ नका. <br />
२) नोकरी करत असाल तर थोड्या फरकासाठी स्थायी नोकरी सोडू नका. <br />
३) नोकरी शोधत असाल तर चांगला पगार ही एकमेव कसोटी ठेवू नका. <br />
४) बॅंकेत ठेवी ठेवताना बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या. घसघशीत व्याजाच्या आमिषाला बळी पडू नका. <br />
५) सर्व रक्कम एकाच बॅंकेत ठेवणं टाळा. <br />
६) भिशी किंवा तत्सम योजनेत उतरताना अनावश्यक जोखीम घेऊ नका. <br />
७) नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याकडे लक्ष द्या. <br />
८) वायफळ खर्च टाळा. आवडीपेक्षा उपयुक्ततेकडे आणि आवश्यकतेकडे लक्ष द्या. <br />
९) शेअर बाजारात उतरत असाल तर स्वतः अभ्यास करून कंपनी निवडा. टिप्सवर अंधविश्वास ठेवू नका. <br />
१०) मुलांना स्वावलंबनाची सवय लावा. <br />
<br />
(वरील दहा मुद्दे माझे निष्कर्ष आहेत. श्री. सुब्रमण्यम यांनी मांडलेले नाहीत) <br />
<br />
इथपर्यंत तुम्ही वाचत आला असाल तर इतक्या रुक्ष विषयातही रस घेऊन माझ्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद. तरिही एक प्रश्न रहातोच की या लेखमालेचं नाव मी असं का ठेवलं? त्याचं उत्तर आहे युआल नोहा हरारीचं <a href="https://www.flipkart.com/homo-deus-brief-history-tomorrow-marathi/p/itmfayuhdfbrtpjv?pid=9788193803622&lid=LSTBOK9788193803622OKZH5F&marketplace=FLIPKART&cmpid=content_book_8965229628_gmc_pla&tgi=sem,1,G,11214002,u,,,395332127672,,,,c,,,,,,,&ef_id=Cj0KCQiAuefvBRDXARIsAFEOQ9F1QrH-UhaCaBYA_oR9acov0SnWds6zMQ7DNOyhKafPxA4PbH9bhrsaAoQYEALw_wcB:G:s&s_kwcid=AL!739!3!395332127672!!!u!295092701166!&gclid=Cj0KCQiAuefvBRDXARIsAFEOQ9F1QrH-UhaCaBYA_oR9acov0SnWds6zMQ7DNOyhKafPxA4PbH9bhrsaAoQYEALw_wcB" target="_blank">होमो डेऊस </a>हे पुस्तक. त्या पुस्तकाने काय केलं ते पुढच्या भागात सांगतो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-Lf_-mIEX6Sk/Xfro8mOQkjI/AAAAAAAABgM/mUikSsmrCsQq3Z-FUaLXwMQzZdo63uBBACLcBGAsYHQ/s1600/images%2B%25281%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" src="https://1.bp.blogspot.com/-Lf_-mIEX6Sk/Xfro8mOQkjI/AAAAAAAABgM/mUikSsmrCsQq3Z-FUaLXwMQzZdo63uBBACLcBGAsYHQ/s1600/images%2B%25281%2529.jpg" /></a></div>
<br />
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html" target="_blank">भाग १</a> | <a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_19.html" target="_blank">भाग २</a> ।<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_80.html" target="_blank"> भाग ३</a></div>
<br /></div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-38333792839759770572019-12-17T09:44:00.002+05:302019-12-19T08:41:20.006+05:30व्यर्थ न हो बलिदान (भाग १)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html" target="_blank">भाग १</a> | <a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_19.html" target="_blank">भाग २</a> ।<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_80.html" target="_blank"> भाग ३</a></div>
<br />
सकाळी टेकडीवर चालायला गेलो होतो. अरविंद सुब्रमण्यम यांनी बँगलोर (बंगळुरू) इंटरनॅशल सेंटरच्या व्यासपीठावर दिलेलं भाषण डाउनलोड करून ठेवलेलं होतं: ते ऐकत होतो. भाषणाचं नाव होतं ग्रेट इंडियन स्लो डाऊन (भारतातील महान मंदी). भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. आणि हार्वर्ड विद्यापीठात संशोधन व अध्यापनाच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. सुब्रमण्यम आणि त्यांचे मित्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारत शाखेचे प्रमुख जॉश फेलमन यांनी केलेल्या संशोधनाचे सार या भाषणात मांडलेले आहे. <br />
<br />
जेव्हा अमेरिकन सरकार भारतावर व्यापारी निर्बंध घालत होते तेव्हा अमेरिकन सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारे सुब्रमण्यम जेव्हा भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करू लागले तेव्हा जनधन अकाउंट > आधार > मोबाईल क्रमांक यांची जोडणी करून सरकारी योजनांचे फायदे योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवावेत या योजनेचे ते शिल्पकार होते. विद्यमान सरकारबद्दल त्यांना ममत्व आहे आणि सरकारच्या उद्देशांबद्दल त्यांना खात्री आहे, असं मला त्यांच्या भाषणावरून आणि विशेषतः त्यानंतरच्या प्रश्नोत्तरावरून वाटलं.<br />
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen="" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/TNE26h9kYkw/0.jpg" frameborder="0" height="266" src="https://www.youtube.com/embed/TNE26h9kYkw?feature=player_embedded" width="320"></iframe></div>
<div>
<br />
<br />
काही अन्य अर्थ तज्ञांप्रमाणे 'सरकारने सगळे निर्णय केंद्रीभूत करून ठेवल्याने अर्थव्यवस्थेला धोरण लकवा झालेला आहे, नोटबंदी आणि जीएसटी राबवण्यामधील अव्यवस्था' ही कारणे भारताच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला कारणीभूत आहेत असं त्यांना वाटत नाही. याऐवजी संशोधनांती त्यांना जाणवलेले मुद्दे त्यांनी याप्रमाणे मांडले आहेत.<br />
<br />
१) कुणी मान्य करो अथवा न करो पण भारतीय अर्थव्यवस्था सध्या अतिशय मोठ्या संकटात आहे. आणि हे संकट त्यांच्या शब्दात unprecedented (न भूतो न भविष्यती) अशा प्रकारचे आहे. <br />
<br />
२) केवळ जीडीपीच्या आकड्यांकडे न बघता विविध क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न आणि कर्ज यांच्या आकड्यांची तुलना करता त्यांचे असे मत आहे की ही परिस्थिती १९९१ पेक्षा आणि २००२ पेक्षाही वेगळी आहे. १९९१ मध्ये आपली अर्थव्यवस्था अडकलेली होती पण जग मात्र वेगाने पुढे जात होते. २००२ च्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था अडकलेली होती पण आपली अर्थव्यवस्था ठणठणीत होती. सध्या मात्र आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही ठिकाणी अर्थव्यवस्था अडकलेल्या आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती अतिशय काळजी करण्यासारखी आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे तर अर्थव्यवस्था अति दक्षता विभागात ठेवावी लागेल. <br />
<br />
३) जर १९९१ मध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर केले होते आणि आणि २००२ च्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटातही आपण तग धरू शकलो इतकेच काय पण २००८ च्या अमेरिकन सब प्राईम क्रायसिसच्या वेळी जेव्हा जगभरातील विविध अर्थव्यवस्था डगमगू लागल्या तेव्हाही आपल्या अर्थव्यवस्थेचं तारू व्यवस्थित किनाऱ्याला लागलं तर मग आता एकाएकी असा कुठला खटका ओढला गेला आहे की ज्यामुळे सुव्यवस्थित अर्थव्यवस्थेत एकाएकी गतिरोध उत्पन्न झाला?<br />
<br />
४) स्वतःच उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात सध्याची समस्या एकाच वेळी सायक्लिकल आणि स्ट्रक्चरल (अर्थव्यवस्थेतील चक्रांमुळे आणि रचनात्मक अडचणींमुळे) आहे. आणि त्यांना दोघांना एकत्र आणून अर्थव्यवस्थेला खीळ घालणारा खटका म्हणजे ILFSची पडझड. <br />
<br />
५) ILFS म्हणजे Infrastructure Leasing & Financial Services उर्फ पायाभूत सुविधांना पतपुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या पडझडीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची घटना कशी काय होऊ शकते ते समजावताना श्री सुब्रमण्यम यांनी Twin Balance Sheet Problem (ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम) किंवा दोन ताळेबंदातील अडचणी आणि Evergreening of loans (एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स) किंवा सदाबहार लोन्स या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. <br />
<br />
६) ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे धनको आणि ऋणको दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा. व्यावसायिकाने केलेल्या स्वतःच्या व्यवसायाच्या भविष्य अंदाजाच्या आणि अर्थव्यवस्थेबद्दलच्या स्वतःच्या अंदाजाच्या आधारे बॅंका व्यवसायांना कर्जपुरवठा करतात. आता जर व्यावसायिकाच्या ताळेबंदातील तारण म्हणून दिलेल्या मिळकतींचे बाजारमूल्य घसरले (किंवा जास्त कर्ज मिळण्यासाठी जर ते खोटे वाढवून दाखवले असतील) आणि नंतर व्यावसायिकाला पुरेसा नफा झाला नाही तर तो कर्जाची परतफेड करत नाही. त्याच्या ताळेबंदात मूल्य वाढवून दाखवलेली पण प्रत्यक्षात कमी मूल्याची मालमत्ता दिसत रहाते आणि बॅंकेच्या ताळेबंदात त्याला दिलेले कर्ज बॅंकेची मालमत्ता म्हणून दिसत रहाते. कर्जाची आणि व्याजाची परतफेड होत नाही. पण बॅंका मात्र व्याज येणे आहे असं दाखवून नफा दाखवतात. प्रत्यक्षात ते कर्ज आता बुडीत खात्यात जमा झाल्यासारखे असते. पण फक्त ताळेबंद पाहणाऱ्याला मात्र सगळे व्यवस्थित दिसते. <br />
<br />
असं होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेने NPA नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स ताळेबंदात दाखवण्यासाठी आणि त्यावरील व्याज उत्पन्न म्हणून न दाखवण्यासाठी नियम केले आहेत. त्यातून वाचण्यासाठी बॅंका त्याच व्यावसायिकाला जुने कर्ज व्याजासहित फेडायला नवीन कर्ज देतात. आणि आपापले ताळेबंद नियमानुसार दिसतील याची काळजी घेतात. याला म्हणतात एव्हरग्रीनिंग लोन्स. कारण बाहेरून बघणाऱ्याला ताळेबंदातील कर्ज आता आतून सडलेली आहेत हे न कळता त्याला तो सदाबहार कर्जांचा ताळेबंद वाटतो. <br />
<br />
७) २००४ ते २०११ च्या तेजीमधे बॅंकांनी स्टील, पायाभूत सुविधा, टेलिकॉम, वीजनिर्मिती या क्षेत्रांना भारंभार कर्जे दिली. परंतू ती कर्जे फेडण्यासाठी आवश्यक तितका नफा या उद्योगांनी न मिळवल्याने पहिला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम सुरु झाला. बॅंकांनी एव्हरग्रीनिंग करु नये म्हणून रघुराम राजन यांनी नियमांचा बडगा उगारला. त्यामुळे बॅंकांनी आपापल्या ताळेबंदातील मृत कर्जे जाहीर करायला सुरुवात केली. ही होती ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची पहिली लाट. <br />
<br />
यावर उपाय म्हणून सरकारने बॅंकांना भांडवल पुरवले आणि इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड हा कायदा पास केला (दिवाळं काढण्याचा कायदा). त्याचा जास्तीत जास्त फायदा स्टील क्षेत्रातील उद्योगाला झाला. बाकीच्या क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कायदा तितका लवचिक नव्हता.<br />
<br />
तो तसा लवचिक करेपर्यंत सरकारने नोटबंदी केली.<br />
<br />
नोटाबंदीमुळे बॅंकांच्या खात्यांमधे प्रचंड प्रमाणात पैसा आला. आता बॅंकांनी उद्योगांना कर्जपुरवठा करण्याऐवजी नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कॉर्पोरेशन्सना (NBFC) कर्जे देण्यास सुरवात केली. म्हणजे बॅंकेसाठी हे कर्ज मालमत्ता झाले तर NBFC साठी देणी.<br />
<br />
मग NBFC नी आपल्याकडे आलेल्या या पैशातून बांधकाम क्षेत्राला कर्जपुरवठा करायला सुरुवात केली. म्हणजे आता ही नवीन कर्जे NBFC साठी अॅसेट्स झाली आणि रिअल इस्टेट सेक्टरसाठी देणी बनली. <br />
<br />
बांधकाम क्षेत्रात मागणीपेक्षा पुरवठा जास्त होता. पण त्यांनी जागांचे भाव उतरवण्यापेक्षा तसेच ठेवले आणि आपल्याकडील न विकल्या गेलेल्या जागांचा खर्च आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी ही नवीन कर्ज वापरली.<br />
<br />
त्यात ILFS (जी स्वतः एक NBFC आहे) च्या ताळेबंदातील गडबडीमुळे तिच्या व्यवहारांवर नियंत्रकांची नजर पडली. तिथला घोटाळा बघून भल्या भल्यांचे डोळे पांढरे झाले. आणि मग सर्व बॅंकांनी आपण ज्यांना कर्जे दिली त्या NBFC चे ताळेबंद आणि त्यांनी ज्यांना कर्जे दिलीत त्यांची आर्थिक स्थिती बघायला सुरुवात केली. ती अर्थातच चांगली नव्हती. कारण अनेक जागा विक्रीविना तशाच पडून होत्या. आता बॅंकांचं धाबं दणाणलं. आणि त्यांनी उद्योगांना कर्जपुरवठा करणं थांबवलं. आरबीआयने रेपो रेट कमी करुनही त्यांचा फायदा ऋणकोंना द्यायला बॅंका टाळाटाळ करु लागल्या. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं धडधडणारं इंजिन रुळावरुन उतरु लागलं. <br />
<br />
आता या अपघातात बॅंका आणि उद्योग यांच्या ताळेबंदातील न संपलेला जुना ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम तर होताच वरून NBFC आणि रिअल इस्टेट सेक्टर अशा दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा जमा होऊन तो फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम झाला आणि आपण महान भारतीय मंदीच्या गर्तेत शिरलो. <br />
<br />
ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची समस्या वाढून आता तिची सुनामी झाली आहे. आणि यातून नुकसान न होता बाहेर येणं कठीण आहे असं श्री. सुब्रमण्यम यांचं मत आहे.<br />
<br />
<div style="text-align: center;">
<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html" target="_blank">भाग १</a> | <a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_19.html" target="_blank">भाग २</a> ।<a href="https://www.anandmore.com/2019/12/blog-post_80.html" target="_blank"> भाग ३</a></div>
</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-76744867508037346972019-12-15T05:56:00.000+05:302019-12-17T09:40:08.616+05:30वारसा <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
ही पोस्ट महाभारत युध्दाचे मूळ कारण सांगणारी वगैरे नाही. खरंतर महाभारत युध्दाला कुठलेतरी एकमेव कारण असेल अशी माझी समजूत नाही. <br />
<br />
पण महाभारतकालीन समाजात पैतृक आणि मातुल घराण्याच्या संपत्तीच्या वारसाहक्काच्या व्यवस्थेचा पैलूही या युध्दाला असू शकतो अशी माझी धारणा आहे. त्या धारणेचा विस्तार म्हणजे ही पोस्ट आहे. <br />
<br />
दोन गोष्टी आहेत <br />
<br />
१) कुल कुणाचे? मातृकुलीन की पितृकुलीन. (मूल आईचे की बापाचे?)<br />
२) आणि सत्ता कुणाकडे? (पुरुषाकडे की स्त्रीकडे?)<br />
<br />
अनेकांच्या मताप्रमाणे महाभारतकालीन भारतात सत्ता पुरुषांच्या हातात गेली होती. स्त्री राज्य असलेले प्रदेश तुरळक होते. स्त्रीने माहेर सोडून सासरी जायची पद्धतही रुळली होती. पण विवाह ही सार्वत्रिक आणि सक्तीची बाब नव्हती. त्यामुळे विवाहबाह्य संबंध आणि विवाहपूर्व संबंध फार लक्षवेधी किंवा समाजविसंगत नव्हते. एकाच पुरुषाला अनेक स्त्रियांकडून मुले असणे किंवा एकाच स्त्रीला अनेक पुरुषांकडून मुले असणे याला समाजबाह्य वर्तन मानले जात नव्हते. पण त्यामुळे पहिला प्रश्न कळीचा झाला होता. की मुलाचे कुल कुठले? आईचे की बापाचे? कुणाच्या संपत्तीत मुलाला वाटा मिळणार, आईच्या की बापाच्या? <br />
<br />
हिमालयीन समाजात मातृकुलीन व्यवस्था होती तर गांधार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पठारी प्रदेशात पितृकुलीन व्यवस्था स्थिरावत चाललेली होती. <br />
<br />
शकुंतलेच्या पुत्राला (भरताला) राजा दुष्यंताने स्वीकारावे आणि आपले कुल द्यावे, आपल्या संपत्तीचा वारस म्हणून नेमावे अशी कण्वमुनींची आणि स्वतः शकुंतलेची इच्छा असते. इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाला हक्क मिळणे मान्य केले जाते. हस्तिनापूरमध्ये (उत्तर प्रदेशातल्या पठारी भागात) मुलावर पित्याचा हक्क आणि मुलाचा जन्मदात्या पित्याच्या संपत्तीवरचा हक्क प्रस्थापित होतो. <br />
<br />
गंगा हिमालयीन समाजातील मुलगी. ती लग्न करते हस्तिनापूरच्या शंतनूशी. गंगा शंतनूकडून मुलं माहेरी पाठविण्यास संमती मिळवते. म्हणजे ती स्वतः जरी पुरुषसत्ता मानत असली, स्वतः जरी सासरी आलेली असली तरी मुलांना माहेरी पाठवते. जेव्हा भीष्माच्या वेळी शंतनू अडवतो तेव्हा ती भीष्माला त्याच्याकडे सोडून स्वतः माहेरी निघून जाते. म्हणजे शंतनू आणि गंगेच्या सुरवातीच्या सात पुत्रांना मातृकुल मिळते तर आठवा पुत्र भीष्माला मात्र पितृकुल मिळते पण त्याचे आजोळ तुटते. आणि पित्याच्या संपत्तीचा तो उत्तराधिकारी होतो. <br />
<br />
पराशर तर सत्यवतीकडे कामभिक्षा मागतात आणि नंतर व्यासांना आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणजे सत्यवती सासरी जात नाही पण तिचा मुलगा मात्र बापाकडे जातो. म्हणजे व्यासाला पितृकुल मिळते पण त्याचेही आजोळ तुटते. पराशर फिरते तर सत्यवती हस्तिनापूर म्हणजे उत्तर प्रदेशातील. तिला पितृकुल व्यवस्था चालते आणि तीच व्यवस्था पुढे चालावी म्हणून ती नंतर जागरूक असते. <br />
<br />
शंतनू आणि सत्यवतीचा मुलगा विचित्रवीर्य, बापाकडे राहतो. त्याचे आजोळही तुटत नाही आणि त्याला पैतृक संपत्तीचा वारस नेमावे म्हणून विवाहपूर्व अट त्याच्या आईने आणि आजोबानेच घातलेली असते. म्हणजे इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाचा हक्क असणे अजून घट्ट होत जाते. <br />
<br />
कुंती आणि माद्रीच्या वेळी गुंता अजून वाढतो. कारण त्यांच्या मुलांचा जन्मदाता पिता वेगळा आणि सामाजिक पिता वेगळा. जन्मदाता पिता हिमालयीन समाजातला तर सामाजिक पिता उत्तर प्रदेशातल्या हस्तिनापूरचा. जन्मदाते तर मुलांना सांगणार की माझ्या संपत्तीत तुमचा वाट नाही तुम्ही आईची संपत्ती बघा. आणि सामाजिक पिता म्हणावे तर उत्तर प्रदेशातील नियोगाचे प्रचलित नियम पाळलेले नाहीत. <br />
<br />
त्यामुळे पैतृक संपत्ती मिळायची तर कुठल्या पित्याची? मूल आईचे म्हणावे तर त्यांना पहिल्या तीन पांडवांना कुंतिभोज (कुंतीला दत्तक घेणारा पिता) किंवा शूरसेन (कुंतीचा जन्मदाता) राजाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल आणि शेवटच्या दोन पांडवांना मद्रदेशाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल. <br />
<br />
कुंती आणि माद्री पुत्र प्राप्त करून घेतात आणि त्या दोघींचे पुत्र त्यांच्याकडेच राहतात. आपापल्या बापाकडे जात नाहीत. म्हणजे पांडवांना मातृकुल मिळते आणि त्यांचे बापकडचे आजोळ तुटते. त्यांना जन्मदाता पित्याची संपत्ती मिळत नाही. कारण की कुंती आणि माद्रीने निवडलेले साथीदार त्या गंगेच्या समाजव्यवस्थेला मनात असतात. आणि कुंतीचा प्रयत्न असतो की त्यांना सामाजिक पित्याची संपत्ती मिळावी. <br />
<br />
जर पांडवांना गंगेचा न्याय लावला असता माद्रीचा भाऊ शल्य राजाला नकुल सहदेवांना आपल्या संपत्तीमध्ये वाटा द्यावा लागला असता आणि कृष्णाला (कारण कृष्ण मथुरेचा आणि शूरसेन मथुरेचा राजा होता) पांडवांना वाटा द्यावा लागला असता. त्यामुळे शल्य आणि आणि कृष्ण दोघांचीही इच्छा होती की कुंती आणि पांडवांनी गंगेचा न्याय वापरू नये. तर सत्यवतीच्या न्याय वापरावा. म्हणून शल्य लढतो कौरवांकडून आणि कृष्ण लढतो पांडवांकडून. <br />
<br />
बरं धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचा जन्मदाताही अव्यंग नसल्याने समाजमान्य सम्राट नाही. आणि त्याची सूतसंतती भरपूर त्यामुळे पैतृक संपत्तीचा भरताचा किंवा विचित्रवीर्याचा न्याय लावला तर दुर्योधन आणि दुःशासनाला भरपूर वाटेकरी. (व्यासांच्या चरूची गोष्ट खरी मानून व्यासांकडे पितृत्व द्यावे तर व्यासांच्या पैतृक संपत्तीचा वाटा मिळेल पण हस्तिनापुरचा नाही.) आणि कौरव आईचे म्हणावेत तर त्यांना शकुनी मामाच्या संपत्तीत वाटा मागावा लागला असता. <br />
<br />
या सगळ्यात विचित्रपणे अडकलेली दोन माणसे म्हणजे भीष्म आणि व्यास. म्हटलं तर भावंडे. कारण आई वडील वेगवेगळे असले तरी एकाच्या आईचा दुसऱ्याच्या वडिलांशी विवाह झालेला. आणि दोघांनाही पित्याच्या संपत्तीचा अधिकार मिळालेला. पण कुंती, माद्री आणि गांधारी या स्त्रियांनी दोन वेगवेगळ्या समाजांना (हिमालयीन आणि पठारी) एकत्र आणून जो गुंता तयार करतात त्याला सोडवणे कुणालाही शक्य नसते. आणि सर्वजण संपत्तीचे मालक असल्याने युद्ध अटळ होते.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-82522803045358414762019-12-14T22:00:00.000+05:302019-12-14T22:04:33.969+05:30वेताळ पंचविशी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<a href="https://www.indiatoday.in/india/story/telangana-hyderabad-rape-murder-accused-encounter-how-events-unfolded-1625768-2019-12-06" target="_blank">या बातमीवरून</a> खालील पोस्ट सुचली होती.</div>
<div>
------------------------------------------------------------<br />
<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-2aiTiF_B9fE/XfUOx7SA-7I/AAAAAAAABdY/oYJ_R7dJOtgQTqMsCTakPjNGWLAqODbogCLcBGAsYHQ/s1600/unnamed.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="512" data-original-width="512" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-2aiTiF_B9fE/XfUOx7SA-7I/AAAAAAAABdY/oYJ_R7dJOtgQTqMsCTakPjNGWLAqODbogCLcBGAsYHQ/s320/unnamed.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Image Credit : Internet </td></tr>
</tbody></table>
<br /></div>
अंधारी रात्र होती आणि वातावरण भेसूर होते. मधूनमधून पाऊस पडत होता. सोसाट्याच्या वार्याने अरण्यांतली झाडें हलत होती. विजांचा गडगडाट आणि कोल्हेकुई यांत मधेच भुतांचा हंसण्याचा आवाज येत होता. पण राजा विक्रम डगमगला नाही. निर्धाराने तो प्रेत घेऊन पळालेल्या वेताळाचा पाठलाग करीत होता. वेताळ प्रेत घेऊन झाडावर पुन्हां लपला होता. राजा त्या जुन्या झाडावर परत चढला आणि त्याने ते प्रेत खाली आणले. आपल्या खांद्यावर ते प्रेत घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालायला लागला.<br />
<br />
तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन, मला तुझा हेतू काय आहे ते कांही उमजत नाही. हे इतके कष्ट तूं कशासाठी करतो आहेस? मध्यरात्र झाली आहे, गडद अंधार आहे, कांहीही दिसत नाही आणि तुला भिती वाटत नाही कां? वन्य श्वापदांच्या, विषारी जनावरांच्या आणि भुताखेतांच्या या अरण्यांत तू तुझे प्राण धोक्यांत कां घालतो आहेस? तुझ्या मनांत काय आहे ते तरी मला सांग.<br />
<br />
अनेकवेळा असं दिसतं की आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे ठरवणं अतिशय कठीण असतं. धर्मबुध्दी नावाच्या राजाच्या राज्यात एक घटना घडली. तिची कथा मी तुला सांगतो. त्या कथेवरुन धर्मबुध्दी असं का वागला ते तू मला सांग. <br />
<br />
आटपाट नगर होतं. त्याचा राजा होता धर्मबुध्दी. या धर्मबुध्दीला दोन मुलं होती. एकाचं नाव शुध्दबुध्दी आणि दुसऱ्याचं नाव शीघ्रबुध्दी. दोघेही तेजस्वी आणि बलशाली होते. त्यांच्या बलशाली देहांकडे बघून दबून जाणारा माणूस त्यांच्या विनयशील वागणुकीमुळे चटकन आश्वस्त होत असे. सर्व प्रजाजन आपल्या या राजकुमारांवर अतिशय प्रसन्न होते. इतकं असूनही राजा आता चिंतेत पडू लागला होता. आपल्यानंतर या दोघांपैकी कुणाला राजा करावं या चिंतेने त्याच्या मनात घर केलं होतं.<br />
<br />
एकदा त्याच्या कानावर एक अतिशय वाईट बातमी आली. प्रातःसमयी आलेल्या या बातमीने राजा हादरला. कुणीतरी राज्यातील एका स्त्रीवर अतिप्रसंग करुन तिला जाळून टाकलं होतं. या अमानुष अत्याचाराच्या बातमीमुळे संपूर्ण प्रजा चवताळून उठली. अत्याचाऱ्यांना शासन व्हायलाच हवं असा सूर सगळीकडून उठू लागला.<br />
<br />
धर्मबुध्दीने दंडपाणी नावाच्या आपल्या अंतर्गत सुरक्षाप्रमुखाला बोलावलं आणि आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांना न्यायासनासमोर आणण्याचं फर्मान सोडलं.<br />
<br />
दुसऱ्या दिवशी बातमी आली की दंडपाणीने चारही अत्याचारी नराधमांना पकडलं आहे.'या नराधमांना हालहाल करून मारावं, त्यांचे असे हाल करावेत की पुन्हा कुणाला असा अत्याचार करण्याची इच्छा होऊ नये', अशी मागणी जनतेतून होऊ लागली. <br />
<br />
तिसऱ्या दिवशी या चौघांना न्यायासनासमोर घेऊन येण्यासाठी दंडपाणी निघाला. पण रस्त्यात ते चौघे आरोपी त्याला हिसडा देऊन पळून जाऊ लागले. दंडपाणी चिडला. त्याने आपली तलवार काढली आणि तो आरोपींचा पाठलाग करु लागला. नग्न खड्ग घेऊन धावणारा उग्र दंडपाणी बघून आरोपी घाबरले आणि अजून वेगाने पळू लागले. त्यामुळे दंडपाणीचा राग अजून वाढला. आणि आरोपींना पकडण्याऐवजी त्याने त्यांच्यावर सपासप तलवारी चालवल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते मृतदेह मग आपल्या वृषभशकटात टाकून त्याने न्यायासनासमोर आणले. <br />
<br />
शकटातील ते मृतदेह, ते आणणारा रक्तलांछित दंडपाणी आणि त्याच्या हातातील ते रक्त प्यायलेलं खड्ग पाहून दरबार भयचकित झाला. नगरजनांनी खचाखच भरलेलं ते सभागृह दंडपाणी काय बोलणार तिकडे कान लावून बसलं होतं. इतक्या मोठ्या जनसमुदायात त्या वेळी अगदी मोरपीस पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता होती. <br />
<br />
धर्मबुध्दी, त्याच्या डाव्या बाजूला राणी न्यायसेना आणि उजव्या बाजूला दोन्ही राजकुमार शुध्दबुध्दी आणि शीघ्रबुध्दी बसले होते. मग धर्मबुध्दीने दंडपाणीला साऱ्या दृष्याचा खुलासा करायला सांगितलं. <br />
<br />
जेव्हा दंडपाणीने आरोपींनी हिसडा देऊन पळण्यात यश मिळवलं हे सांगितलं तेव्हा सभागृहातील सर्वांच्या डोळ्यात अंगार फुलला. नाकपुड्या क्रोधाने फुलू लागल्या. हाताच्या मुठी वळल्या गेल्या. आणि मग जेव्हा दंडपाणीने पाठलाग व तलवारबाजीची घटना सांगितली तेव्हा सभागृहात एकंच आनंदाचा चीत्कार उठला. सर्व सभाजनांनी दंडपाणीचा जयजयकार केला. <br />
<br />
धर्मबुध्दीने मग आपल्या दोन्ही राजकुमारांना पुढे बोलावलं आणि सांगितलं की दंडपाणीने जे केलं आहे त्याबद्दल तुम्हाला योग्य वाटेल तसा त्याचा सत्कार करा. ज्याची पध्दत मला योग्य वाटेल तो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल. <br />
<br />
शीघ्रबुध्दी लगेच पुढे आला. त्याने दंडपाणीला आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढून दिली आणि कृतकृत्य झालेल्या दंडपाणीला आपली तलवार भेट दिली. पुन्हा एकदा सभागृहात दंडपाणीचा आणि शीघ्रबुध्दीचा जयघोष झाला. तो आवाज इतका मोठा होता की जणू स्वर्गातील देवतांनाही शीघ्रबुध्दी राजा झाला असं वाटलं. <br />
<br />
मग शुध्दबुध्दी पुढे झाला. आता तो दंडपाणीचा सत्कार कसा काय करणार याबद्दल सगळ्यांच्या मनात कुतूहल होतं. त्याने दंडपाणीला जवळ बोलावलं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. त्याला सभागृहाकडे तोंड करायला सांगितलं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि मग तो उच्चारवात म्हणाला 'दंडपाणीचं शौर्य अतुलनीय आहे आणि त्याची न्यायबुध्दी सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे विचार करते.' सभागृह कानात प्राण आणून शुध्दबुध्दीचं भाषण ऐकत होतं. मग शुध्दबुध्दी पुढे म्हणाला 'असं असूनही यापुढे दंडपाणी आपल्या राज्याचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख रहाणार नाही'. दंडपाणी आणि सभागृह या वाक्यामुळे अवाक् झालं असतानाच राजा धर्मबुध्दी उभा राहिला आणि त्याने शुध्दबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं." <br />
<br />
ही कथा सांगितल्यानंतर वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, असं वाटतं की राजा धर्मबुध्दी चुकला. त्याने लोकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेणाऱ्या राजकुमाराला आपला वारस म्हणून घोषित केलं. मला तर वाटतं त्याने लोकभावनेत समरस झालेल्या शीघ्रबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं असतं तर प्रजा खूष झाली असती. ते न केल्याने धर्मबुध्दी चुकला. तुला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही जर तू मौन पत्करलंस, तर तुझ्या मस्तकांचे असंख्य तुकडे होतील. आणि तुझ्या पायाशी लोळू लागतील. <br />
<br />
राजा विक्रम म्हणाला, ' वेताळा, धर्मबुध्दीने केलं तेच योग्य आहे. राज्य चालवणं म्हणजे केवळ लोकांना आज जे आवडतं आहे ते करणं नसून राज्यशकट मजबूत करणं आहे. <br />
<br />
अधिकारी हे व्यवस्थेला बांधलेले असतात. त्यांना त्यांचे अधिकार व्यवस्थेकडून मिळालेले असतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांची कक्षा कुठल्याही कारणांमुळे स्वतःच्या मर्जीने वाढवून घेतली आणि त्याला लोकभावनेमुळे राजाने मान्यता दिली तर ते व्यवस्थेला अंतिमतः मारक ठरते. <br />
<br />
जर राज्य म्हणजे एक शरीर मानले तर प्रत्येक अधिकारी हा त्या शरीराचा एकेक अवयव असतो. आणि प्रत्येक अवयवाने आपापले काम सोडून दुसरे काम करणे शरीरासाठी धोकादायक असते. जर माणूस चालताना पडला आणि त्याला जखम झाली, त्यातून रक्त भळाभळा वाहू लागले, त्याच्या रक्तात खपली धरणारे घटक नसल्याने त्या माणसाचा शक्तीक्षय होऊ लागला तरी हृदयाने आपले रक्ताभिसरणाचे काम थांबवून चालत नाही. जर रक्त वाहू नये म्हणून हृदयाचे ठोके थांबले तर त्या माणसाचा तत्क्षणी मृत्यू होईल. त्याऐवजी बाकी सर्व अवयवांनी आपापले काम व्यवस्थित केले तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो. <br />
<br />
तसंच राज्याचं आहे. दंडपाणीचं काम न्याय करण्याचं नसून न्यायासनासमोर आरोपींना आणण्याचं आहे. त्याने आरोपींना मारुन टाकणं म्हणजे राज्यव्यवस्थेला दिलेला झटका आहे. याने लोकांना आज छान वाटलं आणि दंडपाणी शुद्ध चारित्र्याचा असला तरी भविष्यात या निर्णयाचा वापर करणारा अधिकारी किती शुद्ध चारित्र्याचा असेल याची खात्री नाही. किंबहुना इतका जयजयकार ऐकल्यावर दंडपाणीला आपल्या निर्णयक्षमतेवर गर्व होणारंच नाही आणि त्याच्या हातून चुका होणारंच नाहीत याचीही खात्री नाही. <br />
<br />
व्यवस्था बनवताना आज समोर असलेल्या माणसांच्या चारित्र्याकडे बघून चालत नाही. तर हे अधिकार मिळालेला कुठलाही अधिकारी कशाप्रकारे वागेल त्याकडे लक्ष द्यावे लागते. <br />
<br />
आज अमुकतमुकचा जयजयकार करणारे लोक आपल्या या वर्तणुकीचा भविष्यात काय परिणाम होईल ते न कळल्याने तसे वागत आहेत. उद्या अशाच अधिकाऱ्यांचा त्यांना त्रास झाला तर ते रडारड करतील. ते राज्यरुपी शरिरातील जिभेसारखे आहेत. पटकन ओव्या आणि त्याच तालात शिव्या देणारी जीभ. शरीराला त्रास होईल हे कळत असताना जास्तीत जास्त तिखट, मसालेदार किंवा चमचमीत खायला पुढे येणारी जीभ. तिच्या आहारी जाऊन निर्णय घेतले तर शरीर कायम दुःखात राहील. <br />
<br />
म्हणून माझ्या मते धर्मबुध्दीने योग्य तेच केलं. "<br />
<br />
राजाचं उत्तर ऐकून वेताळ प्रसन्न होत हसला आणि म्हणाला, तुझ्या सूक्ष्म विचारशक्तीबद्दल मी जे ऐकून होतो ते खरंच आहे तर. पण राजा तू असा उदास का दिसतोस? '<br />
<br />
राजा विक्रम म्हणाला,' वेताळा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक शक्यता जाणवली. आजच्या आपल्या राजेशाही व्यवस्थेत ठीक आहे पण उद्या जर अशी कुठली समाजव्यवस्था अस्तित्वात आली की ज्यात समाजाचं नेतृत्व कुणी करावं याचा निर्णय लोकांच्या मताने घ्यावयाचा असेल तर त्या व्यवस्थेतील शुध्दबुध्दींचं जीवन किती खडतर असेल याचा विचार करून मी खिन्न होतो आहे. त्या काळात सदानकदा लोकानुनय करणारा राज्यकर्ता आणि अधिकारांचा अधिक्षेप करणारा अधिकारी व्यवस्थेला मारक असतो हे लोकांना कोण समजावेल? या विचारामुळे मी थोडा हतोत्साहित झालोय. '<br />
<br />
यावर वेताळ म्हणाला,' खरंय तुझं. पण तू बोललास आणि तुझं मौन सोडलंस. त्यामुळे मी चाललो.' आणि मग वेताळही खिन्नमनाने झाडावर लटकून राहिला. विक्रमाने तलवार उपसली आणि तो पुन्हा वेताळाला आणायला निघाला.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-78527819031714967152019-11-25T15:38:00.002+05:302019-12-14T22:31:15.807+05:30हलाहल से हलाहल धुल रहा है <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
जे होणार होतं ते वाईट होतं. जे होत आहे तेही तितकंच वाईट आहे. पण या दोघांच्या वाईटपणाला एकत्र केलं तरी त्याहूनही अधिक वाईट गोष्ट घडते आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या नकळत आपण तिला हातभार लावतो आहोत. <br />
<br />
सर्वपक्षीय नेते आपापले निर्णय केवळ सत्तेची लालसा आणि त्यामागच्या अर्थकारणामुळे घेतलेले आहेत हे पदोपदी दाखवून देत असताना पक्षसमर्थक आणि सर्वसामान्य मतदार मात्र आपापल्या आवडत्या पक्षाचे नेते कसे चारित्र्यवान आणि नीतिमान आहेत हे स्वतःला आणि इतरांना पटवून देण्याची धडपड करत आहेत. त्यातल्या काहीजणांना यातला फोलपणा कळतो पण मग त्यांना एक नवीन प्रश्न छळतो की इतर सर्वजण नीतीमत्ता सोडून वागत असताना केवळ एकाच पक्षावर नीतीमत्तेची जबाबदारी कशी काय टाकावी? <br />
<br />
फेसबुकवरील एका वरिष्ठ मित्राने तर अटलजींचा काळ आता राहिला नाही. आता बदललेल्या काळात एका मताच्या अभावामुळे सत्तेवरून पायउतार होणाऱ्या अटलजींसारखी वर्तणूक ठेवणे अशक्य आहे असंही सांगितलं. <br />
<br />
हे वाचताना मला दोन गोष्टी आठवल्या. <br />
<br />
<b>१) कलियुग आहे कलियुग :</b> अटलजींच्या वेळी बाकीचे पक्षही नीतीमान होते हे आपण अप्रत्यक्षपणे मान्य करतो आहोत हे अनेकांच्या लक्षात येत नाही. वस्तुतः त्याकाळीही अन्य पक्ष तितकेच नीतीमान होते जितके आजकालचे पक्ष आहेत. त्याकाळीही संधीसाधू आणि आप्पलपोटे नेते तितकेच होते जितके आज आहेत. त्याकाळीही आपापला अजेंडा राबवण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी आणि त्यासाठी विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी सगळे राजकीय पक्ष तितकेच उतावीळ होते जितके आज आहेत. 'अटलजींचा काळ आज राहिला नाही' या वाक्यामागे गतकाळ फार उत्कृष्ट होता आणि वर्तमानात सगळी माती झाली आहे, हा भारतीयांचा निराशावाद कारणीभूत आहे. <br />
<br />
एकदा का एकेका मन्वंतराचे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे चार भाग परमेश्वराने केले आहेत असं मान्य केलं आणि प्रत्येक युगात समाजातील कलीचं प्रस्थ वाढत जाणार हे मान्य केलं की भूतकाळ हा कायम वर्तमानापेक्षा अधिक स्वच्छ वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यातून एक अनपेक्षित वाईट परिणाम दिसून येतो की वर्तमान आणि भविष्याला बदलण्याची आपली जबाबदारी टाळून आपण अनीतीचं समर्थन तरी करू लागतो किंवा मग त्याला विरोध करण्याची आपली जबाबदारी टाळतो. <br />
<br />
<b>२) रश्मिरथी :</b> राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची रश्मिरथी या नावाची एक महाकविता आहे. शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी ज्याप्रमाणे कर्णाला उत्तुंग दाखवते त्याप्रमाणे रश्मिरथी कर्णाला मध्यवर्ती भूमिका देऊन रचलेलं महाकाव्य आहे. त्यातील कित्येक संकल्पनांबद्दल माझ्या मनात वादाचे भरपूर मुद्दे तयार असले तरीही एक काव्य म्हणून रश्मिरथी माझी अतिशय आवडती रचना आहे. यात शेवटच्या म्हणजे सातव्या प्रकरणात जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतून बसतं आणि त्याच्यावर शरसंधान करायला कृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतो तेव्हा कवी दिनकरांनी कर्णाच्या तोंडी खालील वाक्ये घातली आहेत <br />
<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-8RPNg4k8IJs/XfURnnnz-XI/AAAAAAAABd4/RFEJmbRgogEBsEoF9pC7FHqmmFEu-N6TgCLcBGAsYHQ/s1600/images.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="195" data-original-width="258" src="https://1.bp.blogspot.com/-8RPNg4k8IJs/XfURnnnz-XI/AAAAAAAABd4/RFEJmbRgogEBsEoF9pC7FHqmmFEu-N6TgCLcBGAsYHQ/s1600/images.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Image Courtesy : <span style="background-color: white; color: #333333; font-family: "helvetica neue light" , , "helvetica neue" , "helvetica" , "arial" , sans-serif; font-size: xx-small;"> </span><a href="http://devdutt.com/articles/mahabharata/a-boy-called-karna.html" style="background-color: white; color: #009eb8; display: inline; font-family: "Helvetica Neue Light", HelveticaNeue-Light, "Helvetica Neue", Helvetica, Arial, sans-serif; font-size: xx-small; outline: none; text-decoration-line: none; transition: color 0.3s ease 0s;" target="_blank">Devadutt Patanaik</a> </td></tr>
</tbody></table>
<br />
'नरोचित धर्म से कुछ काम तो लो !<br />
बहुत खेले, जरा विश्राम तो लो ।<br />
फंसे रथचक्र को जब तक निकालूं,<br />
धनुष धारण करूं, प्रहरण संभालूं,'<br />
<br />
'रुको तब तक, चलाना बाण फिर तुम;<br />
हरण करना, सको तो, प्राण फिर तुम ।<br />
नहीं अर्जुन ! शरण मैं मागंता हूं,<br />
समर्थित धर्म से रण मागंता हूं ।'<br />
<br />
<br />
त्यावर अर्जुन गोंधळतो आणि त्याला त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाच्या तोंडून दिनकरांनी कौरवांची भीमाला विष खाऊ घालण्यापासून ते द्यूत आणि शेवटी अभिमन्यूवधापर्यंतची पापे वदवून घेतली आहेत आणि मग पुढे दिनकरांचा कृष्ण, कर्णाला विचारतो की, <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-4mIiUQo9loM/XfUT-cjvA9I/AAAAAAAABeU/ZSL7yq3A9XAKTRf9zRRc4ftQdu7yaE3iACLcBGAsYHQ/s1600/7964f11d7d3d70503f83c449bb369537.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="799" data-original-width="640" height="400" src="https://1.bp.blogspot.com/-4mIiUQo9loM/XfUT-cjvA9I/AAAAAAAABeU/ZSL7yq3A9XAKTRf9zRRc4ftQdu7yaE3iACLcBGAsYHQ/s400/7964f11d7d3d70503f83c449bb369537.jpg" width="320" /></a></div>
'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?<br />
सभी कुछ मौन हो सहते रहेंगे ?<br />
कि देंगे धर्म को बल अन्य जन भी ?<br />
तजेंगे क्रूरता-छल अन्य जन भी ?'<br />
<br />
'न दी क्या यातना इन कौरवों ने ?<br />
किया क्या-क्या न निर्घिन कौरवों ने ?<br />
मगर, तेरे लिए सब धर्म ही था,<br />
दुहित निज मित्र का, सत्कर्म ही था ।'<br />
<br />
'किये का जब उपस्थित फल हुआ है,<br />
ग्रसित अभिशाप से सम्बल हुआ है,<br />
चला है खोजने तू धर्म रण में,<br />
मृषा किल्विष बताने अन्य जन में ।'<br />
<br />
'शिथिल कर पार्थ ! किंचित् भी न मन तू ।<br />
न धर्माधर्म में पड भीरु बन तू ।<br />
कडा कर वक्ष को, शर मार इसको,<br />
चढा शायक तुरत संहार इसको ।'<br />
<br />
<br />
माझ्या वरिष्ठ मित्राने जेव्हा आजकाल सर्वपक्षांची नीतीमत्ता खालावली आहे त्यामुळे एका पक्षाकडून नीतीची अपेक्षा का करावी? हा प्रश्न विचारला तेव्हा मला दिनकरांच्या कृष्णाचं 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' हेच वाक्य आठवलं. <br />
<br />
आपली गंमत अशी आहे की आपण सगळ्यांनी कृष्णाला भगवंत मानून टाकलेलं आहे त्यामुळे त्याने केलेल्या कृत्याला अधर्म म्हणणं आपल्या कुवतीबाहेरचं आहे. त्यामुळे अनीतीचं उत्तर अनीतीनेच आणि अधर्माचं उत्तर अधर्मानेच प्रभावीपणे देता येऊ शकतं असा आपण आपला गैरसमज करून घेतला आहे. त्याला साक्ष म्हणून आपण कृष्णाला उभं केलं आहे आणि ती साक्ष सर्वमान्य व्हावी म्हणून आपण कृष्णाला भगवंत म्हणून प्रश्न संपवला आहे. परिणामी आपण कवी दिनकरांच्या कर्णाने पुढे भगवान कृष्णाला दिलेलं उत्तर आपण नजरेआड करतो. कर्ण म्हणतो,<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
'वृथा है पूछना, था दोष किसका ?<br />
खुला पहले गरल का कोष किसका ?<br />
जहर अब तो सभी का खुल रहा है,<br />
हलाहल से हलाहल धुल रहा है ।'<br />
<br />
जहर की कीच में ही आ गये जब,<br />
कलुष बन कर कलुष पर छा गये जब,<br />
दिखाना दोष फिर क्या अन्य जन में,<br />
अहं से फूलना क्या व्यर्थ मन में ?'<br />
<br />
'सुयोधन को मिले जो फल किये का,<br />
कुटिल परिणाम द्रोहानल पिये का,<br />
मगर, पाण्डव जहां अब चल रहे हैं,<br />
विकट जिस वासना में जल रहे हैं,'<br />
<br />
'अभी पातक बहुत करवायेगी वह,<br />
उन्हें जानें कहां ले जायेगी वह ।<br />
न जानें, वे इसी विष से जलेंगे,<br />
कहीं या बर्फ में जाकर गलेंगे ।'<br />
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-XODzc8l2mHQ/XfUUxvImxzI/AAAAAAAABeg/uaHLvJ-cR7UFQ4lnssLZAwd-gl4LQQ39ACEwYBhgL/s1600/fpfwarrior.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="450" data-original-width="800" height="180" src="https://1.bp.blogspot.com/-XODzc8l2mHQ/XfUUxvImxzI/AAAAAAAABeg/uaHLvJ-cR7UFQ4lnssLZAwd-gl4LQQ39ACEwYBhgL/s320/fpfwarrior.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Image Credit : Internet </td></tr>
</tbody></table>
मग यातून बाहेर पडायचं कसं? मला वाटतं याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला आपल्या पुराणकथांचं महत्व समजून घेतलं पाहिजे. कितीही आधुनिक प्रकारचं तंत्रशिक्षण आणि समाजव्यवस्थाशिक्षण घेतलं तरी अजूनही आपली मूल्यव्यवस्था आपल्या जुन्या पुराणकथांवरच अवलंबून आहे. त्यामुळे केवळ गावखेड्यातील बेरकीच नव्हे तर शहरांतील उच्चविद्याविभूषित लोकही नवीन पेचप्रसंगात आपल्या वर्तनाचं किंवा आपल्या असहाय्यतेचं समर्थन करताना पुराणकथांतील दाखले देतात. आपली भाषा आपल्या नकळत तेच प्रश्न विचारते. तेच दाखले देते. पुराणातील विजेत्याला देवत्व दिल्यामुळे आपल्याला आपल्या वर्तनातील विरोधाभासांची जाणीव होत नाही.<br />
<br />
राजकारणी, मग ते भारतातील असोत वा जगातील कुठल्याही देशातील, त्यांचे वर्तन फार वेगळे असेल असं मला वाटत नाही. व्यावसायिकांकडून स्वतःसाठी किंवा पक्षासाठी पैसे घेऊन निवडून आलेले राजकारणी शेवटी खाल्ल्या मिठाला जागणार आणि स्वतःच्या सत्तालालसेच्या हाकेलाच ओ देणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मग ते घराणेशाहीतून आलेले असोत किंवा मग कुठल्याही सांस्कृतिक संघटनेतून आलेले असोत. त्यामुळे त्यांच्याकडून माझा काही फार मोठा अपेक्षाभंग झालेला नाही. त्यांना वेसण घालण्यासाठी गरज आहे ती इतरांच्या अनीतीतून आपल्या किंवा आपल्या लाडक्या पक्षाच्या अनीतीला नैतिक अधिष्ठान न देण्याची. विरोध करायचा नसेल तरी किमान नापसंती दर्शविण्याची. <br />
<br />
आपली लोकशाही अजून तारुण्यात आहे. त्यामुळे ती अशी गोंधळलेली असणं फार नवलाचं नाही. तिचा गोंधळ भांडवलदारांकडून, राजकारण्यांकडून किंवा प्रत्यक्ष भगवंतांकडून दूर केला जाणार नाही. तो दूर होईल तो केवळ शिकल्या सवरलेल्या लोकांच्या पसंती किंवा नापसंतीच्या हुंकारामुळे. <br />
<br />
शिवाजी महाराजांनी आपल्यासारखा विचार केला असता तर एतद्देशियांचं राज्य स्थापन झालंच नसतं. किंबहुना मला तर असं वाटतं की तत्कालीन सामान्य माणसांनी आजच्यासारखाच विचार केला असावा ज्यामुळे माझ्या लाडक्या शिवाजीराजाला अविरत संघर्ष करावा लागला. म्हणून भक्तीमार्गाच्या संतांची, शक्तीमार्गाच्या रामदासांची शेवटी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. आणि आता आपल्यातील अनेकांची स्वप्नही अपूर्ण राहतील. पण करणार काय? शेवटी कलियुग आहे. आणि आपण ते स्वीकारलं आहे. आपले नेते घोर कली आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध एक नापसंतीचा कटाक्ष टाकण्यासही घाबरतो आहोत. दुसऱ्या कुणी टाकला तर आपण त्यालाही निरुत्तर करणार आहोत, दिनकरांच्या कृष्णाचं वाक्य त्याच्या तोंडावर फेकणार आहोत, 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' मग ते भलेही कितीका चुकीचं असेना.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-14160877144333246912019-11-14T16:49:00.002+05:302019-11-16T10:27:27.298+05:30गंगावतरण आणि बालदिन <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
रोज सकाळी टेकडीवर चालायला जातो. तिथे आता छान पायवाटा पडल्या आहेत. काही अतिशय तीव्र उताराच्या आहेत, काही समतल आहेत. काहीवर असंख्य छोटेमोठे दगड आहेत त्यामुळे जरा दुर्लक्ष झालं की घसरुन कपाळमोक्ष होणं ठरलेलं आहे तर काहींवर दगड खडे वगैरे काही नसून अगदी छान मातीचा रस्ता तयार झाला आहे. <br />
<br />
इथे चालायला येणारे जुने लोक सांगतात की या पायवाटा गेल्या चारपाच वर्षात पडल्या आहेत. आधी नुसतं जंगल होतं. माझ्या मनात विचार आला की जंगल असल्याने किमान पायवाटा बनल्या तरी त्या टिकून आहेत. आधीच्या लोकांनी सतत चालून मळून ठेवलेल्या पायवाटा आता माझ्यासारख्या नवमॉर्निंगवॉकरला वापरता येतात आणि त्यातली कुठली सोपी, कुठली कठीण तेही ठरवता येतं. जर इथे वाळवंट असतं तर कदाचित आधीच्या वाटसरूंमुळे तयार होणाऱ्या पायवाटा, रोजच्या वाऱ्यांमुळे नाहीशा झाल्या असत्या. आणि आकाशातील ताऱ्यांच्या मदतीशिवाय मार्गक्रमण करणे अशक्य झाले असतं. त्यांच्यामुळेही फक्त दिशा कळली असती. पण पायाखालच्या वाळूत कुठे साप, कुठे विंचू आणि कुठे लपलेले खड्डे आहेत त्याची कल्पना आली नसती. त्यामुळे मी वाळवंटात रहात नसून वनराईजवळ रहातो याचं मला हायसं वाटलं. पूर्वसुरींचं संचितज्ञान, त्यांनी मळलेल्या पायवाटा वापरायला मिळणं हेदेखील एक भाग्यच की!<br />
<br />
पण जर जंगल बदलत असेल तर? ठिकठिकाणी दरडी कोसळून पूर्वसुरींच्या मळलेल्या वाटा कालबाह्य होत असतील तर? वादळ आणि अतिवृष्टीमुळे जुन्या पायवाटांशेजारी असलेले वृक्ष उन्मळून पडले असतील तर? त्यांनी पूर्वसुरींच्या पायवाटा बंद करून टाकल्या असतील तर?<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-PTMHXi31zkA/Xc-APAyrbhI/AAAAAAAABac/TnOgtbNxxYkfb5TJbX-XBWTzXe2XkjItQCLcBGAsYHQ/s1600/75561512_10157059441889069_2968856844409241600_o.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="240" src="https://1.bp.blogspot.com/-PTMHXi31zkA/Xc-APAyrbhI/AAAAAAAABac/TnOgtbNxxYkfb5TJbX-XBWTzXe2XkjItQCLcBGAsYHQ/s320/75561512_10157059441889069_2968856844409241600_o.jpg" width="320" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-xXwWR1IAOF8/Xc-AO55mkzI/AAAAAAAABaU/8uOAnp_vgxQomcT7J0jh6Zj9h4htUDRxACLcBGAsYHQ/s1600/75614161_10157059440149069_2101543951952510976_o.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="900" data-original-width="1600" height="180" src="https://1.bp.blogspot.com/-xXwWR1IAOF8/Xc-AO55mkzI/AAAAAAAABaU/8uOAnp_vgxQomcT7J0jh6Zj9h4htUDRxACLcBGAsYHQ/s320/75614161_10157059440149069_2101543951952510976_o.jpg" width="320" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-rIokYveAnkA/Xc-APOAZbCI/AAAAAAAABaY/unWEFXF0wjkMgZ001LOci4fSWgrQ3TlIgCLcBGAsYHQ/s1600/76634285_10157059440034069_5967167586691973120_o.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="900" data-original-width="1600" height="180" src="https://1.bp.blogspot.com/-rIokYveAnkA/Xc-APOAZbCI/AAAAAAAABaY/unWEFXF0wjkMgZ001LOci4fSWgrQ3TlIgCLcBGAsYHQ/s320/76634285_10157059440034069_5967167586691973120_o.jpg" width="320" /></a></div>
<br />
<br />
आपण आपल्या वनराईत चालत किंवा बैलगाडीने जात असलो पण इतरांनी त्यांच्या वनराईत सायकली, मोटारगाड्या नेणं सुरू केलं असेल तर? इथल्या पिढीने पूर्वजपरंपरेला चिकटून रहावं आणि पायवाट, बैलवाट सांभाळत बसावं का? इतरांना आपल्या वनराईत येण्यात रस नसेल तरीही आपण आपल्या पिढ्यांचा पुढचा प्रवास आपल्यापेक्षा सुखकर व्हावा म्हणून प्रयत्न करावा की करु नये? आणि जर आपण असा विचार करत नसू तर इतरांनी आपल्या वनराईत ढवळाढवळ केली तर आपल्याला चालेल का? जर इतरांनी केलेली ढवळाढवळ न आवडल्याने आपण त्यांना पिटाळून लावलं तर भविष्यासाठी आपण काय टिकवून ठेवायचं? आपल्या पूर्वजांच्या पायवाटा ज्या इतरांच्या आगमनाला रोखू शकल्या नाहीत? की इतरांकडून शिकलेल्या नव्या तंत्राला वापरून आपण नव्या पायवाटा तयार करायच्या?<br />
<br />
जुन्या पायवाटा असताना आता त्या नवीन जगासाठी कामाच्या नाहीत म्हणून नवीन पायवाटा पाडणं सोपं नाही. पण असं काम दुसर्या महायुद्धानंतर अफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशातल्या नेत्यांवर आपोआप येऊन पडलं. त्या त्या देशातील नेत्यांनी आपापल्या लोकांच्या मूळ स्वभावाला साजेल असे निर्णय घेत ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. मग तो चीन असो की व्हिएतनाम की इस्त्राएल की कंबोडिया की दक्षिण अफ्रिका.<br />
<br />
या सर्व देशात हे निर्णय घेणाऱ्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी सर्व निर्णय अचूक घेतले असं कुणीच म्हणणार नाही. त्यातल्या सगळ्यांनी आपापल्या समाजातील सर्व नागरिकांवर किंवा काही गटांवर अनन्वित अत्याचारही केलेत. त्यांच्या धोरणांमुळे त्या त्या देशातील काही पिढ्यांची आयुष्ये दहशतवाद किंवा बेरोजगारी किंवा सांस्कृतिक क्रांती किंवा अनन्वित क्रौर्य आणि हिंसा यांत भरडून निघाली. असं असूनही त्या त्या देशात ते पूजनीय आहेत. चीनमधील माओ असो किंवा कंबोडियातील नोरोदोम सिंहनुक किंवा इस्राएलमधील डेव्हिड बेन गुरियन. या सगळ्यांनी आपापल्या समाजातील पूर्वसुरींच्या वाटा नाहिशा करत आपापल्या समाजाला येणाऱ्या भविष्यासाठी तयार करण्याकडे लक्ष दिलं. आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचं हे मोठेपण मान्य करत त्यांनी आखून दिलेल्या नवीन पायवाटांचे हमरस्ते करण्याकडे लक्ष दिलं. त्यांच्याकडून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पण त्यांच्या चुकांसाठी त्यांच्यावर सातत्याने कोरडे ओढून त्यांची प्रतिमा मलीन करण्यात आपला व समाजाचा वेळ घालवला नाही. जो पायवाट पाडण्यास सुरुवात करतो त्यानेच हमरस्ता बनवून द्यावा असा आतताई आणि अशक्यप्राय आग्रह धरला नाही. हमरस्ते बनणं हे अनेक पिढ्यांचं संचित आहे, त्यात आपलीही जबाबदारी आहे, सगळी जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्याची नाही हे मान्य करून ते समाज पुढे चालत राहिले. गंगावतरणाची कथा कधी ऐकली नसूनही त्यांनी आपले हे पहिल्या पिढीचे नेते म्हणजे राजा सगर आहेत. गंगावतरणाआधीच ते स्वर्गवासी झाले म्हणून त्यांना दोष द्यायचं टाळून स्वतः अंशुमन किंवा दिलीप किंवा भगीरथ होण्याकडे अधिक लक्ष दिलं. <br />
<br />
पण या सगळ्यात एकंच देश असा आहे जिथे मळलेल्या पायवाटा सोडून भविष्यसन्मुख नवीन पायवाटा पाडण्यात पुढाकार घेणारे नेते कमनशिबी ठरले. त्यांच्या अनुयायांनी त्यांना देवत्व देऊन थिजवलं तर विरोधकांनी त्यांना दानव ठरवण्यात कुठलीच कमतरता ठेवली नाही. गंगावतरणाची कथा माहिती असूनही गंगा आणू शकले नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवण्यात समाजातील अनेकांनी धन्यता मानली. <br />
<br />
आपल्या समाजाचा आत्मा चीनची भिंत बांधणाऱ्या आत्यंतिक कष्ट सहन करणाऱ्या माणसांचा बनलेला नाही. कंबोडियाच्या आणि व्हिएतनामच्या आत्यंतिक अत्याचारी आणि हिंसक माणसांचा बनलेला नाही. तर तो एकाचवेळी सबै भूमी गोपालकी असा संदेश देणाऱ्या देवाची सुंदर लेणी, मंदीरे बांधणाऱ्या आणि त्याचवेळी मोठाल्या जनसमूहाला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या माणसांचा आहे. एकाचवेळी जिवाशिवाचं अद्वैत आणि प्राण्यांतही देव शोधणाऱ्या आणि त्याचवेळी परजातीतील माणसांना अस्पृश्य मानणाऱ्या माणसांचा आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या दशकानुसार समवयस्क असलेल्या चीन, कंबोडिया, इस्राएल, व्हिएतनाम इथल्या नेत्यांप्रमाणे आपल्या देशात वागून चालणार नाही. हे उमजून निर्णय घेणाऱ्या या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकाचा आज जन्मदिवस.<br />
<br />
हमरस्ता बांधण्याची जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्यावर नसते, ही जाणीव या नेत्याने भविष्याचा मार्ग दाखवलेल्या समाजाला लवकर प्राप्त होवो आणि अंशुमन, दिलीप व भगीरथाची परंपरा या समाजात टिकून राहो, हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने या समाजाला शुभेच्छा</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-66935956804728763832019-11-10T22:46:00.000+05:302019-11-10T22:48:29.446+05:30बेरीज वजाबाकी <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<b>बेरजेचं राजकारण :</b><br />
१) एक मध्यवर्ती सावध नेता<br />
२) सर्वपक्षीय सलोख्याचे संबंध<br />
३) वतनदारीचं आधुनिक प्रारुप<br />
४) घराणेशाही मिरवत घराणेशाहीकडे वाटचाल<br />
५) सरकारी संस्थांचा वापर बहुतकरुन आपल्या व शरणागताच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी. विरोधकांनाही सामावून घेण्याकडे कल असल्याने अडकलेल्याने शरण जाणे आणि मग त्याचे पुनर्वसन करुन एका क्षेत्रापुरतं मर्यादित करुन ठेवण्याकडे कल. <br />
६) घराणेशाहीमुळे कार्यकर्ते कायम सतरंजी उचलण्याच्या भूमिकेत. आपापल्या भौगोलिक क्षेत्रात नेत्याचं नाव वापरुन आपापली कामं करुन घेता येतात याचा कार्यकर्त्यांना आनंद. <br />
७)समाजात राजकारणावरुन भांडणं कमी. समाजात आधीपासून अस्तित्वात असलेली जातीय, आर्थिक, धार्मिक भांडणं वापरून आपापली राजकीय स्थानं बळकट करण्याकडे राजकीय नेत्यांचा कल. <br />
८) नेता व कार्यकर्ता यापैकी कुणाच्याही लैंगिक आयुष्याची अधिकृत व अनधिकृत व्यासपीठावरुन चर्चा नाही. किंबहुना असं काही उजेडात आलं तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल. <br />
९) जैसे थे प्रवृत्ती समाजात आणि राजकारणात प्रबळ. <br />
१०) मोठे बदल घडण्यासाठी किंवा नवीन नेतृत्व उभे रहाण्यासाठी आर्थिक किंवा नैसर्गिक अरिष्टाची गरज. <br />
<br />
<br />
<b>वजाबाकीचं राजकारण :</b><br />
१) एक मध्यवर्ती सर्वशक्तिमान नेता<br />
२) सर्वपक्षीय नेत्यांशी दबावाचे संबंध<br />
३) राजकारणाचं कॉर्पोरेट प्रारुप<br />
४) घराणेशाही नाकारत घराणेशाहीकडे वाटचाल<br />
५) सरकारी संस्थांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आणि त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी. विरोधकांना संपवण्याकडे कल असल्याने ज्यांना पावन करुन घेतलं आहे त्यांच्याही डोक्यावर टांगती तलवार.<br />
६) अघोषित घराणेशाहीमुळे कार्यकर्ते कायम सतरंजी उचलण्याच्या भूमिकेत पण सतरंज्यांची प्रतवारी असल्याने कार्यकर्त्यांमधे उर्ध्वगामी व्यवस्थेत असल्याचा आनंद. <br />
७) समाजात राजकारणांवरुनही भांडणं आणि जुन्या जातीय, आर्थिक, धार्मिक भांडणांना राजकारणाचाही पदर. <br />
८) स्वपक्षीय व अन्यपक्षीय नेता व कार्यकर्ता या सर्वांच्या लैंगिक आयुष्याची अनधिकृत व्यासपीठावरुन चर्चा. किंबहुना असं काही नसलं तरी त्याचा गवगवा करण्याकडे कल. त्यामुळे राजकारणात ब्रह्मचर्याचं किंवा संसारमोहत्यागाचं वाढलेलं प्रस्थ. नेतृत्वाची मेहेरनजर होण्याची शक्यता वाढल्यास आपापल्या लैंगिक आयुष्याचे पुरावे नष्ट करण्याकडे व्यवस्थेची वाटचाल. <br />
९) जैसे थे प्रवृत्तीबद्दल तिटकारा. कुठलीही किंमत देऊन बदल हवा असं मानणारा लोकप्रिय. <br />
१०) मोठे बदल घडण्यासाठी धनिकांचं पाठबळ आवश्यक. </div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-83025244383462731322019-10-20T17:56:00.003+05:302019-10-20T22:01:15.790+05:30गरिबीचे अर्थशास्त्र <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
जन्म, शिक्षण आणि अभ्यासाचे अनेक विषय यामुळे भारताशी नाळ जुळलेले अर्थअभ्यासक श्री अभिजीत बॅनर्जी यांना २०१९ चा <a href="https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2019/summary/" target="_blank">स्वेरीजेस रिक्सबँक पुरस्कार</a> मिळाला आहे. १९६८ ला स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेच्या देणगीतून सुरु झालेला हा पुरस्कार आता अनौपचारिकपणे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.<br />
<br />
विकासाचे अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या उपशाखेतील आपल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवलेले भारतीय श्री अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच श्री बॅनर्जीदेखील कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे स्नातक होते. आणि कल्याणकारी अर्थशास्त्र व विकासाचे अर्थशास्त्र (Welfare Economics & Development Economics) हे दोघांच्या अभ्यासाचे विषय आहेत.<br />
<div>
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-BC3tp-2MzIo/XaxRk8ppBhI/AAAAAAAABOo/KOhIVnxePi46_QKA0IAo1Z33f4y9NezPQCLcBGAsYHQ/s1600/Banerjee%2BDuflow%2Band%2BMicheal.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="171" data-original-width="294" src="https://1.bp.blogspot.com/-BC3tp-2MzIo/XaxRk8ppBhI/AAAAAAAABOo/KOhIVnxePi46_QKA0IAo1Z33f4y9NezPQCLcBGAsYHQ/s1600/Banerjee%2BDuflow%2Band%2BMicheal.jpg" /></a></div>
<div>
<br />
<br />
यंदाचा नोबेल पुरस्कार श्री बॅनर्जी त्यांच्या पत्नी श्रीमती एस्थर डफ्लो आणि श्री मायकेल क्रेमर यांना संयुक्तपणे मिळालेला आहे. दोघेही मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सेंधील मुलईनाथन या सहकाऱ्याबरोबर मिळून दोघांनी अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ऍक्शन लॅब नावाचा उपक्रम सुरु केला आहे.<br />
<br />
विकासाचे अर्थशास्त्र (Development Economics) या विद्याशाखेत विकसनशील देशाच्या आर्थिक, सामाजिक रचनांचा आणि कररचनांचा अभ्यास केला जातो. ही विद्याशाखा कल्याणकारी अर्थशास्त्राच्या (Welfare Economics) जवळची असल्यामुळे तिचा मुख्य भर आर्थिकदृष्टया मागासगटाच्या उत्थानासाठी सरकारची आणि गैरसरकारी संस्थांची जबाबदारी आणि सरकारी योजनांचे मूल्यमापन या दोन गोष्टींवर असतो. सरकारी योजना यशस्वी झाली की अयशस्वी ते योजना राबवून झाल्यावर कळते. ती जर अयशस्वी झाली तर समाजाचा पैसा आणि वेळ वाया गेलेला असतो. त्यामुळे योजना राबवण्यापूर्वी आपली उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरवण्यात ती यशस्वी होऊ शकेल का? ते प्रयोगाद्वारे सिद्ध करता आल्यास योजनेची परिणामकारकता वाढवता येऊ शकते त्यामुळे समाजाच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळता येणं शक्य होतं. परंतु अर्थशास्त्र सामाजिक शास्त्रांच्या गटातील विषय असल्याने त्यात प्रयोगसिद्ध ज्ञानाऐवजी गृहितकाधारित सिद्धांतावर आणि तदनुषंगिक निर्णयांवर भर दिला जातो. ही अर्थशास्त्राची मर्यादा ठरते.<br />
<br />
श्री बॅनर्जी यांनी औषध निर्माण क्षेत्रातील रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्सचे (Randomised Control Trials) तंत्र कल्याणकारी योजनांत कश्याप्रकारे वापरता येईल ते दाखवून दिले आणि आपल्या पॉवर्टी ऍक्शन लॅब (Poverty Action Lab) या उपक्रमाखाली ते विविध देशांत यशस्वीरीत्या राबवले आहे. वैद्यक क्षेत्राशी संबंधित ही संकल्पना अर्थशास्त्रात यशस्वीरीत्या राबवून अर्थशास्त्राची अचूकता आणि उपयुक्तता वाढवल्याबद्दल त्यांना या वर्षीचे नोबेल पारितोषिक दिले गेले आहे. रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स ही संकल्पना समजून घेण्यासाठी आधी आपल्याला गरिबांच्या उत्थानाबाबत अर्थशास्त्रात काय विचार प्रबळ आहेत हे समजून घेतले पाहिजेत. <br />
<br />
युनाइटेड नेशन्सचे सल्लागार जेफ्री सॅक्स यांच्या मते गरीब राष्ट्रे गरीब असतात कारण ती गरिबीच्या सापळ्यात अडकलेली असतात. चारीबाजूंनी जमिनीने वेढलेली, नापीक जमिनीची, मलेरिया आदी रोगांनी ग्रासलेली उष्ण कटिबंधातील ही राष्ट्रे गरिबीमुळे त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या उडीसाठी मानवी बळ, सुपीक जमीन आणि पायाभूत सुविधा यांत गुंतवणूक करू शकत नाही. गरिबीमुळे त्यांना कर्ज मिळत नाही आणि मिळाल्यास ते फेडणे जमत नाही. त्यामुळे गरिबी आहे म्हणून सुरवात नाही. सुरवात नाही त्यामुळे गरिबी टिकून आहे. त्यामुळे कर्ज परवडत नाही. त्यामुळे पुन्हा गरिबी टिकून राहते अश्या प्रकारे आतून अभेद्य असलेल्या गरिबीच्या दुष्टचक्रात ही राष्ट्रे अडकलेली असतात. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या नागरिकांना किमान सुरवातीला तरी मदत करणे त्यांच्या सरकारचे आणि जगाचे कर्तव्य आहे.<br />
<br />
आपल्या मताच्या समर्थनार्थ श्री सॅक्स, अफ्रिकेतील शेतकऱ्यांची उदाहरणे देतात. या शेतकऱ्यांना सुरवातीला रासायनिक खते फुकटात दिली गेली. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढले. आणि त्यातून बचत करून त्यांनी मग पुढच्या वेळी खते विकत घेतली. आता त्यांना मदतीची गरज नाही पण सुरवातीला जर त्यांना रासायनिक खते फुकटात मिळाली नसती तर विकासाच्या वाटेवरची त्यांची वाटचाल सुरूच होऊ शकली नसती.<br />
<br />
याउलट विल्यम इस्टरली यांच्या नेतृत्वाखाली अर्थशास्त्र्यांचा दुसरा गट मानतो की अश्या प्रकारे केलेली मदत अविकसित देशांसाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान देणारी ठरते. कारण तिथले लोक स्वतःचे मार्ग शोधायच्या ऐवजी फुकटात मिळणाऱ्या बाह्य मदतीवर अवलंबून राहतात. ऐदी आणि आळशी बनतात. आणि जेव्हा ही बाह्य मदत मिळणे बंद होते तेव्हा ते पुन्हा गरिबीच्या गर्तेत कोसळतात. तेव्हा गरीब देशांनी बाजाराचे तत्व अंगिकारले पाहिजे. उत्तम ते टिकते या तत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. बाह्य संस्था किंवा सरकारनेदेखील आपल्या देशातील गरिबांना काही फुकट देणे टाळले पाहिजे. फुकट देण्याची योजना शेवटी भ्रष्टाचाराला आणि आळशीपणाला जन्म देते. गरिबीचे दुष्टचक्र वगैरे काही नसते, खरं तर ‘उत्तम ते टिकेल, म्हणून उत्तमाची कास धरा’ हा बाजाराचा मंत्रच गरिबांना गरिबीतून बाहेर काढू शकतो.<br />
<br />
आपल्या मताच्या समर्थनार्थ श्री इस्टरली अफ्रिकेतील अनेक देशांची उदाहरणे देतात की जिथे फुकटात खते मिळण्याची सवय लागल्याने काहीजणांना त्याचे महत्व कळले नाही, किंवा मग फुकटात मिळण्याची सवय लागल्याने नंतर ती आपल्याला विकत घ्यावी लागतील यासाठी त्यांची मानसिकता तयार झाली नाही, किंवा ती फुकट असल्याने मधल्या मधे गडप झाली आणि योग्य लोकांपर्यंत पोचलीच नाहीत . त्यापेक्षा त्याच शेतकऱ्यांना छोट्या प्रमाणावर खते विकत घ्यायला लावून, त्यातून वाढलेल्या उत्पन्नातून थोडी अजून विकत घ्यायची सवय लावून त्यांचे उत्पन्न टप्प्याटप्प्याने वाढण्याची त्यांना सवय लावली पाहिजे. जेणेकरून ते स्वावलंबी होतील आणि खतांच्या उद्योगालाही धक्का लागणार नाही. थोडक्यात म्हणजे गरिबीचे दुष्टचक्र अभेद्य नसून फक्त गरिबीतून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती लागते.<br />
<br />
पहिल्या मताचे लोक म्हणतात गरिबांना मोफत शिक्षण द्या, शाळांमधे मोफत कॉम्प्युटर पुरवा, मुलांना फुकट खाणं द्या, गरीब उद्योजकांना कर्ज न देता अनुदान द्या.<br />
<br />
तर दुसऱ्या मताचे लोक या सर्वांच्या विरुद्ध असतात. त्यांचे म्हणणे असते की ही मदत त्यांना पांगळं करेल आणि अधिकारी वर्गाच्या भ्रष्टाचाराला जन्म देईल. त्याशिवाय ज्या उद्योगाचे उत्पादन आज फुकट दिले आहे त्या उद्योगाला उद्याच्या मागणीची शाश्वती नसेल त्यामुळे अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळून पडेल.<br />
<br />
इथेच श्री बॅनर्जी रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्सची संकल्पना वापरायला सांगतात. वर मांडलेल्या दोन मतांत ते स्पष्टपणे गरिबीच्या अभेद्य दुष्टचक्राचे अस्तित्व मान्य करतात. पण त्याच वेळी फुकट मिळत असल्यामुळे शक्य असलेल्या भ्रष्टाचाराचे अस्तित्वही मान्य करतात.<br />
<br />
गरिबीचे दुष्टचक्र असते हे मान्य केल्याने ते भेदण्यासाठी सरकारने किंवा बाह्य संस्थांनी मदत करणे त्यांना योग्य वाटते. पण फुकट मदत पांगुळगाड्याची सवय लावते हेही त्यांना मान्य आहे. त्यामुळे ते मदत करावी की नाही? असा सरधोपट प्रश्न विचारणं टाळतात. त्याऐवजी तीन प्रश्न विचारतात.<br />
<br />
१) जर फुकट उपलब्ध करून दिली नाही तर गरिबांना कधीही त्या गोष्टीचा वापर करावासा वाटेल का?<br />
<br />
<div>
२) जर उपयुक्त वस्तू फुकट किंवा अनुदानित स्वरूपात उपलब्ध करून दिली तर लोक ती वाया घालवातील का?</div>
<div>
३) आज फुकट किंवा अनुदानित स्वरूपात मिळालेली वस्तू उद्या पूर्ण किमतीला विकत घ्यावी लागली तर लोक त्या वस्तूसाठी पूर्ण किंमत द्यायला तयार होतील का?<br />
<br />
या तीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मग ते दोन देशांचा विचार न करता, एकाच देशातील दोन वेगवगळ्या गटांचा अभ्यास करतात. अभ्यासासाठी निवडलेली व्यक्ती रँडमली निवडलेली असते आणि ती कोणत्या गटात जाईल तेही रॅंडमली ठरतं. एका गटाला वस्तू फुकट किंवा अनुदानित स्वरूपात दिल्या जातात आणि दुसऱ्या गटाला नाही. त्यांच्या वर्तणुकीवरून मग किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या गटाला किती अनुदान दिल्यास भविष्यात ते स्वावलंबी होऊन पूर्ण किंमत द्यायला तयार होतील? आणि अनुदानाची कुठली पातळी त्यांना पांगळे बनवेल याबद्दल अनुमान काढले जाते. म्हणजे इथे सरकारी धोरण काय असावे त्याचा निर्णय हस्तीदंती मनोऱ्यात बसलेल्या विचारवंतांनी मनाशी धरलेल्या गृहीतकांवर आधारित नसून तो प्रत्यक्ष प्रयोगांती उपलब्ध झालेल्या निष्कर्षांवर आधारलेला आहे. त्यामुळे तो वास्तवाच्या अधिक जवळ आणि म्हणून परिणामकारक असण्याची शक्यता अधिक आहे.<br />
<br />
श्री बॅनर्जी सरधोपट प्रश्न विचारून सर्वव्यापी उत्तरे शोधण्याच्या विरोधात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की प्रत्येक सरकारी निर्णय हा त्याची उद्दिष्टे, त्याची व्याप्ती, त्यावरचा खर्च, उपलब्ध यंत्रणा या सर्वांवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक निर्णयाला यशस्वी करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतील. त्यांची उत्तरे पडताळण्यासाठी वेगवेगळे गट बनवावे लागतील आणि त्यात वेगवेगळ्या लोकांना सामील करून घ्यावे लागेल. एका यशस्वी निर्णयाचे प्रश्न दुसऱ्या नवीन निर्णयासाठी तसेच्या तसे वापरणे चुकीचे आहे.<br />
<br />
इथे हे लक्षात घेतले पाहिजे की श्री बॅनर्जी यांचा गरिबीबाबतचा विचार श्री अमर्त्य सेन यांच्यासारखाच आहे. गरिबी म्हणजे केवळ उत्पन्नाची वानवा नसून व्यक्तीला आपल्या समग्र क्षमतांचा वापर करण्यापासून रोखणारं अभेद्य दुष्टचक्र आहे. त्यामुळे ते भेदण्यासाठी त्याला सरकारची किंवा बाह्य संस्थांची मदत मिळाल्यास त्याचे उत्थान लवकर होऊ शकेल. <br />
<br />
बहुसंख्य अर्थशास्त्रज्ञांच्या मते व्यक्तीच्या उत्पन्नाच्या आलेख खालील आकृतीप्रमाणे असतो.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-RgMkQrsnyR4/XayLjVM54GI/AAAAAAAABPA/tvmVfDSX-og55rxP3yJxbXwHvAEuOvkawCLcBGAsYHQ/s1600/Income%2BGraph%2Bwithout%2BPoverty%2BTrap.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="403" data-original-width="440" height="292" src="https://1.bp.blogspot.com/-RgMkQrsnyR4/XayLjVM54GI/AAAAAAAABPA/tvmVfDSX-og55rxP3yJxbXwHvAEuOvkawCLcBGAsYHQ/s320/Income%2BGraph%2Bwithout%2BPoverty%2BTrap.png" width="320" /></a></div>
वरील आकृतीत आडव्या अक्षावर व्यक्तीचे सध्याचे उत्पन्न मांडले आहे तर उभ्या अक्षावर त्याचे भविष्यकालीन उत्पन्न मांडले आहे. या आकृतीत पंचेचाळीस अंशाच्या कोनात एक निळी रेघ आखलेली आहे. ही निळी रेघ स्थिरस्थितीदर्शक आहे. म्हणजे या रेघेवरील व्यक्तीचे आजचे उत्पन्न आणि उद्याचे उत्पन्न सारखेच असेल. परंतू असे होत नाही. व्यक्तीच्या वास्तविक उत्पन्नाचा आलेख दाखवण्यासाठी या आकृतीत लाल रेघ वापरली आहे. व्यक्ती आज जितक्या उत्पन्नापासून सुरु करते त्यापेक्षा तिचे उद्याचे उत्पन्न जास्त असते. उत्पन्नाच्या या वाढीचा वेग सुरवातीला जोरदार असतो नंतर त्याचा जोर थोडा कमी होत जातो. (दरमहा रु ६००/- कमविणारी व्यक्ती जितक्या चटकन आपले मासिक उत्पन्न रु १,२००/- करू शकते तितक्या चटकन तीच व्यक्ती आपले मासिक उत्पन्न रु ३०,०००/- वरून रु. ६०,०००/- करू शकत नाही) म्हणून लाल रेघ सुरवातीला तीव्र वेगाने वर जाते पण नंतर मात्र तिच्या वाढीचा वेग मंदावतो. या आकृतीत कुठेही श्री सॅक्स यांना अभिप्रेत असलेला गरिबीचा सापळा नाही. त्यामुळे ही आकृती श्री इस्टरली यांच्या मताचे प्रतिनिधित्व करते.<br />
<br />
जर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचा प्रवास असाच होतो असे मानले तर कुठल्याही व्यक्तीला सरकारने कुठलीही मदत करणे फारतर त्याचा वेग वाढवू शकेल पण त्याच्या उत्पन्नाचा आलेख बदलू शकणार नाही. त्यामुळे श्री सॅक्स यांना महत्वाची वाटणारी सरकारी मदत श्री इस्टरलींना अनाठायी आणि अन्याय्य वाटते. <br />
<br />
श्री बॅनर्जींनी गरिबीच्या सापळ्याचे अस्तित्व मान्य केल्यामुळे त्यांच्या मते वरील आकृती समाजातील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाचा आलेख म्हणून वापरता येत नाही. आपले मत स्पष्ट करण्यासाठी ते वरील आकृतीत काही बदल करतात. त्यांनी सुचवलेल्या बदलाप्रमाणे आकृती आता खालीलप्रमाणे दिसते. <br />
<div style="text-align: center;">
</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-HLhtIJrMqM4/XayLtpD7k4I/AAAAAAAABPE/1ZFIKgdGz5YuFizw3G8WeWOUK8lVLvDHQCLcBGAsYHQ/s1600/Income%2BGraph%2Bwith%2BPoverty%2BTrap.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="403" data-original-width="400" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-HLhtIJrMqM4/XayLtpD7k4I/AAAAAAAABPE/1ZFIKgdGz5YuFizw3G8WeWOUK8lVLvDHQCLcBGAsYHQ/s320/Income%2BGraph%2Bwith%2BPoverty%2BTrap.png" width="317" /></a></div>
पहिल्या आकृतीत व्यक्तीच्या वास्तविक उत्पन्नाची लाल रेघ सरळ वर चढून मग तिच्या ऊर्ध्वगमनाचा वेग मंदावतो. त्यामुळे ती इंग्रजी अक्षर L आडवे केल्यावर जसे दिसेल त्यासारखी दिसते. पण श्री बॅनर्जी यांनी सुचवलेले बदल आकृतीत वापरले तर मात्र या L च्या जागी तिरके केलेले S हे अक्षर दिसू लागते.<br />
<br />
या नवीन आकृतीत समाजातील व्यक्तींचे दोन गट केलेले आहेत. पॉवर्टी ट्रॅपमधे अडकलेले लोक (राखाडी रंगाच्या चौकोनात सामावलेले) आणि त्याबाहेरचे लोक. पॉवर्टी ट्रॅपमधे अडकलेल्या लोकांसाठी उत्पन्नाचा प्रवास उजवीकडून डावीकडे होतो. म्हणजे आजच्यापेक्षा त्यांचे उद्याचे उत्पन्न अजून कमी होते (माहितीचा,औषधांचा, शिक्षणाचा अभाव आणि वाढती महागाई ही त्यांच्या उत्पन्नाच्या अधोगतीची कारणे असतात) याउलट पॉवर्टी ट्रॅपच्या बाहेर असलेल्या व्यक्तींच्या उत्पन्नाचा प्रवास मात्र आधीच्या आकृतीप्रमाणेच होतो. म्हणजे त्यांचे उत्पन्न आधी जोरदार वाढते आणि नंतर त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावतो. पॉवर्टी ट्रॅपचे अस्तित्व मान्य केले की त्यात अडकलेल्या लोकांच्या उत्पन्नाच्या अधोगतीची कारणे शोधता येतात आणि त्यांवर उपाययोजना करणे शक्य होते. <br />
<br />
पुढे जाऊन श्री बॅनर्जी असेही सांगतात की पॉवर्टी ट्रॅपची व्याप्ती, तो तयार होण्याची कारणे आणि त्यांच्या निर्मूलनाचे उपाय हे प्रत्येक निर्णयाप्रमाणे वेगवेगळे असतात. म्हणजे अनुदानित स्वरूपात खते द्यावीत की नाही? या निर्णयासाठी ज्या व्यक्ती पॉवर्टी ट्रॅपमध्ये आहेत असे समजून उपाययोजना केली जाईल त्याच व्यक्ती सकस आहारासंबंधीच्या किंवा बचतगटआणि अनुदानीत घरांच्या कल्याणकारी योजनेसाठी पॉवर्टी ट्रॅपमधे अडकलेल्या आहेत असे समजणे चुकीचे ठरेल आणि त्याआधारे केलेल्या उपाययोजना सफल होणार नाहीत.प्रत्येक योजनेसाठी आधी पॉवर्टी ट्रॅपचे अस्तित्व मान्य करून त्या योजनेसंदर्भात पॉवर्टी ट्रॅपची व्याप्ती, त्याची कारणे स्वतंत्रपणे नोंदवून मग रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्सचे तंत्र वापरून निर्णयाची परिणामकारकता तपासून पहावी लागेल. <br />
<br />
थोडक्यात सर्वव्यापी उत्तरे नसतात.प्रत्येक प्रश्नासाठी वेगळी स्वतंत्र उत्तरे शोधावी लागतात.एका योजनेसाठी गरीब म्हणजे बाकी सर्व योजनांसाठी गरीब असे वर्गीकरण केल्यास ते योजनांच्या परिणामकारकतेस अपायकारक ठरते.<br />
<br />
गरीब माणूस म्हणजे एकतर आळशी, लाचार किंवा नियमांचे महत्व नाकारणारा मूर्ख अशी प्रतिमा रंगवली जाते तिला श्री बॅनर्जी कडाडून विरोध करतात. ज्याला खायची भ्रांत आहे, ज्याला निवृत्तीवेतन नाही तो आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल सुखवस्तू घरातील माणसासारखा विचार करेल हे गृहीतक चुकीचे आहे. त्यामुळे त्याचे निर्णय आपल्याला जरी आत्मघातकी वाटले तरी त्याच्या दृष्टीने त्यांना कार्यकारणभाव आहे. आणि तो त्याच्या दृष्टीने तितकाच योग्य आहे जितका सुखवस्तू घरातील माणसाने स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेला निर्णय. किंबहुना त्याची खायची भ्रांतच त्याला वेगळ्या जगात फिरवत राहते. ज्यातून बाहेर पडण्याच्या मार्ग उघडणे त्याच्या हातात नसून बाहेरच्या लोकांच्या हातात आहे. गरिबांचे जग त्यातील कार्यकारणभावाच्या विविधतेबाबतीत श्रीमंत आहे. आपल्या जगातील योग्यायोग्यतेच्या पूर्वग्रहांना बाजूला सारून जर त्या जगातील कार्यकारणभाव समजून घेतले तर राष्ट्राच्या विकासात अडसर बनणाऱ्या गरिबीला आपण दूर करू शकतो. अर्थात गरज आहे ती सरधोपट प्रश्न न विचारण्याची आणि मिळालेल्या उत्तरांना सर्वव्यापी व सार्वकालिक न मानता डोळसपणे राबवण्याची. <br />
<br />
याच विचारातून <a href="https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/couple-in-a-house-surrounded-by-thoughts/articleshow/71664729.cms" target="_blank">प्रथमसारख्या</a> संस्थेबरोबर काम करताना श्री बॅनर्जी, प्रथमने राबवलेली बालसखी संकल्पना अधिक प्रभावी करण्यासाठी मदत करतात. आणि अभ्यासात मागे पडणाऱ्या गरीब मुलांकडून शाळेच्या वेळेहून वेगळ्या वेळेत बालसखींच्या साहाय्याने जादाचा सराव करून घेतात आणि त्या मुलांच्या गणिताच्या अभ्यासात लक्षणीय प्रगती करून घेतात. किंवा मग गरिबांसाठी महिना अडीच हजार रुपये मोफत उत्पन्न ही संकल्पना मांडून खेडोपाड्यात पसरलेल्या भारताच्या क्रयशक्तीला चालना देण्याचा मार्ग सुचवतात. <br />
<br />
विद्यमान सरकारच्या मागील कार्यकाळातील नोटबंदीच्या निर्णयावर श्री बॅनर्जी यांनी निःसंदिग्धपणे टीका केली होती आणि सध्याच्या कार्यपद्धतीवरही ते फारसे समाधानी नाहीत. आपली नाराजी ते सार्वजनिक व्यासपीठांवर बोलूनही दाखवतात त्यामुळे त्यांच्याबाबतीत सरकारसमर्थक फारसे खूष नसतात. साधारणपणे अनेक सरकारसमर्थक मानतात की गरिबांसाठी कल्याणकारी योजना म्हणजे डावा आर्थिक विचार. त्यात श्री बॅनर्जी कलकत्त्याचे, अमर्त्य सेन यांना मानणारे, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे, पुन्हा काँग्रेसचे सल्लागार आणि विद्यमान सरकारच्या आर्थिक धोरणांचे विरोधक. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेला अर्थविचार हा डावाच असणार, त्यामुळे तो निरुपयोगीच असणार. पण श्री बॅनर्जी यांना जेएनयूमधे असताना, व्हाईस चॅन्सलरला घेराव घातल्याबद्दल दहा दिवस तिहारमधे तुरुंगवासही भोगावा लागला होता. आणि काँग्रेस सरकारच्या आशीर्वादाने पोलिसी फटकेही खावे लागले होते. त्यावेळी त्यांच्या आंदोलनाचे स्वरूपही सरकारच्या सर्वंकष हुकूमशाहीविरोधात होते. हे ध्यानात ठेवले की त्यांच्या डावेपणाचा आणि विद्यमान सरकारविरोधाबाबतच्या आपल्या पूर्वग्रहाची योग्यायोग्यता तपासणे सोपे जाईल. त्यामुळे सरकारसमर्थक असोत व सरकारविरोधक, या सर्वांनी श्री बॅनर्जींचा अर्थशास्त्रातील अधिकार मान्य करताना त्यांना पक्षीय राजकारणाच्या रंगात न रंगवणेच त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी उपयोगी ठरेल.</div>
</div>
</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3122493422604970764.post-32651502089676886562019-10-16T17:09:00.002+05:302019-10-16T17:09:49.536+05:30सुष्ट दुष्ट आणि फुलांच्या माळा <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
नवरात्रीत आमच्या घरी घट बसतात. माझी कानडी बायको हौशी असल्याने ज्यात नटणे मुरडणे किंवा खाणेपिणे या गोष्टींना महत्त्व असते ते सगळे सण आमच्या घरी साजरे होतात. नटून खुश झालेल्या हिचं कौतुक करणे किंवा मग तिने बनवलेले चविष्ट पदार्थ चापणे, या दोन्ही गोष्टी मला सारख्याच आवडत असल्याने, कुठलाही उत्सव साजरा करण्यास माझी ना नसते.<br />
<br />कॉलेजात असताना रोज रात्री गरबा खेळायला उत्सुक असलेली मुलगी ते आता नऊ दिवस उपवास करणारी मुलगी हा तिचा प्रवास मला स्त्रीच्या कायम बदलत रहाण्याच्या आणि सदैव आनंदी राहण्याच्या वृत्तीचं प्रत्ययकारी दर्शन घडवतो. अर्थात इतक्या वर्षात मी फारसा बदललो नाही हेही तितकंच खरं आहे. एका अर्थाने ती नित्यनूतन प्रकृती आहे आणि मी जड पुरुष. <br /><br />माझ्यात फार बदल न होण्यात माझ्या तीर्थरुपांचा फार मोठा हात आहे. 'मुलाला सोळापर्यंत आणि मुलीला सोळानंतर सांभाळावं लागतं' ही म्हण त्यांना कुणीतरी वाढवून 'एकवीसपर्यंत' अशी सांगितली असावी. त्यामुळे 'फाल्गुनी पाठकच्या तालावर नाचताना आनंद मोरे' अशी छायाचित्र कधीच कुठल्याही वर्तमानपत्रात झळकली नाहीत. अर्थात मला कधी कधी वाटतं की मी गरब्यात न नाचल्यानेच फाल्गुनी पाठक टिकली असावी, कारण माझं विलक्षण नृत्यकौशल्य जर मी सार्वजनिक व्यासपीठावर प्रगट केलं असतं तर फाल्गुनीने संगीतसंन्यास घेतला असता. जर गरबा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेवरुन प्रेरित असेल तर साक्षात भगवंतानी रासलीला खेळून असा पायंडा पाडून मला नृत्यसंधी दिल्याबद्दल भारतवर्षाची माफी मागितली असती आणि लगोलग 'हा पहा शेवटचा कौरव' असं अर्जुनाला सांगून मला शरपंजरी निजवून मग अवतारकार्य संपवलं असतं. तसंच, जर गरबा आणि देवीचं काही नातं असेल तर देवीने महिषासुराला जरा टाईमप्लीज घालून आधी माझ्याकडे मोर्चा वळवला असता. नृत्याच्या बाबतीत अशा प्रकारे मी सनी देओलचाही गुरु असल्याने कॉलेजच्या दिवसात माझी प्रेयसी 'पंखिडा तू मोतियोंकी ला बहार रे' वगैरेवर गिरक्या घेत असताना मी सातच्या आत घरात असे. आणि आजही मी सनी देओलचं गुरुपद टिकवून आहे त्यामुळे गरब्यात मी कधी रमलो नाही.<br /><br />उपवास या गोष्टीची मला साबुदाणा खिचडी आणि केळीचे तिखट मीठ लावलेले लांब वेफर्समुळे पडलेली भुरळ अजूनही कायम आहे. त्यामुळे हिच्यात होणारे बदल बघत, तिला नऊ रंगाच्या साड्या, नारळपाणी वगैरे आणून देत आणि स्वतः नेहमीचा नाश्ता करून वरुन पुन्हा साबुदाण्याची खिचडी खात मी जसाच्या तसा राहिलो आहे.<br /><br />तात्पर्य काय? तर भारताच्या विविध भागात नवरात्र साजरी करण्याचे विविध प्रकार अजमावणाऱ्या आणि विश्वातील आनंदाचे ब्रह्मज्ञान अनुभवणाऱ्या माझ्या अर्धांगासमोर मी बराच कोरडा पाषाण आहे. असो. हे विषयांतर झालं. मुद्दा होता घरच्या घटस्थापनेचा. ती जरी घटस्थापनेचा हा उत्सव मनोभावे करत असली तरी माझा वाटा तिला शहाळ्याचे पाणी आणून देणे, आरतीच्या वेळी टाळ्या वाजवणे आणि 'जयदेवी जयदेवी' असे जोरात ओरडणे इथपर्यंतच आहे. <br /><br />या वर्षी हिने घटावर टांगण्यासाठी एक लाकडी छत्र करून घेतलं होतं. त्याला खालच्या बाजूला भरपूर हुक्स होते. दर दिवशी फुलांची एक एक माळ ओवून ती त्या हुक्सना अश्या प्रकारे अडकवायची की त्यातील झेंडूची फुले देवीच्या मुखवट्याला लागली पाहिजेत. देवी युद्ध करत असताना तिच्या मस्तकाचा दाह होतो म्हणून आपण तिला फुलांनी शांत करत राहायचं. सुष्ट आणि दुष्टांच्या या युद्धात आपण सुष्टांच्या बाजूला आहोत हे आपल्या कृतीने सिद्ध करायचं आणि आपल्यासाठी लढणाऱ्या देवीची ताकद वाढवायची, अशी ही कल्पना. <br /><br />कुठल्यातरी सुताराने आणि कुठल्यातरी फुलवाल्याने आपला व्यवसाय वाढावा म्हणून पुढे केलेल्या कल्पनेला सुष्ट आणि दुष्टाच्या चिरंतन लढ्याचं कोंदण लाभल्याने घटावर छत्र आणि छत्राला फुलांच्या माळा आता एक परंपरा बनली आहे , असे विचार माझ्या मनात आले. नंतर रोज देवीच्या मुखवट्याभोवती वाढत जाणाऱ्या माळा बघून मला माझ्या बायकोच्या हौसेचे कौतुक वाटत होते. <br /><br /><a href="https://1.bp.blogspot.com/-7nairMJQ7cY/XacBAJrzr6I/AAAAAAAABOE/DmTfTvZFGAQRYs33aicEJyG-rtFUPs-MwCLcBGAsYHQ/s1600/WhatsApp%2BImage%2B2019-10-16%2Bat%2B5.05.36%2BPM%2B%25281%2529.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="720" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-7nairMJQ7cY/XacBAJrzr6I/AAAAAAAABOE/DmTfTvZFGAQRYs33aicEJyG-rtFUPs-MwCLcBGAsYHQ/s320/WhatsApp%2BImage%2B2019-10-16%2Bat%2B5.05.36%2BPM%2B%25281%2529.jpeg" width="180" /></a> <a href="https://1.bp.blogspot.com/-zmX4YZSt934/XacBANM2XmI/AAAAAAAABOI/Wwvqc5VRlX419tiZbVUIOA1kPYJu8plagCLcBGAsYHQ/s1600/WhatsApp%2BImage%2B2019-10-16%2Bat%2B5.05.36%2BPM.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="720" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-zmX4YZSt934/XacBANM2XmI/AAAAAAAABOI/Wwvqc5VRlX419tiZbVUIOA1kPYJu8plagCLcBGAsYHQ/s320/WhatsApp%2BImage%2B2019-10-16%2Bat%2B5.05.36%2BPM.jpeg" width="180" /></a><br /><br />दसऱ्याच्या दिवशीच्या पहाटे लवकर उठलो होतो. पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. वातावरण थंड होते. सगळीकडे शांतता होती. घरात आणि घराबाहेर अजूनही कुठला प्रकाश नव्हता. फक्त देव्हाऱ्याजवळ समयांचा मंद प्रकाश पसरला होता. त्या मंद प्रकाशात पाटावरची परडी, तिच्यातील मातीत उगवलेले नऊ धान्यांचे तुरे, त्यांच्यामधे ठेवलेला घट, त्यावरचा देवीचा मुखवटा, त्यावरचं छत्र आणि त्याला लटकून देवीच्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या माळा दिसत होत्या. मन प्रसन्न करणारं ते दृश्य बघत मी तिथेच उभा राहिलो. मग वाटलं. आज दहावा दिवस म्हणजे सिंहारूढ होऊन 'अंबा निघे सीमोल्लंघनी हो, शुंभनिशुंभादीक राक्षसा किती मारशी रणी हो' हे वर्णन आज लागू होणार. आणि त्या प्रसन्न क्षणीही मला हसू फुटलं. <br /><br />म्हणजे बघा, दहावा दिवस आहे. देवी गेले नऊ दिवस रोज युद्ध करते आहे. अनेक राक्षस देवीवर तुटून पडत आहेत. देवी सगळ्यांना पुरून उरते आहे. आज राक्षसांनी शेवटचा निकराचा हल्ला चढवायचं ठरवलं आहे. त्यांच्या गटात रात्रभर व्यूहरचनेबद्दल खलबतं चालली आहेत. सकाळ झालेली आहे. दोन्ही बाजूला रणभेरी, संबळ, तुतारी, शंख वगैरे रणवाद्ये वाजू लागलेली आहेत. रणक्षेत्राच्या आजूबाजूचे पक्षी घाबरून ओरडू लागले आहेत आणि तिथून उडून चालले आहेत. त्यांच्या थव्यामुळे किंचिंत काळ रणक्षेत्र अंधारले आहे. दोन्ही बाजूचे हिंस्त्र प्राणी डरकाळ्या फोडत आहेत. जंगलातील कोल्हेकुत्रे भेसूर आवाजात ओरडून वातावरणातील ताण वाढवत आहेत. देवीला युद्धज्वर चढू लागलेला आहे. देवी आता असुरनिर्दालन करण्यासाठी सिंहावर आरूढ होते आहे. सिंह आता शेपटी आपटतो आहे. मान हलवून आयाळ उडवतो आहे. दृश्य मोठं भीतीदायक होत आहे. इतक्यात घरा घरातील सुगृहिणी आपापल्या हाताने बनवलेल्या झेंडूच्या फुलांच्या माळा देवीच्या चेहऱ्याला लागतील अश्या प्रकारे घरातील घटावरील छत्रीला अडकवत आहेत. आणि रणक्षेत्रावरील देवीला त्याची जाणीव होत आहे. <br /><br />काय वाटेल अश्या वेळी देवीला? काय म्हणत असेल ती? <br /><br />"अरे जरा थांबा. काय हे मधेच फुलं आणि माळा वगैरे. इथे समोर शुंभनिशुंभ उभे आहेत. माझा क्रोध अनावर होतो आहे आणि तुम्ही माळा लावून माझा युध्दज्वर उतरवताहात? अशाने युध्द संपायचं नाही. आणि काय रे भक्तांनो, या माळांमुळे माझ्या नजरेत अडथळा येणार नाही का? तुमच्या लग्नात मुंडावळ्या बांधलेल्या असताना इकडे तिकडे बघताना तुमचं जजमेंट चुकत होतं की नाही? मग मला का त्रास देताय? सुष्टांच्या बाजूने उभं राहताना शेवटी दुष्टांना सहाय्य करताय ते कळत नाही का तुम्हाला?"<br /><br />मी असा विचार करून हसत होतो. तितक्यात हीदेखील देवघराजवळ आली. नित्यकर्माला सुरवात करण्याआधी देवीला भक्तिभावाने नमस्कार करत एक क्षण उभी राहिली. माझं हसू तिला दिसलं नव्हतं. आपण सुष्टांच्या बाजुने लढणाऱ्या देवीची मनोभावे सेवा करतो आहोत याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद पाहून माझ्या मनात आलेले विचार सांगून तिची थट्टा करण्याचा मोह मी आवरला. माझ्या विचारांच्या मुंडावळ्या काढून टाकल्या आणि मनातल्या मनात म्हणालो की ज्या कुणी सुताराने आणि फुलवाल्याने ही माळांची कल्पना सुरु केली असेल त्यावरही देवी प्रसन्न होवो.</div>
Anand Morehttp://www.blogger.com/profile/07962109756578078729noreply@blogger.com0