Tuesday, September 3, 2019

चंद्रगुप्त विरुद्ध धनानंद

कुमारवयात होतो. रविवारी ही सिरीयल लागायची. सकाळी खेळायच्या वर्गाला जायचो. तिथून धावत पळत सिरीयल सुरु होण्याच्या वेळेत घरी पोहोचायची घाई असायची. पुढे याच्या डीव्हीडीचा सेट विकत घेतला. यातील मध्यवर्ती भूमिका करण्यासाठी दुसरा कलाकार घ्यायला हवा होता असं सुरवातीला वाटलं होतं पण नंतर मात्र त्या कलाकाराशिवाय अन्य कोणी त्या भूमिकेत बघणं अशक्य वाटू लागलं.

कित्येकदा याची पारायणं केली. यातलं अलक्सेंद्रने (Alexander) आपल्या सैन्याला उद्देशून केलेलं भाषण. संस्कृती म्हणजे काय ? ती का नष्ट होते? भाषा आणि परंपरांचा संस्कृतीच्या अमरत्वात काय हात असतो याबाबत चाणक्यने आपल्या शिष्यांना केलेलं मार्गदर्शन. पाटलीपुत्र सोडून जाणाऱ्या आचार्यांची मनधरणी करताना केलेला युक्तिवाद, इतरांची सरशी होते आहे म्हणून गांगरून गेलेल्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढावं म्हणून केलेलं भाषण, पौरवराज आणि चाणक्यची जुगलबंदी, अमात्य राक्षस आणि चाणक्यची जुगलबंदी; या सगळ्यावर मी तासंतास बोलू शकतो. यातलं 'हम करे राष्ट्र आराधन' हे गाणं अतिशय आवडतं होतं आणि अजूनही आहे.

जेव्हा धनानंद राजगादीवरून पायउतार होतो तेव्हाचा चाणक्य आणि धनानंद यांच्यातील संवाद म्हणजे या सगळ्यावर कळसाध्याय आहे. माझ्या काही डाव्या मित्रांना मी हा संवाद ऐकायला दिला.तेव्हा त्यांनी चाणक्यशी संबंधित काहीही बघण्यात रस नाही असं सांगून हा संवाद ऐकण्यास नम्रपणे नकार दिला.

संवाद याप्रमाणे आहे. (पहिल्या कमेंटमध्ये संवादाची लिंकही देतो. संवाद १:३० मिनिटाला चालू होतो)

---
धनानंद : महाअमात्य ! क्या तुम विजयी हुए ?

चाणक्य : नही सम्राट । शासक कि पराजय में शिक्षक कि विजय नही हो सकती । कहीं कोई विष्णुगुप्त चूक गया था इसलिये आज किसी धनानंद को पराजित होना पड रहा है । यह विजय शिक्षक के लिये उपलब्धी नही हो सकती ।

धनानंद : यह तथाकथित विजेताओंका दर्शन बोल रहा है ? या एक शिक्षक का आदर्श ?

चाणक्य : जो आदर्श यथार्थ ना हो, वह शिक्षक का दर्शन नही हो सकता ।

धनानंद : तुम सच कह रहे हो विष्णुगुप्त ! जो दर्शन तुम्हारा नही वह यथार्थ और आदर्श नही हो सकता ।

चाणक्य : सच कह रहे हें सम्राट । सत्य कि परिभाषा भी हर व्यक्ती के लिये भिन्न भिन्न होती है ।

धनानंद :तुम्हारे सत्य कि परिभाषा क्या है ? जो जितना ज्यादा जोरसे कहे वह सच है ? या जो जितने ज्यादा लोग कहे वह सच है ? सच तो यह है विष्णुगुप्त, कि तुम विजयी नही हुए । सच यह है कि मै पराजित नही हुवा ।

चाणक्य : मै जानता हूं सम्राट कि मरने से मृत्यूपर विजय नही होती । धनानंद के मरने से धनानंद पर विजय नही हो सकती । मार्ग के एक कंटक से मुक्ती पानेसे मार्ग निष्कंटक नही हो जाता । पर इससे विष्णुगुप्त का प्रवास थम नही जाता । यदी कोई धनानंद उग्र होगा तो कोई लघु विष्णुगुप्त भी रुद्र होगा । मेरा कार्य हि जागना और जगाना है सम्राट ।

धनानंद : किसे जगाओगे तुम विष्णुगुप्त ? इस सोये हुए समाज को ? या उसे जो विचारोंका आधार लिये आसन पे आयेगा और समय के साथ स्वयं को सम्राट धनानंद पायेगा । वही मुझे फिरसे जन्म देंगे ।


---
काय दणदणीत संवाद आहेत !

ही सिरियल उजव्या विचाराच्या लोकांमधे फार लोकप्रिय होती. त्यामुळे माझे उजवे मित्र हा व्हिडीओ अगदी नक्की बघतील याची मला खात्री आहे. पण ज्याप्रमाणे डाव्या मित्रांनी तो पाहिलाच नाही त्याप्रमाणे उजवे मित्र तो पाहूनही त्यात चाणक्यने मांडलेला विचार समजून घेतील याची मला खात्री नाही.

चाणक्य आणि धनानंद स्पष्टपणे मांडतात की धनानंद ही एक प्रवृत्ती आहे. झोपलेल्या समाजामुळे विचारांचा आधार घेऊन राजगादीपर्यंत पोहोचलेला मनुष्यदेखील शेवटी स्वतःला धनानंद बनलेला पाहतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला याचा लागलेला अर्थ इतकाच आहे की समाज झोपलेला असला की शुद्ध विचारांनी प्रेरित राज्यकर्तादेखील शोषक होतो. त्यांना विचारांच्या कक्षेत ठेवण्यासाठी गादीवर न बसणाऱ्या चाणक्यांची गरज असते. जे समाजालादेखील जागं करतील आणि धनानंद या प्रवृतीलादेखील मोकाट सुटू देणार नाहीत.

अर्थात नवीन युगाचे हे आधुनिक चाणक्य कोण? ते ठरवणं जरा कठीण आहे. ज्याला जास्तीत जास्त लोक आधुनिक चाणक्य म्हणतात तो, की जो स्वतः जोरजोरात आपली बाजू मांडतो तो, की ज्याला पदाची कुठलीही अपेक्षा नसताना जो आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडत राहतो तो ? हा प्रश्न आपण ज्या प्रकारे सोडवू त्यावरून आपल्या समाजाचं भविष्य ठरेल.

No comments:

Post a Comment